शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जातींच्या नावाचे महासंघ निषेधार्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:56 IST

कोल्हापूर : अलीकडे ब्राह्मण, मराठा, ओबीसी, दलित या जातींच्या नावाने स्थापन झालेले महासंघ हे निषेधार्हच म्हणावे लागतील. यामधून जातीयवाद निकाली निघणार की वाढणार हा प्रश्न उपस्थित होतो, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी येथे व्यक्त केले.शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे बुद्धपौर्णिमेनिमित्त आयोजित आठव्या प्रबोधनवादी साहित्य संमेलनाच्या ...

कोल्हापूर : अलीकडे ब्राह्मण, मराठा, ओबीसी, दलित या जातींच्या नावाने स्थापन झालेले महासंघ हे निषेधार्हच म्हणावे लागतील. यामधून जातीयवाद निकाली निघणार की वाढणार हा प्रश्न उपस्थित होतो, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी येथे व्यक्त केले.शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे बुद्धपौर्णिमेनिमित्त आयोजित आठव्या प्रबोधनवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती लेखक डॉ. आनंद पाटील, कार्याध्यक्ष डॉ. जे. बी. शिंदे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई, साहित्यिक लक्ष्मणराव मोहिते, व्यंकाप्पा भोसले, मीरासाहेब मगदूम, प्राचार्य दिनकर खाबडे, डॉ. टी. एस. पाटील, सुनीलकुमार सरनाईक, हसन देसाई, पी. बी. पवार, आदींची होती. डॉ. आनंद पाटील यांच्याहस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन झाले.सबनीस म्हणाले, अलीकडे देशाला हिंदुत्ववादाचा धोका निर्माण झाला आहे का?, सर्वच जाती-धर्मांत कट्टरवाद आला आहे का?, भारताची व महाराष्टÑाची सांस्कृतिक एकात्मता धोक्यात आली आहे का? हे पाहण्याची वेळ आली आहे. डॉ. आनंद पाटील म्हणाले, लहानपणापासूनच मुलांवर बाराखडीमधून वर्णव्यवस्था बिंबवली जात आहे. समानतेसाठी विविध देशांत क्रांती झाली पण भारतात होऊ शकली नाही, कारण इथे कोणाला वैदिक चौकट पार करता आली नाही. जे. बी. शिंदे म्हणाले, बुद्धांच्या मानवतावादी विचारांच्या मनन, चिंतन व अनुकरणासाठी गेली आठ वर्षे हे संमेलन आयोजित केले जात आहे. देसाई, मोहिते, प्रा. शिंदे यांनी विचार मांडले. राजेंद्र यादव यांनी सूत्रसंचालन, विशाखा जितकर यांनी आभार मानले.शासकीय पुजारी नियुक्तीचा अभिनंदनपर ठरावकरवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात शासकीय पुजारी नियुक्त करण्याचा कायदा सरकारने मंजूर केला. यासाठी लढा दिलेल्या कार्यकर्त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्याचबरोबर हाच कायदा महाराष्टÑातील इतर मठ व मंदिरांना लागू करून जमलेल्या पैशांतून समाजहिताची कामे करावीत यासह विविध आठ ठराव जे. बी. शिंदे यांनी मांडले. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.यांचा झाला गौरवसंमेलनात डॉ. जयश्री चव्हाण, गुलाब अत्तार, अशोक चौगुले, बाबूराव शिरसाट यांचा प्रबोधन पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.