शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

जातींच्या नावाचे महासंघ निषेधार्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:56 IST

कोल्हापूर : अलीकडे ब्राह्मण, मराठा, ओबीसी, दलित या जातींच्या नावाने स्थापन झालेले महासंघ हे निषेधार्हच म्हणावे लागतील. यामधून जातीयवाद निकाली निघणार की वाढणार हा प्रश्न उपस्थित होतो, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी येथे व्यक्त केले.शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे बुद्धपौर्णिमेनिमित्त आयोजित आठव्या प्रबोधनवादी साहित्य संमेलनाच्या ...

कोल्हापूर : अलीकडे ब्राह्मण, मराठा, ओबीसी, दलित या जातींच्या नावाने स्थापन झालेले महासंघ हे निषेधार्हच म्हणावे लागतील. यामधून जातीयवाद निकाली निघणार की वाढणार हा प्रश्न उपस्थित होतो, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी येथे व्यक्त केले.शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे बुद्धपौर्णिमेनिमित्त आयोजित आठव्या प्रबोधनवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती लेखक डॉ. आनंद पाटील, कार्याध्यक्ष डॉ. जे. बी. शिंदे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई, साहित्यिक लक्ष्मणराव मोहिते, व्यंकाप्पा भोसले, मीरासाहेब मगदूम, प्राचार्य दिनकर खाबडे, डॉ. टी. एस. पाटील, सुनीलकुमार सरनाईक, हसन देसाई, पी. बी. पवार, आदींची होती. डॉ. आनंद पाटील यांच्याहस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन झाले.सबनीस म्हणाले, अलीकडे देशाला हिंदुत्ववादाचा धोका निर्माण झाला आहे का?, सर्वच जाती-धर्मांत कट्टरवाद आला आहे का?, भारताची व महाराष्टÑाची सांस्कृतिक एकात्मता धोक्यात आली आहे का? हे पाहण्याची वेळ आली आहे. डॉ. आनंद पाटील म्हणाले, लहानपणापासूनच मुलांवर बाराखडीमधून वर्णव्यवस्था बिंबवली जात आहे. समानतेसाठी विविध देशांत क्रांती झाली पण भारतात होऊ शकली नाही, कारण इथे कोणाला वैदिक चौकट पार करता आली नाही. जे. बी. शिंदे म्हणाले, बुद्धांच्या मानवतावादी विचारांच्या मनन, चिंतन व अनुकरणासाठी गेली आठ वर्षे हे संमेलन आयोजित केले जात आहे. देसाई, मोहिते, प्रा. शिंदे यांनी विचार मांडले. राजेंद्र यादव यांनी सूत्रसंचालन, विशाखा जितकर यांनी आभार मानले.शासकीय पुजारी नियुक्तीचा अभिनंदनपर ठरावकरवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात शासकीय पुजारी नियुक्त करण्याचा कायदा सरकारने मंजूर केला. यासाठी लढा दिलेल्या कार्यकर्त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्याचबरोबर हाच कायदा महाराष्टÑातील इतर मठ व मंदिरांना लागू करून जमलेल्या पैशांतून समाजहिताची कामे करावीत यासह विविध आठ ठराव जे. बी. शिंदे यांनी मांडले. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.यांचा झाला गौरवसंमेलनात डॉ. जयश्री चव्हाण, गुलाब अत्तार, अशोक चौगुले, बाबूराव शिरसाट यांचा प्रबोधन पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.