शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कागलला आंदोलकही धर्मसंकटात

By admin | Updated: November 4, 2015 00:09 IST

शेतकरी द्विधा मन:स्थितीत : वाळणारा ऊस पाहायचा की ऊसदरासाठी झगडायचं!

दत्तात्रय पाटील - म्हाकवे-चिकोत्रा प्रकल्पामध्ये यंदा अत्यंत कमी पाणीसाठा झाल्यामुळे चिकोत्रा खोऱ्यातील जवळपास ३५ गावांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हातातोंडाशी आलेला उभा ऊस गाळपासाठी घालविण्याच्या मानसिकतेत येथील शेतकरी दिसत आहे, तर आंदोलन उभे केल्याशिवाय एकरकमी एफआरपी मिळणे अशक्य आहे. त्यामुळे आंदोलनामुळे विलंब झाल्यास वाळणाऱ्या उसाकडे पाहत बसायचे की आंदोलनाच्या माध्यमातून एकरकमी एफ.आर.पी. पदरात पाडून घ्यायची, या द्विधा मन:स्थितीत कागल तालुक्यातील आंदोलक असून, त्यांच्यापुढे मोठे धर्मसंकटच उभे ठाकले आहे.तालुक्यातील कारखान्यांनी केवळ मोळी पूजन करून प्रारंभ केला असून, हंगामाच्या दृष्टीने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. हंगाम सुरू केल्यानंतर आंदोलनाचा भडका उडाल्यास गाळप बंद करावे लागते. त्यामुळे कारखान्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. ऊसतोड मजुरांना पगार द्यावा लागतो. गतवर्षी तर हा आर्थिक फटका कोटींच्या घरात गेला होता. त्यामुळे बहुतांश कारखानदारांनी सावध पवित्रा घेत आंदोलनाच्या दिशेवरच हंगामाची नौका हाकण्याचा निर्णय घेणे पसंत केले आहे. यंदा अत्यल्प पावसामुळे चिकोत्रा धरणात केवळ ४६ टक्केच पाणीसाठा असून, या धरणावर चिकोत्रा खोऱ्यातील ३५ गावांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे जून २0१६ पर्यंत या गावांना पिण्याचे पाणी देऊन उर्वरित पाणी शेतीसाठी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी व चिकोत्रा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे याचा विचार करता शेतीला फारच अपुरे पाणी मिळणार आहे.परिणामी, गाळपायोग्य असणारे उभे ऊस त्वरित गाळपास पाठवून भविष्यातील संपूर्ण होणारे आर्थिक नुकसान टाळावे, या मानसिकतेत येथील शेतकरी आहे. मात्र, हा वीक पॉर्इंट (कमकुवतपणा) लक्षात घेऊन एकरकमी ऊसदरासाठी आंदोलन केले नाही तर एफ.आर.पी. कांड्याच्याच पदरात पडणार आहेत. त्यामुळे ना धड सेवा संस्थेचे कर्ज भागणार ना मोठ्या कार्यासाठी उसाची रक्कम हातात येणार याचीही जाणीव आंदोलक शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी स्थिती बनलेले आंदोलक शेतकरीच ‘धर्मसंकटात’ सापडल्याचे चित्र आहे.दरम्यान, काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून बहुतांशवेळा अपुरे पाणी सोडले जाते. त्यामुळे म्हाकवेसह आणूर, गोरंसे, बानगे, मळगे, पिंपळगाव, चौंडळ, केनवड, आदी गावांतील कालव्यालगतच्या उसांना फटका बसतो. परिणामी, शेतकरी संघटना, कारखानदार व शासन यांच्यामध्ये तडजोड होऊन सामोपचाराने हा प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.कागल तालुक्यामध्ये दोन दिवसांपूर्वी आम्ही मोटारसायकल रॅली काढणार होतो. परंतु, आमदार हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थाची भूमिका घेत मंगळवारी सर्व कारखानदारांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. चिकोत्रा खोऱ्यातील पाणी प्रश्न अवघड जागेचं दुखणं बनलं आहे. त्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, हे सत्य आहे. मात्र, मंगळवारच्या बैठकीत सकारात्मक चर्चा न झाल्यास एकरकमी एफ.आर.पी.साठी आंदोलन हे होणारच.- अशोक पाटील, कागल तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना.चिकोत्रा खोऱ्यावर कारखान्यांची मेहरनजरचिकोत्रा खोऱ्यातील शेती आणि शेतकऱ्यांची पाण्याअभावी बिकट परिस्थिती उद्भवली आहे. याची दखल घेत सरसेनापती घोरपडे कारखान्याचे संस्थापक आमदार हसन मुश्रीफ यांनी या खोऱ्यातील ऊसतोडणीला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे. तर मंडलिक कारखान्याच्या सभासदांनी येथील उसाला प्राध्यान्यक्रम देण्याचा ठरावच केला आहे.