शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कागलला आंदोलकही धर्मसंकटात

By admin | Updated: November 4, 2015 00:09 IST

शेतकरी द्विधा मन:स्थितीत : वाळणारा ऊस पाहायचा की ऊसदरासाठी झगडायचं!

दत्तात्रय पाटील - म्हाकवे-चिकोत्रा प्रकल्पामध्ये यंदा अत्यंत कमी पाणीसाठा झाल्यामुळे चिकोत्रा खोऱ्यातील जवळपास ३५ गावांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हातातोंडाशी आलेला उभा ऊस गाळपासाठी घालविण्याच्या मानसिकतेत येथील शेतकरी दिसत आहे, तर आंदोलन उभे केल्याशिवाय एकरकमी एफआरपी मिळणे अशक्य आहे. त्यामुळे आंदोलनामुळे विलंब झाल्यास वाळणाऱ्या उसाकडे पाहत बसायचे की आंदोलनाच्या माध्यमातून एकरकमी एफ.आर.पी. पदरात पाडून घ्यायची, या द्विधा मन:स्थितीत कागल तालुक्यातील आंदोलक असून, त्यांच्यापुढे मोठे धर्मसंकटच उभे ठाकले आहे.तालुक्यातील कारखान्यांनी केवळ मोळी पूजन करून प्रारंभ केला असून, हंगामाच्या दृष्टीने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. हंगाम सुरू केल्यानंतर आंदोलनाचा भडका उडाल्यास गाळप बंद करावे लागते. त्यामुळे कारखान्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. ऊसतोड मजुरांना पगार द्यावा लागतो. गतवर्षी तर हा आर्थिक फटका कोटींच्या घरात गेला होता. त्यामुळे बहुतांश कारखानदारांनी सावध पवित्रा घेत आंदोलनाच्या दिशेवरच हंगामाची नौका हाकण्याचा निर्णय घेणे पसंत केले आहे. यंदा अत्यल्प पावसामुळे चिकोत्रा धरणात केवळ ४६ टक्केच पाणीसाठा असून, या धरणावर चिकोत्रा खोऱ्यातील ३५ गावांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे जून २0१६ पर्यंत या गावांना पिण्याचे पाणी देऊन उर्वरित पाणी शेतीसाठी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी व चिकोत्रा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे याचा विचार करता शेतीला फारच अपुरे पाणी मिळणार आहे.परिणामी, गाळपायोग्य असणारे उभे ऊस त्वरित गाळपास पाठवून भविष्यातील संपूर्ण होणारे आर्थिक नुकसान टाळावे, या मानसिकतेत येथील शेतकरी आहे. मात्र, हा वीक पॉर्इंट (कमकुवतपणा) लक्षात घेऊन एकरकमी ऊसदरासाठी आंदोलन केले नाही तर एफ.आर.पी. कांड्याच्याच पदरात पडणार आहेत. त्यामुळे ना धड सेवा संस्थेचे कर्ज भागणार ना मोठ्या कार्यासाठी उसाची रक्कम हातात येणार याचीही जाणीव आंदोलक शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी स्थिती बनलेले आंदोलक शेतकरीच ‘धर्मसंकटात’ सापडल्याचे चित्र आहे.दरम्यान, काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून बहुतांशवेळा अपुरे पाणी सोडले जाते. त्यामुळे म्हाकवेसह आणूर, गोरंसे, बानगे, मळगे, पिंपळगाव, चौंडळ, केनवड, आदी गावांतील कालव्यालगतच्या उसांना फटका बसतो. परिणामी, शेतकरी संघटना, कारखानदार व शासन यांच्यामध्ये तडजोड होऊन सामोपचाराने हा प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.कागल तालुक्यामध्ये दोन दिवसांपूर्वी आम्ही मोटारसायकल रॅली काढणार होतो. परंतु, आमदार हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थाची भूमिका घेत मंगळवारी सर्व कारखानदारांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. चिकोत्रा खोऱ्यातील पाणी प्रश्न अवघड जागेचं दुखणं बनलं आहे. त्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, हे सत्य आहे. मात्र, मंगळवारच्या बैठकीत सकारात्मक चर्चा न झाल्यास एकरकमी एफ.आर.पी.साठी आंदोलन हे होणारच.- अशोक पाटील, कागल तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना.चिकोत्रा खोऱ्यावर कारखान्यांची मेहरनजरचिकोत्रा खोऱ्यातील शेती आणि शेतकऱ्यांची पाण्याअभावी बिकट परिस्थिती उद्भवली आहे. याची दखल घेत सरसेनापती घोरपडे कारखान्याचे संस्थापक आमदार हसन मुश्रीफ यांनी या खोऱ्यातील ऊसतोडणीला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे. तर मंडलिक कारखान्याच्या सभासदांनी येथील उसाला प्राध्यान्यक्रम देण्याचा ठरावच केला आहे.