शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

परीक्षेतील समन्वयाचा गोंधळ थांबणार!

By admin | Updated: August 30, 2015 23:45 IST

शिवाजी विद्यापीठाचे पाऊल : परीक्षा विभागात नव्या ‘आयटी’ विभागाचा प्रारंभ

कोल्हापूर : परीक्षा विभाग, संगणक केंद्र आणि एमकेसीएल अशा तीन वेगवेगळ्या विभागांतून शिवाजी विद्यापीठाचे परीक्षाविषयक कामकाज चालत होते. त्यामुळे अनेकदा येथील प्रक्रियेतील समन्वयाचा गोंधळ निर्माण व्हायचा. मात्र, आता ते थांबणार आहे. कारण, विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा विभागात स्वतंत्र असा माहिती व तंत्रज्ञान (आयटी) आणि संगणकीयदृष्टीने परीक्षेचे कामकाज करणारा विभाग सुरू केला आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार विद्यापीठाने १९९५ च्या सुमारास संगणक केंद्राची निर्मिती केली. या केंद्राचा उद्देश विद्यापीठ कामकाजासाठी आवश्यक संगणकीय प्रणाली विकसित करणे आणि परीक्षाविषयक कामकाजाला साहाय्य करणे असा होता. काही वर्षांनंतर या केंद्रावर परीक्षा विषयक कामकाजाची अतिरिक्त जबाबदारी पडली. वार्षिक पद्धतीने परीक्षा होत असताना केंद्राने उल्लेखनीय काम केले. मात्र, सत्र पद्धतीच्या परीक्षांमुळे केंद्रावरील कामकाजाचा ताण वाढला तसेच हे केंद्र, एमकेसीएल आणि परीक्षा विभाग अशा तीन स्वतंत्र विभागांकडून परीक्षाविषयक कामकाज होऊ लागले. त्यांचा फटका समन्वयाला बसला आणि कामकाजात गोंधळ सुरू झाला. वास्तविकपणे परीक्षाविषयक कामकाज एकाच छताखाली होणे आवश्यक होते. त्यानुसार परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी प्रशासनाला प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव आणि त्याचे महत्त्व लक्षात घेऊन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी परीक्षा विभागात नवा आयटी विभाग सुरू करण्याचा निर्णय घेऊन कार्यवाही सुरू केली. त्याला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. या नव्या विभागासाठी सध्या संगणक केंद्रात परीक्षाविषयक कामकाज करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांची परीक्षा विभागात नियुक्ती केली तसेच या विभागाची जबाबदारी परीक्षा नियंत्रकांवर सोपविली. या नव्या विभागाच्या कामकाजाला गेल्या सहा दिवसांपासून प्रारंभ झाला आहे. (प्रतिनिधी)कार्यक्षमता, गती वाढणार...परीक्षेचे कामकाज तीन विभागांकडून चालत होते. त्यात काहीवेळा संबंधित विभाग एखाद्या कामाला विलंब लागल्यास एकमेकांकडे बोट दाखवत होते. मात्र, आता परीक्षाविषयक सर्व कामकाजांची जबाबदारी परीक्षा विभागावर असल्याने आता त्याला लगाम बसणार आहे. शिवाय निकालातील दुरूस्ती तसेच अन्य बाबींसाठी विद्यार्थ्यांची होणारी धावपळ थांबणार आहे. संगणक केंद्र व एमकेसीएलकडे असलेली परीक्षाविषयक माहिती नव्या विभागात संकलित केली जाणार आहे. यासाठी मुख्य व्यवस्थापकीय अधिकारीपदी मिलिंद जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.५६४ परीक्षा, ६५०० प्रश्नपत्रिकापरीक्षा विभागातर्फे मार्च-एप्रिल आणि आॅक्टोबर-नोव्हेंबर या सत्रात विविध अभ्यासक्रमांच्या एकूण ५६४ परीक्षा घेतल्या जातात. यासाठी ६५०० प्रश्नपत्रिकांची छपाई केली जाते. सत्र पद्धतीमुळे परीक्षा विभागाचे कामकाज वर्षभर चालते. ते लक्षात घेऊन या विभागात नवा आयटी विभाग सुरू केल्याबद्दल शिक्षक, कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.