शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

Kolhapur News: शिवाजी विद्यापीठातील सिनेट बैठकीत गोंधळ, अभाविपचे कार्यकर्ते सभागृहात घुसले

By संदीप आडनाईक | Updated: March 10, 2023 13:51 IST

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी हस्तक्षेप करून चर्चा करण्याचे निमंत्रण दिले

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सिनेट बैठकीत सभा सुरू असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते घुसले आणि घोषणाबाजी करत महाविद्यालयीन निवडणुका झाल्याच पाहिजेत या मागणीसाठी सभागृहात बैठक मारून गोंधळ घातला. यासंदर्भात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी हस्तक्षेप करून या सभागृहात याबद्दल चर्चा करता येणार नाही असे सांगून १६ मार्च रोजी चर्चा करण्याचे निमंत्रण दिले.शिवाजी विद्यापीठाची अधिसभा बैठक सुरू झाल्यानंतर साडे बारा वाजण्याच्या सुमारास राजश्री शाहू सभागृहात घुसून अभविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी "भारत माता की जय", "विद्यार्थ्यांना न्याय द्या", "आत्महत्याग्रस्त प्राध्यापकांना न्याय द्या", "विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका चालू होणार कधी?" अशा घोषणा  देत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सुमारे पंधरा-सोळा कार्यकर्ते घुसले. महाविद्यालयीन निवडणुका घ्याव्यात आणि इतर मागण्यांसाठी फलक घेऊन कार्यकर्ते कुलगुरूंच्या समोर ठिय्या मारून बसले. सुमारे २० मिनिटे हा गोंधळ सभागृहात सुरू होता. सुरक्षारक्षकांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. प्र कुलगुरू आणि कुलसचिव यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी आणि अधिसभा सदस्य ऍड. स्वागत परुळेकर यांनी समजावून सांगितले. कुलगुरू शिर्के यांनी अधिसभा बैठकीत बेकायदेशीर प्रवेश केल्याबद्दल आणि पूर्वपरवानगी न घेतल्याबद्दल कानउघाडणी केली.  कार्यकर्त्यांचा रोष लक्षात घेऊन कुलगुरूंनी १६ मार्च रोजी दुपारी तीन वाजता चर्चेचे निमंत्रण दिले. यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणा देत सभागृह सोडले. या आंदोलनात प्रदेश सहमंत्री अमोघ कुलकर्णी, दिग्विजय गरड, दिनेश हुमनाबदे, रोहन कडोले, सूरज मालगावे, प्रविण डिगेकर, जय पाटील, पराग कुलकर्णी, गणेश डूबल सहभागी झाले होते.अभाविपच्या मागण्या

  • आत्महत्याग्रस्त प्राध्यापक यांच्या कुटुंबास योग्य ती आर्थिक मदत विद्यापीठाने करावी.
  • विद्यापीठातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना कायम करून घेण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा.
  • तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी.
  • वारंवार होणाऱ्या पेपरफुटीस जबाबदार अधिकर्यांवर कठोर कारवाई करावी
  • नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका या येत्या शैक्षणिक वर्षा २०२३-२४ साठी घेणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर करावे.
  • विद्यापीठातील सर्व प्रभारी पद्धतीने भरलेली पदे लवकरात लवकर कायमस्वरूपात भरावी.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ