शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

प्रोत्साहन अनुदानाबाबत संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 21:41 IST

कोल्हापूर : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील प्रोत्साहनपर अनुदानाबाबत जिल्'ात संभ्रमावस्था पसरली आहे

ठळक मुद्देमार्च २०१७ अखेर उचलीची जुलैमध्ये परतफेड कशी करायचीजिल्'ातील ७० टक्के शेतकरी अनुदान योजनेच्या बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्क --राजाराम लोंढे, ---कोल्हापूर : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील प्रोत्साहनपर अनुदानाबाबत जिल्'ात संभ्रमावस्था पसरली आहे. सन २०१५ ते २०१६ आर्थिक वर्षात नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना हे अनुदान मिळणार आहे, पण त्यासाठी त्यांना सन २०१६-१७ मध्ये उचल केलेले कर्ज जुलै २०१७ पर्यंत भरणारेच पात्र ठरणार आहेत. जुलै २०१६ ते मार्च २०१७ पर्यंत उचल केलेल्या कर्जाची परतफेड जुलै २०१७ मध्ये कशी करायची? हा गुंता असून मुदतीअगोदरच परतफेडीची सक्तीने केल्याने जिल्'ातील ७० टक्क्यांहून अधिक शेतकरी अनुदान योजनेच्या बाहेर जाणार आहेत.

राज्यातील आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीची घोषणा केली. जून २०१६ अखेर थकबाकीदार असणाºया शेतकºयांना दीड लाख रुपये कर्जमाफी मिळणार आहे. केवळ थकबाकीदारांना दिलासा न देता कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांनाही २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला; पण या अनुदानासाठी मार्च २०१६ च्या कर्जाबरोबरच मार्च २०१७ चे कर्जाची जुलै २०१७ अखेर परतफेड करण्याची अट घातली आहे.

ऊसपट्ट्यात साखर कारखान्यांचा हंगाम, त्यातून होणारी वसुलीची प्रक्रिया पाहता येथे ३० जून हा कर्ज परतफेडीची मुदत असते. त्यामुळे जिल्हा बॅँकेशी संबंधित शेतकºयांचे १ जुलैनंतरच खरे वर्ष सुरू होते. त्यामुळे १ जुलै २०१६ ते मार्च २०१७ अखेर उचल केलेल्या कर्जाची जून २०१८ पर्यंत परतफेडीची मुदत आहे; पण प्रोत्साहनपर अनुदानाच्या निकषांनुसार हे कर्ज जुलै २०१७ पर्यंतच परत करावे लागणार होते. कर्ज घेतल्यानंतर तीन महिन्यांतच कसे परत करायचे? मुदतीपूर्वी परतफेड करणे अशक्य झाल्याने जिल्'ातील ७० टक्के शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित राहणार आहेत. जिल्हा बॅँकेकडून जुलै २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत साधारणत: सहाशे कोटींचे कर्ज वाटप होते. त्यामुळे या कालावधीत उचल करणाºया शेतकºयांना त्याचा फटका बसणार आहे.------------------------------------------------चौकट-कमीत कमी कर्जमाफी देण्यासाठीच प्रयत्नशेतकºयांना निकषांमध्ये जखडून ठेवत कमीत कमी कर्जमाफी देण्याचे धोरण राज्य सरकारचे सुरुवातीपासून आहे. त्यामुळे निकषांच्या चाळणीतून जरी सुटले तर इतर बाबींमध्ये अडकून ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची संतप्त भावना शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.अपात्र ११२ कोटींचा गुंताही कायमसन २००९ नंतर वाटप केलेले आणि थकीत असलेल्या शेतकºयांनाच दीड लाख कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे; पण केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील ११२ कोटींचे सन २०१२ मध्ये जिल्हा बॅँकेने सहकार विभागाच्या मान्यतेने पुनर्गठन केले आहे; पण सहकार विभागाच्या म्हणण्यानुसार हे कर्ज सन २००९ पूर्वी उचल केले असल्याने त्या

तात्पुरते पात्र, अपात्रतेचा घोळलेखापरीक्षकांनी तपासणी करून याद्या तयार केल्या तरी तात्पुरते पात्र व अपात्र म्हणून गृहीत धरल्या जाणार आहेत. पात्र, अपात्रवर तक्रारी येईल तसा बदल होणार असल्याने याद्यांचा घोळ लवकर मिटेल असे वाटत नाही. 

सरकारच्या या निर्णयाने प्रामाणिक परतफेड करणाºया शेतकºयांवर अन्याय होणार आहे. सरकार अशीच भूमिका घेणार असेल तर कर्जमाफीची घोषणा फसवीच म्हणावी लागेल.- भरमूण्णा पाटील (माजी राज्यमंत्री)