शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

गिरण्यांच्या व्याजमाफीवर संभ्रम

By admin | Updated: January 30, 2017 00:01 IST

शासनाने घ्यावी जबाबदारी : तोट्यातील सहकारी सूतगिरण्यांना कर्ज कोण देणार ?

इचलकरंजी : राज्यातील आठ सूतगिरण्या वगळता १३० सूतगिरण्या आर्थिक नुकसानीत आहेत. त्यामुळे अशा आर्थिक अरिष्टात असलेल्या सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून आर्थिक साहाय्य कसे उपलब्ध होणार? यामुळे सूतगिरण्यांचे व्यवस्थापन संभ्रमावस्थेत पडले आहे.सहकार क्षेत्रातील सूतगिरण्यांना आर्थिक अरिष्टातून बाहेर काढण्याच्या उदात्त हेतूने सूतगिरण्यांनी घेतलेल्या वित्तीय संस्थांच्या अर्थसाहाय्यावर शासन व्याज भरेल, असा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला. कोणत्याही वित्तीय संस्थेकडून अर्थसाहाय्य घेताना संबंधित सूतगिरण्यांना त्यांचा तीन वर्षांचा आर्थिक ताळमेळ नफ्यात असल्याचे सादर केले पाहिजे. त्याची खात्री करूनच वित्तीय संस्था त्या गिरण्यांना कर्ज देतात. दोन वर्षांपासून वस्त्रोद्योगामध्ये मंदीचे वातावरण आहे. अशा पार्श्वभूमीवर गेल्या सात-आठ महिन्यांपासून आर्थिक मंदी गडद होत गेली. त्यातच एप्रिल महिन्यामध्ये कापसाचे दर भडकले. उत्पादन खर्च वाढला तरी त्या प्रमाणात सुताला खप नव्हता. वस्त्रोद्योगातील मंदीमुळे मागणी नाही. त्यामुळे सुताला अपेक्षित तो दर मिळाला नाही. याचा परिणाम म्हणून सूतगिरण्यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागले.सूतगिरण्यांच्या क्षमतेनुसार त्यांना पाच-सहा कोटी रुपयांपासून दहा-पंधरा कोटी रुपयांपर्यंत नुकसान सहन करावे लागले. अशा स्थितीमुळे कापूस व्यापाऱ्यांची देणी फिटली नसल्यामुळे व्यापाऱ्यांकडून आणखीन कापूस मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या. म्हणून सूतगिरण्यांनी शासन दरबारी अर्थसाहाय्य मिळण्याकरिता प्रयत्न सुरू केले. महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्यावतीने सरकारकडे गेल्या सहा महिन्यांपासून साकडे घालण्यात आले. तर त्यापूर्वी नेमलेल्या आमदार हाळवणकर एक सदस्यीय समितीने सूतगिरण्यांना प्रति स्पिंडल तीन हजार रुपयांप्रमाणे खेळते भांडवल उपलब्ध करून द्यावे. ज्यामुळे या सूतगिरण्या आर्थिक अरिष्टातून बाहेर पडतील, अशी शिफारस अहवालामध्ये सूचित केली. सूतगिरण्यांच्या मागण्यांबाबत वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या स्तरावर अनेकवेळा उहापोह झाला. अखेर हा प्रस्ताव ९ जानेवारीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर गेला. आर्थिकदृष्ट्या अरिष्टात असलेल्या सूतगिरण्यांनी वित्तीय संस्थांकडून कर्ज घ्यावे. त्यावरील व्याज शासन भरेल, असा निर्णय या बैठकीमध्ये घेतला. राज्यात असलेल्या १३८ सहकारी सूतगिरण्यांपैकी १३० सूतगिरण्या आर्थिकदृष्ट्या नुकसानीत आहेत. त्यामुळे अशा गिरण्यांचा वार्षिक ताळमेळ असलेला अहवाल नुकसानीत आहे. नुकसानीत असलेल्या सूतगिरण्यांना बॅँका किंवा अन्य कोणत्याही वित्तीय संस्था कर्ज उपलब्ध करून देत नाहीत. कारण नुकसानीत असलेल्या सूतगिरण्यांकडून कर्जाच्या हप्त्याची परतफेड होणार का? याचीच विवंचना बॅँका-वित्तीय संस्थांना असते. तरीही कर्ज उपलब्ध करून दिल्यास ते रिझर्व्ह बॅँकेच्या नियमाविरुद्ध असल्याने बॅँका नुकसानीतील सूतगिरण्यांना कशाप्रकारे कर्ज उपलब्ध करून देणार, हा एक मोठा प्रश्नच आहे. (प्रतिनिधी)