शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिर परिसरातून हटवल्यास संघर्ष अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 10:58 IST

Muncipal Corporation Kolhapur- फेरीवाल्यांना सध्या आहे त्याच ठिकाणी पट्टे मारून व्यवसाय करण्यास देण्यात यावे. महापालिकेने जर अंबाबाई मंदिर परिसरातील फेरीवाल्यांना हटवले तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा सर्व पक्षीय फेरीवाला कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. महापालिकेने कारवाई केल्यास शहरातील सर्व भाजी मंडई बंद ठेवण्याचीही भूमिका घेतली.

ठळक मुद्देअंबाबाई मंदिर परिसरातून हटवल्यास संघर्ष अटळफेरीवाला कृती समिती : आहे त्याच जागेवर व्यवसाय करण्यावर ठाम

कोल्हापूर : फेरीवाल्यांना सध्या आहे त्याच ठिकाणी पट्टे मारून व्यवसाय करण्यास देण्यात यावे. महापालिकेने जर अंबाबाई मंदिर परिसरातील फेरीवाल्यांना हटवले तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा सर्व पक्षीय फेरीवाला कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. महापालिकेने कारवाई केल्यास शहरातील सर्व भाजी मंडई बंद ठेवण्याचीही भूमिका घेतली.महापालिका प्रशासन शहरातील अतिक्रमण कारवाईवर ठाम आहे. मंदिरे, हॉस्पिटल या परिसरातील १०० मीटरमधील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. फेरीवाल्यांचा याला विरोध आहे. यासंदर्भात फेरीवाला कृती समितीने सकाळी शिवाजी चौकात निदर्शने केली. सायंकाळी शिष्टमंडळाने आ. चंद्रकांत जाधव यांची भेट घेतली. अंबाबाई मंदिर परिसरातील फेरीवाल्यांना हटवल्यास तीव्र आंदोलनाची भूमिका फेरीवाल्यांनी घेतली.आ. जाधव म्हणाले, महापालिका प्रशासनाला फेरीवाल्यांना पट्टे मारून व्यवसाय करण्याची मुबा देण्याची सूचना केली आहे. आज, मंगळवारी यावर तोडगा निघेल, अशी अपेक्ष आहे अन्यथा बुधवारी प्रशासन, फेरीवाला यांच्यासमवेत बैठक घेतली जाईल.चौकटफेरीवाल्यांच्या मागण्यासंदर्भात १५ दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाला पत्र देऊन बैठक घेण्याची मागणी केली. सोमवारी शिवाजी मार्केट येथील आंदोलनावेळीही बैठकीसाठी चार वेळा फोन केला. मात्र, प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही. अंबाबाई मंदिर परिसरात ५० वर्षांपासून फेरीवाला व्यवसाय करतात. त्यांना हटवू देणार नाही. आहे तेथेच वाहतुकीला अडथळा होणार नाही, असे पट्टे मारून व्यवसाय करू द्यावा, अन्यथा प्रशासनाशी संघर्ष अटळ असल्याचे सर्व पक्षीय कृती समितीचे आर.के. पोवार यांनी म्हटले आहे.महापालिका प्रशासनाकडून मंदिर परिसरातील अतिक्रमणावरील कारवाईवर ठाम आहेत. या उलट फेरीवालेही येथून हटण्यास तयार नाहीत. महापालिकेने कारवाई सुरू केल्यास भाजी मंडई बंदच ठेवू, अशी टोकाची भूमिका फेरीवाल्यांनी घेतली आहे. महापालिका, फेरीवाले यांच्यातील वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर