शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दोन तरुणांच्या संकल्पनेतून बनाचीवाडी ग्रामपंचायतीची तंत्रज्ञानाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 21:20 IST

राधानगरी : गावातील नागरिकांना हवे असलेले दाखले घरबसल्या मिळावेत, सुविधाबाबत असलेल्या उणीवा तत्काळ निदर्शनास आणून देता याव्यात, तरुण पिढीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गावच्या

राधानगरी : गावातील नागरिकांना हवे असलेले दाखले घरबसल्या मिळावेत, सुविधाबाबत असलेल्या उणीवा तत्काळ निदर्शनास आणून देता याव्यात, तरुण पिढीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गावच्या विकासात सहभाग घ्यावा अशा उद्देशाने बनाचीवाडी (ता.राधानगरी) ग्रामपंचायतीने स्वतंत्र अप्लिकेशन तयार केले आहे. याचा प्रारंभ पंचायत समितीचे सभापती दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. लोकांनी याचा वापर करण्यास सुरवातही केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सरपंच रेश्मा पाटील यांनी सांगितले.गावातीलच अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विशाल व निखील विजय घोलकर या दोघा भावांनी ते तयार केले आहे.अशा प्रकारची सेवा देणारी तालुक्यातील हि पहिलीच ग्रामपंचायत ठ्यारली आहे.

राधानगरीपासून केवळ दोन किमी अंतरावर सुमारे १८०० लोकसंख्या असलेले बनाचीवाडी ह गाव आहे. येथील विशाल व निखील हे दोघे आधुनिक तंत्रज्ञानाचे सध्या शिक्षण घेत आहेत. सरपंच रेश्मा पाटील याच्यांशी चर्चा केल्यानंतर स्वतंत्र अप्लिकेशनची कल्पना पुढे आली आणि सहा महिन्यापासून घोलकर बंधू त्यावर काम करत होते.

या प्रणालीनुसार गावातील नागरिकांना आधार नंबरसह आपल्या मोबाइल वरून हव्या असलेल्या दाखल्यांची मागणी करता येईल,मिळणा?्या सुविधाबाबत असलेल्या तक्रारी नोंदवता येतील.ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत माहिती करुन घेता येईल. त्यासाठी ग्रामपंचायतीत जाण्याची गरज नाही घरातून किव्हा कोठूनही हे करता येईल. त्यासाठी ग्रामपंचायतीने दररोज येणा?्या संदेशाची माहिती घेवून त्याबाबत काय कार्यवाही केली त्याबाबतची माहिती दुपारनंतर संबधिताना संदेशाद्वारे कळविली जाईल.अशी व्यवस्था केली आहे.

याची सुरवात सभापती दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी सरपंच रेश्मा पाटील,उपसरपंच बाळासो नरसाळे,ग्रामसेवक महेश पाटील,जयवंत पत्ताडे,रघुनाथ परीट,अनिता वंजारे,शोभा धनवडे,सीताबाई कोंडवळ,सारिका परीट,जयश्री काशीद,उमेश जाधव यांच्यासह ग्रामस्थ,कर्मचारी उपस्थित होते.

राधानगरी- बनाचीवाडी ग्रामपंचायतीने सुरु केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुविधेचा प्रारंभ करताना सभापती दिलीप कांबळे,सरपंच रेश्मा पाटील व अन्य