शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

दोन तरुणांच्या संकल्पनेतून बनाचीवाडी ग्रामपंचायतीची तंत्रज्ञानाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 21:20 IST

राधानगरी : गावातील नागरिकांना हवे असलेले दाखले घरबसल्या मिळावेत, सुविधाबाबत असलेल्या उणीवा तत्काळ निदर्शनास आणून देता याव्यात, तरुण पिढीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गावच्या

राधानगरी : गावातील नागरिकांना हवे असलेले दाखले घरबसल्या मिळावेत, सुविधाबाबत असलेल्या उणीवा तत्काळ निदर्शनास आणून देता याव्यात, तरुण पिढीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गावच्या विकासात सहभाग घ्यावा अशा उद्देशाने बनाचीवाडी (ता.राधानगरी) ग्रामपंचायतीने स्वतंत्र अप्लिकेशन तयार केले आहे. याचा प्रारंभ पंचायत समितीचे सभापती दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. लोकांनी याचा वापर करण्यास सुरवातही केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सरपंच रेश्मा पाटील यांनी सांगितले.गावातीलच अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विशाल व निखील विजय घोलकर या दोघा भावांनी ते तयार केले आहे.अशा प्रकारची सेवा देणारी तालुक्यातील हि पहिलीच ग्रामपंचायत ठ्यारली आहे.

राधानगरीपासून केवळ दोन किमी अंतरावर सुमारे १८०० लोकसंख्या असलेले बनाचीवाडी ह गाव आहे. येथील विशाल व निखील हे दोघे आधुनिक तंत्रज्ञानाचे सध्या शिक्षण घेत आहेत. सरपंच रेश्मा पाटील याच्यांशी चर्चा केल्यानंतर स्वतंत्र अप्लिकेशनची कल्पना पुढे आली आणि सहा महिन्यापासून घोलकर बंधू त्यावर काम करत होते.

या प्रणालीनुसार गावातील नागरिकांना आधार नंबरसह आपल्या मोबाइल वरून हव्या असलेल्या दाखल्यांची मागणी करता येईल,मिळणा?्या सुविधाबाबत असलेल्या तक्रारी नोंदवता येतील.ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत माहिती करुन घेता येईल. त्यासाठी ग्रामपंचायतीत जाण्याची गरज नाही घरातून किव्हा कोठूनही हे करता येईल. त्यासाठी ग्रामपंचायतीने दररोज येणा?्या संदेशाची माहिती घेवून त्याबाबत काय कार्यवाही केली त्याबाबतची माहिती दुपारनंतर संबधिताना संदेशाद्वारे कळविली जाईल.अशी व्यवस्था केली आहे.

याची सुरवात सभापती दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी सरपंच रेश्मा पाटील,उपसरपंच बाळासो नरसाळे,ग्रामसेवक महेश पाटील,जयवंत पत्ताडे,रघुनाथ परीट,अनिता वंजारे,शोभा धनवडे,सीताबाई कोंडवळ,सारिका परीट,जयश्री काशीद,उमेश जाधव यांच्यासह ग्रामस्थ,कर्मचारी उपस्थित होते.

राधानगरी- बनाचीवाडी ग्रामपंचायतीने सुरु केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुविधेचा प्रारंभ करताना सभापती दिलीप कांबळे,सरपंच रेश्मा पाटील व अन्य