शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

शिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 17:17 IST

शिवाजी विद्यापीठाच्या संगणक प्रणालीवर चीनमधील हॅकर्सकडून सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न दि. १४ सप्टेंबरला झाला. हा प्रयत्न विद्यापीठाच्या संगणक केंद्राने हाणून पाडला आहे. विद्यापीठातील माहिती सुरक्षित असल्याचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले.

ठळक मुद्देसंगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडलाशिवाजी विद्यापीठातील माहिती सुरक्षित : देवानंद शिंदे

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संगणक प्रणालीवर चीनमधील हॅकर्सकडून सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न दि. १४ सप्टेंबरला झाला. हा प्रयत्न विद्यापीठाच्या संगणक केंद्राने हाणून पाडला आहे. विद्यापीठातील माहिती सुरक्षित असल्याचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले.कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळाला रोज सुमारे साडेतीन लाख वापरकर्ते (युझर) भेट (हिटस्) देतात. विद्यापीठाच्या संगणक प्रणालीवर दि. १४ सप्टेंबरला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सायबर ट्राफिक दिसून आले. त्यासह प्रणालीचा वेग काहीसा मंदावल्याचे दिसून आले. असा प्रकार अधून-मधून वारंवार घडत असल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पण, काहीवेळात वेग मंदावण्याचे प्रमाण वाढले.

संगणक प्रणालीवर सायबर हल्ल्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून आले. त्यावर संगणक केंद्रातील तज्ज्ञांनी तातडीने सुरक्षाप्रणालीच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ केली. त्याच्या जोरावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

आपली फायरवॉल ही प्रणाली सक्षम आहे. त्यासह सायबर ट्राफिकचे लॉग अ‍ॅनालेसिस नियमितपणे केले जात असल्याने हॅकर्सला संगणकप्रणालीत प्रवेश करता आला नाही. लोकेशन्स् आणि लॉग अ‍ॅनालेसिसवर पाहता या हल्ल्याचा प्रयत्न चायनामधून झाल्याचे दिसून येते.

या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे विद्यापीठातील माहितीला कोणताही धोका पोहोचलेला नाही. सर्व माहिती सुरक्षित आहे. विद्यार्थी, प्राध्यापकांसह विद्यापीठाच्या घटकांनी काळजी करू नये.

‘हिट्स’ जादा असलेल्या ठिकाणी हल्लाहिट्स जादा असणाऱ्या, परिणामकारकता अधिक असलेल्या संगणकप्रणाली, संकेतस्थळांवर हॅकर्सकडून सायबर हल्ला केला जातो. त्यासाठी हॅकर्सकडून सॉफटवेअर रोबोटचा वापर केला जातो. हे रोबोटस् कोणत्या संगणकप्रणालीचे कोड वीक आहेत अथवा पाथ खुले आहेत. त्याचा शोध घेऊन संबंधित माहिती हॅकर्संना उपलब्ध करून देतात.

एखाद्या संस्था, व्यक्तीची बदनामी करणे, माहितीची चोरी करणे, नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने असे सायबर हल्ले होतात. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील रोजच्या हिटस्ची संख्या जादा असल्याने सायबर हल्ल्याचा प्रयत्न झाला असल्याची शक्यता संगणकशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. आर. के. कामत यांनी व्यक्त केली.

दक्षता घेणे आवश्यकविद्यापीठाला सायबर सिक्युरिटीमधील संशोधनासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास विभागाकडून सात कोटी रुपयांचे अनुदान जाहीर झाले. याठिकाणी सायबर सुरक्षेचे सेंटर आॅफ एक्सलन्स् होणार असल्याने विद्यापीठाने दक्षता घेणे आवश्यक आहे. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर