शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

रोज मास्क नसणाऱ्या १५ जणांवर कारवाई करण्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:30 IST

commissioner, muncipaltyCarporation, kolhapurnews मास्क नसणाऱ्या किमान १५ नागरिकांवर कारवाई करूनच सायंकाळी कायार्लयात माघारी परता, अशी सक्ती केएमटीमधील पथकातील कर्मचाऱ्यांवर वरीष्ठांकडून केली जात आहे. पावत्या केल्या नाहीत तर तुमच्या विरोधात रिपोर्ट करू, अशी धमकीही दिली जात आहे. वरिष्ठांच्या आदेशामुळे येथील कर्मचारी दबावात आहेत.

ठळक मुद्देरोज मास्क नसणाऱ्या १५ जणांवर कारवाई करण्याची सक्ती केएमटी पथकातील कर्मचाऱ्यांसमोर अडचण

कोल्हापूर : मास्क नसणाऱ्या किमान १५ नागरिकांवर कारवाई करूनच सायंकाळी कायार्लयात माघारी परता, अशी सक्ती केएमटीमधील पथकातील कर्मचाऱ्यांवर वरीष्ठांकडून केली जात आहे. पावत्या केल्या नाहीत तर तुमच्या विरोधात रिपोर्ट करू, अशी धमकीही दिली जात आहे. वरिष्ठांच्या आदेशामुळे येथील कर्मचारी दबावात आहेत.कोरोना असल्यामुळे प्रवासी संख्या कमी झाली असून, केएमटीने बसेस संख्या कमी केली आहे. यामुळे चालक आणि वाहकांना काम मिळत नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मास्क नसणाऱ्यांवर कारवाईसाठी केएमटीचे पथक नियुक्त केले. या मागे कर्मचाऱ्यांना काम आणि कोरोनावर नियंत्रण असा दुहेरी उद्देश आहे. १८ पथकामार्फत कारवाई सुरू असून चालक, वाहक असे १०० कर्मचारी नियुक्त केले आहेत.सध्या बहुतांशी नागरिकांकडून महापालिकेच्या सर्व नियमांचे पालन केले जात आहे. जुन ते सप्टेंबरच्या तुलनेत मास्क, सोशल डिस्टन्स, हँडग्लोज न घालणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. परिणामी केएमटी पथकाला कारवाईवर मर्यादा येत आहेत. असे असताना वरिष्ठांकडून कारवाईसाठी उद्दिष्टे दिली आहेत. दिवसभरात किमान १५ नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश आहेत. आयुक्तांनीच सक्त ताकीद दिली असल्याचा दाखला त्यांच्याकडून दिला जात आहे. दिवसभरात मास्क नसणारे कोणी आढळलेच नाही तर आमचा काय दोष आहे, अशी प्रतिक्रिया पथकातील कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरcommissionerआयुक्त