शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जिल्ह्यातील आठ गावांतील पाणलोटांची तपासणी पूर्ण

By admin | Updated: July 21, 2015 01:44 IST

दोन खास पथके : चार वर्षांतील प्रकल्पांची चौकशी

 विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ४१७ गावांतील २९८ पाणलोट प्रकल्पांपैकी पहिल्या टप्प्यांतील आठ गावांतील कामांची चौकशी सोमवारी पूर्ण झाली. अशी चौकशी एकूण चार टप्प्यांत होणार असून त्याचा अहवाल थेट विधिमंडळाला सादर होणार आहे. त्याची मुदत २७ जुलैपर्यंत असली तरी तोपर्यंत गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचे काम जास्त असल्याने हा अहवाल लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन प्रकल्पामध्ये (वसुंधरा पाणलोट) जिल्ह्यातील कामांत सुमारे ३० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार विधानसभेत १८ जुलैला झाली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीने दोन पथके करून ही चौकशी सुरू केली आहे. कृषी महाविद्यालयातील कृषी अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रोफेसर रविकिरण माने, अफार्म पुणे संस्थेचे जिल्हा अभियांत्रिकी संंपर्क अधिकारी प्रदीप साळवे व लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता किरण पाटील यांचे प्रतिनिधी हे पाणलोटांची प्रत्यक्ष जाग्यावर जावून पाहणी व खर्च झालेला निधी, कामाचा दर्जा याची चौकशी करत आहेत. जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी सागर वाळवेकर आणि पाणीपुरवठा व जल:निस्सारण विभागाचे सहाय्यक लेखाधिकारी अरुण मांगलेकर यांचे पथक या कामांच्या कागदपत्रांची छाननी करत आहे. अतिरिक्त प्रकल्प व्यवस्थापक(वसुंधरा प्रकल्प) हणमंत इंगवले हे समितीचे सदस्य सचिव आहेत. या कामातील गैरव्यवहाराबद्दल वृत्तपत्रांनी झोड उठवलीच शिवाय त्यासंबंधीची तक्रार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही झाली होती. आठ गावांतील कामांची पाहणी केल्यावर कामे झाली आहेत, त्यासाठीचे साहित्यही जाग्यावर आहे परंतु या कामांचा हिशेब ठेवण्यात हयगय झाल्याचे आढळल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.