शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

तालुक्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे

By admin | Updated: September 6, 2015 23:28 IST

जिल्हा परिषदेचा निर्णय : शिक्षण विभागाचा पुढाकार, १२ लाखांचा निधी

दत्तात्रय पाटील - म्हाकवे  गावकामगार तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि ग्रामसेवकांपासून सी.ई.ओ.पर्यंत कोणतीही शासकीय नोकरी मिळविण्यासाठी राज्य व केंद्र स्तरावर विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. मात्र, या स्पर्धांची तयारी करताना ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांची दमछाक होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून शिक्षण विभागाच्या पुढाकाराने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांची स्थापना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. प्रत्येक तालुक्याला एक केंद्र देण्यात येणार असून, त्यासाठी प्रत्येकी लाखाचा निधी देण्यात येणार आहे.या निधीतून यूपीएससी., एमपीएससी व इतर अन्य स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके, संदर्भ ग्रंथ व आवश्यक फर्निचरही घेता येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना या परीक्षेची तयारी करण्यासाठी बळकटी मिळणार आहे.या परीक्षेच्या अभ्यासासाठी आवश्यक संदर्भ साधने, पुस्तके, ग्रंथ यांच्या किमती जास्त आहेत. त्यामुळे सामान्य, गोरगरीब कुटुंबातील परीक्षार्थींना ही पुस्तके खरेदी करून परीक्षेला सामोरे जाणे आर्थिकदृष्ट्या आवाक्याच्या बाहेरचे आहे. याचा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण समितीने विचार करून प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे जिल्ह्यात १२ मार्गदर्शन केंद्रांची निर्मिती करून त्यांना प्रत्येकी एक लाख याप्रमाणे १२ लाख रुपये जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून देण्यात येणार आहेत.शासनमान्य वाचनालये, शाळा, विद्यालये, महाविद्यालये यासारख्या घटकांमार्फत ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे चालविली जाणार आहेत. ज्या सार्वजनिक वाचनालये अथवा शाळांमध्ये या केंद्राला मंजुरी मिळेल, तेथे या उमेदवारांना अभ्यासासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी. तसेच या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारता येणार नाही. तसे हमीपत्रच देणे बंधनकारक राहणार आहे.जिल्हा परिषदेचा पथदर्शी प्रयोगग्रामीण भागातील मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी. त्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणे सोपे जावे, या हेतूने जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे मार्गदर्शन केंद्रांच्या निर्मितीचा केलेला विचार उल्लेखनीय आहे. यासाठी स्वनिधीतून १२ लाखांचा निधीही उपलब्ध केला आहे. त्यामुळे असा पथदर्शी प्रयोग राबविणारी कोल्हापूर ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे.