शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
9
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
10
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
11
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
12
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
13
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
14
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
15
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
16
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
17
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
18
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
19
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
20
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?

कंपनीचा नाकर्तेपणा नागरिकांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:29 IST

म्हाकवे : लिंगनूर-कापशी ते देवगड या आंतरराज्य मार्गाच्या कामाची मुदत संपून आठ महिने उलटले तरी काम अपूर्णच आहे.सुमारे २२० ...

म्हाकवे : लिंगनूर-कापशी ते देवगड या आंतरराज्य मार्गाच्या कामाची मुदत संपून आठ महिने उलटले तरी काम अपूर्णच आहे.सुमारे २२० कोटी इतका निधी मंजूर होऊनही तीन वर्षांत या रस्त्याचे अवघे ३० टक्केच काम झाले आहे.या रस्त्याच्या कामाचा ठेका घेतलेल्या जितेंद्रसिंग कंपनीने क्षमता नसतानाही हे काम घेतले आहे. नियोजनाचा पूर्णतः अभाव असणाऱ्या कंपनीच्या नाकर्तेपणामुळे सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

तसेच,अपुऱ्या आणि कामाच्या विलंबापोटी दररोज एक लाखाचा दंड या कंपनीकडून शासन वसूल करणार आहे तरीही ही कंपनी गांभीर्याने लक्ष देत नाही? या मागील गौडबंगाल जनतेला उमगणार कधी?हा प्रश्न आहे.

२०१८ मध्ये निपाणी-देवगड या आंतरराज्य रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. त्याला हायब्रीड ॲन्युटी माॅडेल तत्त्वावर ४०:६० धोरणानुसार निधी मंजूर झाला ६०टक्के शासन तर ४० टक्के ठेकेदाराने गुंतवणूक करून हा रस्ता बनवायचा आहे. ठेकेदाराचे पैसे टप्प्याटप्प्याने मिळणार होते. राज्यात हे धोरण पहिल्यांदाच अंमलात आणले होते. त्यामध्ये ठेकेदार कंपनीला याची व्यापकता लक्षातच आलेली नसावी.

केलेल्या अनेक कामांवरही स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ती कामे पुन्हा करावी लागणार आहेत. त्यामुळे या कंपनीने हे काम पुन्हा सुरू केले तर वरील सर्व बाबींचा त्यांच्याकडून हिशेब घालून कामे केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कंपनीकडून हा ठेका रद्द करून अन्य कंपनीला देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

कंपनीचे नियोजन हा संशोधनाचा विषय

या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मुदत २६ डिसेंबर २० पर्यंत होती. त्यानंतर कोरोना आणि अतिवृष्टीमुळे मुदतवाढही मिळाली तरीही,गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून या ठेकेदार कंपनीला प्रतिदिन एक लाखाचा दंड केला जात आहे. कंपनीच्या काही कामगार,अधिकाऱ्यांना घरबसल्या पगार दिला जात आहे तरीही कामाच्या पूर्ततेसाठी कंपनीकडून प्रयत्नच होत नाहीत. मग,कंपनीला हे परवडणारच कसे? त्यांचे आर्थिक नियोजन म्हणजे संशोधनाचाच विषय असल्याच्या प्रतिक्रिया जाणकरांतून उमटत आहेत.

नागरिकांच्या त्रासाला चंद्रकांत पाटील हेच जबाबदार : मंत्री मुश्रीफ

राज्यातील हायब्रीड ॲन्युटी माॅडेल (४०:६०) हे धोरण कधीच बंद पडले तरीही तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हे धोरण राबविले. आज नागरिकांना प्रचंड हाल-अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्याला पाटील हेच जबाबदार आहेत तसेच,या विभागाच्या अधिकाऱ्यांचा हा पराभवच आहे. या चुकीच्या धोरणाच्या मुळाशी जाण्याची गरज असल्याचीही प्रतिक्रिया ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी 'लोकमत'ला दिली.

कुरुकली-सुरुपलीजवळ असा रस्ता खोदून अर्धवट ठेवण्यात आला आहे.

छाया-दत्तात्रय पाटील, म्हाकवे