शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीचा नाकर्तेपणा नागरिकांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:29 IST

म्हाकवे : लिंगनूर-कापशी ते देवगड या आंतरराज्य मार्गाच्या कामाची मुदत संपून आठ महिने उलटले तरी काम अपूर्णच आहे.सुमारे २२० ...

म्हाकवे : लिंगनूर-कापशी ते देवगड या आंतरराज्य मार्गाच्या कामाची मुदत संपून आठ महिने उलटले तरी काम अपूर्णच आहे.सुमारे २२० कोटी इतका निधी मंजूर होऊनही तीन वर्षांत या रस्त्याचे अवघे ३० टक्केच काम झाले आहे.या रस्त्याच्या कामाचा ठेका घेतलेल्या जितेंद्रसिंग कंपनीने क्षमता नसतानाही हे काम घेतले आहे. नियोजनाचा पूर्णतः अभाव असणाऱ्या कंपनीच्या नाकर्तेपणामुळे सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

तसेच,अपुऱ्या आणि कामाच्या विलंबापोटी दररोज एक लाखाचा दंड या कंपनीकडून शासन वसूल करणार आहे तरीही ही कंपनी गांभीर्याने लक्ष देत नाही? या मागील गौडबंगाल जनतेला उमगणार कधी?हा प्रश्न आहे.

२०१८ मध्ये निपाणी-देवगड या आंतरराज्य रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. त्याला हायब्रीड ॲन्युटी माॅडेल तत्त्वावर ४०:६० धोरणानुसार निधी मंजूर झाला ६०टक्के शासन तर ४० टक्के ठेकेदाराने गुंतवणूक करून हा रस्ता बनवायचा आहे. ठेकेदाराचे पैसे टप्प्याटप्प्याने मिळणार होते. राज्यात हे धोरण पहिल्यांदाच अंमलात आणले होते. त्यामध्ये ठेकेदार कंपनीला याची व्यापकता लक्षातच आलेली नसावी.

केलेल्या अनेक कामांवरही स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ती कामे पुन्हा करावी लागणार आहेत. त्यामुळे या कंपनीने हे काम पुन्हा सुरू केले तर वरील सर्व बाबींचा त्यांच्याकडून हिशेब घालून कामे केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कंपनीकडून हा ठेका रद्द करून अन्य कंपनीला देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

कंपनीचे नियोजन हा संशोधनाचा विषय

या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मुदत २६ डिसेंबर २० पर्यंत होती. त्यानंतर कोरोना आणि अतिवृष्टीमुळे मुदतवाढही मिळाली तरीही,गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून या ठेकेदार कंपनीला प्रतिदिन एक लाखाचा दंड केला जात आहे. कंपनीच्या काही कामगार,अधिकाऱ्यांना घरबसल्या पगार दिला जात आहे तरीही कामाच्या पूर्ततेसाठी कंपनीकडून प्रयत्नच होत नाहीत. मग,कंपनीला हे परवडणारच कसे? त्यांचे आर्थिक नियोजन म्हणजे संशोधनाचाच विषय असल्याच्या प्रतिक्रिया जाणकरांतून उमटत आहेत.

नागरिकांच्या त्रासाला चंद्रकांत पाटील हेच जबाबदार : मंत्री मुश्रीफ

राज्यातील हायब्रीड ॲन्युटी माॅडेल (४०:६०) हे धोरण कधीच बंद पडले तरीही तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हे धोरण राबविले. आज नागरिकांना प्रचंड हाल-अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्याला पाटील हेच जबाबदार आहेत तसेच,या विभागाच्या अधिकाऱ्यांचा हा पराभवच आहे. या चुकीच्या धोरणाच्या मुळाशी जाण्याची गरज असल्याचीही प्रतिक्रिया ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी 'लोकमत'ला दिली.

कुरुकली-सुरुपलीजवळ असा रस्ता खोदून अर्धवट ठेवण्यात आला आहे.

छाया-दत्तात्रय पाटील, म्हाकवे