शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
2
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
3
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
4
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
5
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
6
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
7
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
8
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
9
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
10
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
11
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
12
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
13
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
14
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
15
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
16
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
17
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
18
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
19
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!

नैसर्गिक संकटाच्या काळात संवाद, समन्वय महत्त्वाचा! कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:59 IST

भारत चव्हाण ।कोल्हापूर : कोणतेही संकट सांगून येत नाही आणि कधी येईल याचा नेम नसतो; परंतु येणाऱ्या संकटाशी दोन हात करण्याची पूर्वतयारी आधीच झाली, तर मात्र या संकटाची तीव्रता कमी करणे शक्य असते. मात्र, आपत्ती व्यवस्थापनाबाबत पूर्वतयारी कितीही काटेकोरपणे केली तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीत अनेक त्रुटी राहतात, असा नेहमीचा अनुभव आहे.प्रत्येक ...

ठळक मुद्देमहापालिका वगळता अन्य यंत्रणेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही; संभाव्य धोके आणि आपत्ती व्यवस्थापन यांचा अभ्यास गरजेचा

भारत चव्हाण ।कोल्हापूर : कोणतेही संकट सांगून येत नाही आणि कधी येईल याचा नेम नसतो; परंतु येणाऱ्या संकटाशी दोन हात करण्याची पूर्वतयारी आधीच झाली, तर मात्र या संकटाची तीव्रता कमी करणे शक्य असते. मात्र, आपत्ती व्यवस्थापनाबाबत पूर्वतयारी कितीही काटेकोरपणे केली तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीत अनेक त्रुटी राहतात, असा नेहमीचा अनुभव आहे.प्रत्येक वर्षी प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट अशी की, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा म्हणून ज्या-ज्या यंत्रणा काम करतात, त्यांच्यामध्ये योग्य समन्वय, जलद सुसंवाद यांचा अभाव आढळून येतो. त्यामुळे ऐनवेळी सगळी यंत्रणा कोलमडून पडते; म्हणूनच जिल्हा पातळीवरील यंत्रणा सक्षम करताना या गोष्टी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, जलसंपदा विभाग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, आदी विभाग आपत्ती व्यवस्थापनाचे काम करीत असतात. या कामांत काही अशासकीय संस्थांचे प्रतिनिधीही (एनजीओ) मदत करीत असतात. जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेचे अग्निशमन दल वगळता अन्य कोणतीही यंत्रणा तितकी सक्षम नाही. त्यातही महापालिका वगळता अन्य कोणत्याच यंत्रणेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. आपत्ती व्यवस्थापनाकडे मनुष्यबळच उपलब्ध नसेल तर ती यंत्रणा कुचकामीच ठरणार, हे नक्की असते.

जिल्हा पातळीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करताना तिला पुरेशी उपकरणे उपलब्ध करून देणे आणि ही उपकरणे हाताळणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुरेशा बोटी असतील आणि त्या चालवायला कोणी नसतील, तर त्या बोटींचा काहीच उपयोग होणार नाही; म्हणूनच यंत्रणा सक्षम करण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य उपयोग आणि ‘एनजीओं’चा सहभाग चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे; परंतु नेमक्या याच ठिकाणी त्रुटी जाणवतात. पावसाळ्यात जलसंपदा विभाग आणि आपत्ती निवारण कक्ष यांच्यात समन्वय आणि जलद संवादाची यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. भौगोलिक परिस्थिती बदलत असल्याने संभाव्य धोके आणि आपत्ती व्यवस्थापन यांचा नव्याने अभ्यास होण्याचीही गरज आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी