शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ड्रेनेजचे पाणी पाहून समितीही अवाक्

By admin | Updated: January 25, 2016 00:57 IST

रंकाळा तलावाची पाहणी : बडोद्याच्या तज्ज्ञ समितीकडे कमकुवत उपाययोजना केल्याची पर्यावरणवाद्यांची तक्रार

कोल्हापूर : राष्ट्रीय हरित लवादाने नेमलेल्या बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीने रविवारी रंकाळा तलावाला प्रदूषित करणाऱ्या विविध घटकांवर महापालिकेने केलेल्या खर्चाची उपयुक्तता तपासली. त्यासाठी या समितीने विविध ठिकाणी भेटी देत सांडपाणी रोखण्यासाठी केलेले प्रयत्न, नेमका केलेला खर्च, त्याची उपयुक्तता तसेच प्रकल्प आराखडा आवश्यक आहे का? याचीही तपासणी केली. रंकाळा तलावात मिसळणारे सांडपाणी पाहून समितीही अवाक् झाली. रंकाळा तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने खर्च केलेले ८ कोटी ६५ लाख रुपये आणि तलावासाठीच नव्याने सादर केलेला सविस्तर १२७ कोटींच्या प्रकल्प आराखड्याला पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून आक्षेप घेतला आहे. याबाबत कदमवाडी येथील नागरिक सुनील केंबळे यांनी रंकाळा तलावाच्या प्रदूषणासंदर्भात एक जनहित याचिका राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल केली असून, त्यावर सुनावणी सुरू आहे. या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने रंकाळा तलावातील प्रदूषण रोखण्यासंदर्भात कोणत्या उपाययोजना केल्या, त्यांनी त्यावर किती निधी खर्च केला आहे, त्याशिवाय भविष्यकाळात राबविण्यात येणाऱ्या योजना काय आहेत, याची प्रत्यक्ष तलावाजवळ जाऊन पाहणी व तपासणी करावी आणि त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले होते. केलेल्या उपायोजनावरील खर्चाची उपयुक्तता तटस्थ संस्थेकडून तपासावी, असेही लवादाने म्हटले. त्यासाठी बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या तज्ज्ञ प्राध्यापकांच्या समितीची नियुक्ती केली आहे. त्यानुसार या समितीचे डॉ. उपेंद्र पटेल आणि डॉ. निर्मल शहा यांनी रविवारी दिवसभर प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांची तपासणी केली. त्यांच्यासोबत महापालिकेचे पर्यावरण अभियंता आर. के. पाटील, ड्रेनेज विभागाचे उपअभियंता एस. बी. कुलकर्णी हेही उपस्थित होते. येत्या २८ जानेवारी रोजी याबाबतची हरित लवादासमोर सुनावणी असल्याने त्यावेळी हा थेट अहवाल सादर करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी दुधाळी नाला, धुण्याची चावी येथून या तज्ज्ञांच्या समितीने तपासणीला प्रारंभ केला. त्यांनी विविध ठिकाणची पाहणी करून तेथे काही पाण्याचे नमुने घेतले. आवश्यक ठिकाणी काही छायाचित्रे घेण्यात आली, तर काही ठिकाणच्या पाण्याच्या दुर्गंधीबाबत त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. देशमुख हॉलसमोरील आणि श्याम सोसायटीतील ड्रेनेजचे पाणी अन्यत्र वळविण्यात आल्याबाबतची त्यांनी सखोलपणे चौकशी केली. याशिवाय तांबट कमानीनजीकच्या गणेश विसर्जन कुंडातील पाण्याबाबत केलेल्या उपाययोजनाबाबत चौकशी केली. या तज्ज्ञ समितीकडून रंकाळा पहाणीवेळी सांडपाण्यापासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत. तलावातील पाणी स्वच्छ राहण्यासाठी काय केले आहे. जनावरे, कपडे, वाहने धुण्यापासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती या समितीकडून एकत्रित करण्यात आली. त्याचबरोबर महापालिका प्रशासनाने भविष्यात कोणत्या योजना राबविण्याचे ठरविले आहे, यासह योजनांची आवश्यकता तपासून पाहिली. तज्ज्ञांच्या समितीकडून तपासणी केलेली ठिकाणे धुण्याची चावी परिसर, दुधाळी नाला, रंकाळा टॉवर, राजघाट परिसर, अंबाई टँक परिसर, फुलेवाडी पेट्रोलपंपनजीकचा वळविलेला नाला, हरिओम नगरमधील ड्रेनेज पाणी, पदपथ उद्यान, परताळाची अवस्था, पंपिंग स्टेशन (श्याम सोसायटी नाला), देशमुख हॉल परिसरातील ड्रेनेज पाणी, घरगुती गणेश विसर्जन कुंड (तांबट कमान), पतौडी घाट. पर्यावरणवाद्यांकडून समितीकडे तक्रारी रंकाळा संरक्षण व संवर्धन समिती, राजे संभाजी तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दुपारी या तज्ज्ञ समितीची भेट घेऊन तक्रारीचा पाढाच वाचला. परिसरातून सांडपाणी तलावात मिसळत असल्याचीही तक्रार केली. पुईखडी टेकडीवरून पाण्याचे नैसर्गिक स्रोत येऊन ते रंकाळा तलावात मिसळत होते. पण महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हे पाण्याचे स्रोत बंद झाले आहेत. पण श्याम सोसायटी तसेच अंबाई जलतरण तलाव परिसरातील सांडपाणी वळविण्यात महापालिकेला अपयश आले आहे, अशाही तक्रारी या कार्यकर्त्यांनी केल्या. यामध्ये अजित चव्हाण, अमर जाधव, दिलीप कदम, सुनील हराळे, विकास जाधव तसेच याचिकाकर्ता सुनील केंबळे यांचा सहभाग होता.