शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

अखेर कोल्हापूरला आयुक्त मिळाले, के. मंजुलक्ष्मी उद्या स्वीकारणार कार्यभार

By भारत चव्हाण | Updated: August 22, 2023 14:04 IST

कोल्हापूर : गेल्या ऐंशी दिवसांहून अधिक काळ रिक्त असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासकपदी अखेर के. मंजूलक्ष्मी यांची नियुक्ती ...

कोल्हापूर : गेल्या ऐंशी दिवसांहून अधिक काळ रिक्त असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासकपदी अखेर के. मंजूलक्ष्मी यांची नियुक्ती झाली. त्या बुधवारी प्रशासकपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. येथे येण्याआधी त्यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. स्वत: पुढाकार घेऊन हिरिरीने काम करण्याची पद्धत, लोकांसाठी भरपूर वेळ देण्याची सवय आणि सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाची नेहमीच दखल घेणाऱ्या अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे.महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची दि. २ जून २०२३ रोजी बदली झाली. त्यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त होते. प्रशासक म्हणून कोणाला आणायचे, याबाबत राजकीय वाद निर्माण झाल्यामुळे बरेच दिवस नियुक्ती रखडली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दीपक केसरकर या सर्वांनी चार-आठ दिवसांत प्रशासक दिले जातील, असे सांगूनही नियुक्तीचा घोळ सुरू होता.प्रशासकाची नियुक्त तातडीने करा, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री यांच्यापर्यंत करण्यात आली होती. त्यासाठी कोल्हापुरात आंदाेलन झाले. आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत मागणी केली. अखेर कोल्हापूरकरांची ही प्रतीक्षा के. मंजूलक्ष्मी यांच्या नियुक्तीनंतर संपली. त्यांच्या बदलीचे आदेश झाले तेव्हा त्या मुंबईत विविध बैठकीत व्यस्त होत्या.आयएएस २०१३ च्या बॅचच्या अधिकारी असलेल्या मंजूलक्ष्मी यांनी भारतीय प्रशासन सेवेत दाखल होताच रत्नागिरी येथे प्रांताधिकारी, नाशिक येथे उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले. त्या दि. ९ फेब्रुवारी २०१८ ला सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्या. त्यानंतर सिंधुदुर्गमध्येच २० मे २०२० रोजी जिल्हाधिकारी झाल्या.मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोन वर्षे आणि जिल्हाधिकारी म्हणून तीन वर्षे सहा महिने असे साडेपाच वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी काम केले. आजवरच्या अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक काळ त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहिल्या. कोरोनाकाळात त्यांनी सर्वोत्कृष्ट काम केले. त्यांच्या काळातच सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ भारतमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर आला. त्याबद्दल त्यांचा दिल्लीत गौरवही झाला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcommissionerआयुक्त