शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

चला..भवताल चांगुलपणाने पेरूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:26 IST

मृत्यूचे आणि सामाजिक बहिष्काराच्या भयावर मात करणाऱ्या घटना आणि व्यक्ती यांची मनाेगते समाेर यायला हवीत, आम्ही या प्रतिकूल काळात ...

मृत्यूचे आणि सामाजिक बहिष्काराच्या भयावर मात करणाऱ्या घटना आणि व्यक्ती यांची मनाेगते समाेर यायला हवीत, आम्ही या प्रतिकूल काळात पुणे विद्यापीठात रक्तदानाचे आव्हान तरुणाईस केले. एका दिवसात खूप कमी वेळेत २०० पर्यंत बाटल्या रक्तदान झाले. सांगली येथे टाळेबंदीच्या काळात २०० बाटल्या रक्तदान झाले. या रक्तदानासाठी स्त्रियांनी पुढाकार घेतला हाेता. अनेक गावांत माझ्यासाेबत काम करणारी तरुणाई हाेम क्वारंटाईन असलेल्या घरामध्ये डबा नेऊन देत आहे. दारात बसून गप्पा मारणाऱ्या प्रत्येकाने जबाबदारी उचलली आहे. सामाजिक बहिष्काराच्या भयाला कृतीने ही तरुणाई उत्तर देत आहे.

मृत्यूच्या भयाला दूर सारण्यासाठी अनेक कलाकार काेविड सेंटरमध्ये जाऊन आपल्या कलेतून भयाला दूर करण्यासाठी सरसावली आहेत. काळजीने, चिंतेने आणि परिस्थितीने त्रासले असताना भवताल चांगुलपणाने पेरणे ही एक पवित्र सेवाच आहे. या सेवेच्या त्सुनामीची आता गरज आहे. ज्याच्याजवळ जे सामर्थ्य आहे, वाणी, लेखणी, करणी कथनी ही सारी एकत्रितरीत्या वापरून या अवस्थेत ‘‘हम है ना’’चे बीद्रवाक्य मनामनांत पेरून त्याची अनुमती यावी. रक्त, प्लाझ्मा दानासाठी तरुणाईमध्ये चढाओढ सुरू आहे. चांगल्यांचा चांगुलपणा समाजाच्या मनावर ठसवण्याची हीच वेळ आहे. नाही तर जन्मापासून आम्ही ब्लेम गेमच करत आलाे आहाेत, अन्यथा सुरेश भट यांच्या कवितेनुसार ‘‘इतकेच मला जाताना सरणावर कळले हाेते..! मरणाने केली सुटका जगण्याने छळले हाेते!’’असे हाेईल. स्वत: नीट जगून अनेकांची आयुष्यं अर्थपूर्ण जगण्याकडे वळवता येण्याचा हाच काळ आहे. या काळाचे वर्णन करताना माझ्या मनात काही ओळी उमटतात...

सूत्र

अव्याहत चालणाऱ्या

अंधार उजेडाच्या या खेळाला

दीर्घकाळ फसू नकोस

परिस्थितीचे आविर्भाव पांघरूण हतबल होऊ नकोस

अंतर्गत कोलाहल पार करताना

विद्रोहशरण होऊ नकोस

फक्त

कधी काळी मुक्तीचा मार्ग शोधताना

संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही माती

कपाळावर लाव

मातीच्याच आधारानं माती जगव

नाती जगतीलच

प्रज्वलित कर स्नेहानं तुझ्या आतला दिवा

तसे दिव्यानं तेवतील दिवे

तुझ्या नजरेला सापडेल प्रेम

पाझरू दे

झरू दे भयविरहित वाणीतून

आस्था उत्स्फूर्त होईल आत्मीयतेत

तशी

मूल्यांच्या तळाशी

पराकोटीला गेलेली स्थिती

मानवतेचे झेंडे

मानव्याच्या पताका घेऊन चालू लागेल

एकात्म होऊन

वास्तविक क्रांती वेगळी नसतेच