शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

चला..भवताल चांगुलपणाने पेरूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:26 IST

मृत्यूचे आणि सामाजिक बहिष्काराच्या भयावर मात करणाऱ्या घटना आणि व्यक्ती यांची मनाेगते समाेर यायला हवीत, आम्ही या प्रतिकूल काळात ...

मृत्यूचे आणि सामाजिक बहिष्काराच्या भयावर मात करणाऱ्या घटना आणि व्यक्ती यांची मनाेगते समाेर यायला हवीत, आम्ही या प्रतिकूल काळात पुणे विद्यापीठात रक्तदानाचे आव्हान तरुणाईस केले. एका दिवसात खूप कमी वेळेत २०० पर्यंत बाटल्या रक्तदान झाले. सांगली येथे टाळेबंदीच्या काळात २०० बाटल्या रक्तदान झाले. या रक्तदानासाठी स्त्रियांनी पुढाकार घेतला हाेता. अनेक गावांत माझ्यासाेबत काम करणारी तरुणाई हाेम क्वारंटाईन असलेल्या घरामध्ये डबा नेऊन देत आहे. दारात बसून गप्पा मारणाऱ्या प्रत्येकाने जबाबदारी उचलली आहे. सामाजिक बहिष्काराच्या भयाला कृतीने ही तरुणाई उत्तर देत आहे.

मृत्यूच्या भयाला दूर सारण्यासाठी अनेक कलाकार काेविड सेंटरमध्ये जाऊन आपल्या कलेतून भयाला दूर करण्यासाठी सरसावली आहेत. काळजीने, चिंतेने आणि परिस्थितीने त्रासले असताना भवताल चांगुलपणाने पेरणे ही एक पवित्र सेवाच आहे. या सेवेच्या त्सुनामीची आता गरज आहे. ज्याच्याजवळ जे सामर्थ्य आहे, वाणी, लेखणी, करणी कथनी ही सारी एकत्रितरीत्या वापरून या अवस्थेत ‘‘हम है ना’’चे बीद्रवाक्य मनामनांत पेरून त्याची अनुमती यावी. रक्त, प्लाझ्मा दानासाठी तरुणाईमध्ये चढाओढ सुरू आहे. चांगल्यांचा चांगुलपणा समाजाच्या मनावर ठसवण्याची हीच वेळ आहे. नाही तर जन्मापासून आम्ही ब्लेम गेमच करत आलाे आहाेत, अन्यथा सुरेश भट यांच्या कवितेनुसार ‘‘इतकेच मला जाताना सरणावर कळले हाेते..! मरणाने केली सुटका जगण्याने छळले हाेते!’’असे हाेईल. स्वत: नीट जगून अनेकांची आयुष्यं अर्थपूर्ण जगण्याकडे वळवता येण्याचा हाच काळ आहे. या काळाचे वर्णन करताना माझ्या मनात काही ओळी उमटतात...

सूत्र

अव्याहत चालणाऱ्या

अंधार उजेडाच्या या खेळाला

दीर्घकाळ फसू नकोस

परिस्थितीचे आविर्भाव पांघरूण हतबल होऊ नकोस

अंतर्गत कोलाहल पार करताना

विद्रोहशरण होऊ नकोस

फक्त

कधी काळी मुक्तीचा मार्ग शोधताना

संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही माती

कपाळावर लाव

मातीच्याच आधारानं माती जगव

नाती जगतीलच

प्रज्वलित कर स्नेहानं तुझ्या आतला दिवा

तसे दिव्यानं तेवतील दिवे

तुझ्या नजरेला सापडेल प्रेम

पाझरू दे

झरू दे भयविरहित वाणीतून

आस्था उत्स्फूर्त होईल आत्मीयतेत

तशी

मूल्यांच्या तळाशी

पराकोटीला गेलेली स्थिती

मानवतेचे झेंडे

मानव्याच्या पताका घेऊन चालू लागेल

एकात्म होऊन

वास्तविक क्रांती वेगळी नसतेच