शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दोन बिले एकत्र करून ‘एफआरपी’ द्या

By admin | Updated: January 20, 2015 00:52 IST

सहकारमंत्र्यांची सूचना : खरेदीकराचा आज आदेश शक्य

कोल्हापूर : बाजारातील साखरेचे दर घसरल्याने साखर कारखान्यांना एफआरपी द्यायला अडचणी येत आहेत, त्यामुळे कारखानदारांनी दोन बिले एकत्र करून शेतकऱ्यांना द्यावीत. शेवटी जेव्हा आर्थिक अडचण निर्माण होईल तोपर्यंत केंद्र सरकारचे पॅकेज मंजूर होईल, त्याची गॅरंटी बाळगा, असे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.राज्य शासनाने खरेदीकर माफ करण्याचा निर्णय घेऊनही त्याचा अध्यादेश निघाला नसल्याने विक्रीकर विभागाने कारखानदारांना नोटिसा काढल्या आहेत. हा अध्यादेश निघायचा झाल्यास त्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर न्यावा लागतो; परंतु नेमके हेच झालेले नव्हते. त्यामुळे खरेदीकर माफचा निर्णय लोंबकळत पडला आहे. उद्या, मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यामध्ये हा निर्णय होण्याची शक्यता आहे का, अशी विचारणा सहकारमंत्र्यांना केली. त्यावर त्यांनी उद्या हा निर्णय अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले. त्यासंबंधीचा रीतसर प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर निर्णयासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन आले व त्यांनी साखर कारखानदारीस मदतीचे पॅकेज देण्याची मागणी केली. जेटली यांनी बुधवारपर्यंत (दि.२१) पॅकेजचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचा निर्णय उद्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अपेक्षित आहे का, असे विचारले असता सहकारमंत्री पाटील यांनी सांगितले, ‘पॅकेजचा निर्णय उद्याच व्हावा यासाठी पाठपुरावा करण्यासाठी खासदार संजयकाका पाटील व केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे स्वीय साहाय्यक यांना दिल्लीतच थांबवले आहे. त्यामुळे निर्णय होण्याची शक्यता वाटते. केंद्र सरकार साखर कारखानदारीस पॅकेज देणार, हे नक्की आहे. त्याची राज्य शासन साखर कारखानदारांना गॅरंटी देत आहे. त्यामुळे जरी ते पुढे-मागे झाले तरी त्याबद्दल साशंकता बाळगण्याची गरज नाही. तोपर्यंत कारखान्यांना बिले देण्यात अडचण येत असेल तर त्यांनी दोन बिले एकत्र करून शेतकऱ्यांना एफआरपीनुसार पैसे द्यावेत व जेव्हा अखेरच्या बिलावेळी आर्थिक अडचण येईल तोपर्यंत केंद्र सरकारचे पॅकेज उपलब्ध होईल. (प्रतिनिधी)इतर कारखाने मागे का?शेतकऱ्यांना एफआरपीनुसारच बिले मिळायला हवीत यासाठी राज्य शासन ठाम असून, कोल्हापुरातील कारखान्यांना हे जमते तर इतर कारखान्यांना ते का शक्य होत नाही, अशीही विचारणा सहकारमंत्र्यांनी केली.