शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

महाविद्यालयीन युवक गुन्हेगारीच्या जाळ्यात

By admin | Updated: June 12, 2015 00:48 IST

पोलिसांना आव्हान : मुलांचे भवितव्य, प्रतिष्ठा या पेचात पालक

घन:शाम कुंभार- यड्राव -इचलकरंजी परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या काही युवकांना गुन्हेगारीच्या जाळ्यात ओढण्यात आले असून, त्यांच्याकडून विविध प्रकारचे गुन्हे करवून घेतले जात आहेत. युवकांचे हे प्रकार सुसंस्कृत व प्रतिष्ठित असलेल्या पालकांना समजल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. मुलांना जाब विचारला, तर संबधितांकडून बदनाम होण्यास व खंडणीस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मुलांचे भवितव्य घडवायचे, की आपली प्रतिष्ठा जपायची, या दुहेरी पेचात काही पालक अडकले आहेत. पालकांनी मुलांच्या भवितव्यासाठी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे, अन्यथा मुलांच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्हच राहील. अशा प्रकारामुळे गुन्हे विस्तार रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.इचलकरंजी परिसरातील आजूबाजूच्या गावांतील अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेले काही युवक गुन्हेगारी क्षेत्रात ओढले गेले आहेत. या युवकांकडून खंडणी उकळण्याचे, अमली पदार्थ तस्करीचे, दुचाकी चोरी, हाणामारी, दहशत निर्माण करणे, यासारखे अनेक गैरमार्ग हाताळले जात आहेत.या कुसंगतीने मुले व्यसनी बनली आणि त्याचे पालकांसमोर प्रदर्शन घडले. रात्रीअपरात्री मुले घरी येण्याचे गमक पालकांना उमगल्यामुळे त्यातील गांभीर्यता लक्षात आली. आपली मुले गुन्हेगारी क्षेत्रात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलांच्या मित्रांना त्यांनी विश्वासात घेतल्याने मुलाचे अनेक कारनामे ऐकून पालकांचे धाबे दणाणले. एवढ्या लहान वयात गुन्हेगारी क्षेत्राच्या गाढ विळख्यात मुले सापडली कशी, असा त्यांना प्रश्न पडला. मुले गुन्हेगारीत अडकली आहेत. त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न पालकांकडून झाला, तर बदनामी व खंडणीसारखे प्रसंग उद्भवू शकतात. प्रतिष्ठा झाकण्यासाठी एकाने तयारी केली, तर इतर पालकांनाही आर्थिक व मानसिक छळ सहन करावा लागू शकतो. मुलांचे भवितव्य बिघडू द्यायचे नसेल, तर पालकांनी याविरोधी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. अन्यथा, मुलांच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्हच राहील. हा प्रकार पोलिसांपुढे आव्हान आहे. त्यास कसे ते सामोरे जातात यावर या युवा पिढीचे भवितव्य अवलंबून आहे, अन्यथा गुन्हेगारी क्षेत्राच्या विस्ताराचा फटका आणखी इतर महाविद्यालयीन युवकांना बसण्याची शक्यता जोर धरत आहे.पोलीस सूत्रधारापर्यंत पोहोचणार कधीटोळ्याअंतर्गत या युवकांची विभागणी झाल्यामुळे एका टोळीतील युवकांचा गुन्हा रात्री-अपरात्री पोलिसांना बाहेर कोठेतरी बोलावून उघड करण्याची पद्धत दुसऱ्या टोळीने अवलंबली आहे. यातील बऱ्याच घटना त्यामध्ये सहभागी असलेल्यांकडूनच पोलिसांपुढे उघड झाल्या आहेत. बऱ्याच गुन्ह्यांची कल्पना पोलिसांना असूनही सूत्रधारापर्यंत कसे पोहोचले नाहीत, त्यांना जरब का बसविली नाही, हा पालकांपुढे प्रश्न उभा राहिला आहे.