शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

महाविद्यालयीन युवक गुन्हेगारीच्या जाळ्यात

By admin | Updated: June 12, 2015 00:48 IST

पोलिसांना आव्हान : मुलांचे भवितव्य, प्रतिष्ठा या पेचात पालक

घन:शाम कुंभार- यड्राव -इचलकरंजी परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या काही युवकांना गुन्हेगारीच्या जाळ्यात ओढण्यात आले असून, त्यांच्याकडून विविध प्रकारचे गुन्हे करवून घेतले जात आहेत. युवकांचे हे प्रकार सुसंस्कृत व प्रतिष्ठित असलेल्या पालकांना समजल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. मुलांना जाब विचारला, तर संबधितांकडून बदनाम होण्यास व खंडणीस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मुलांचे भवितव्य घडवायचे, की आपली प्रतिष्ठा जपायची, या दुहेरी पेचात काही पालक अडकले आहेत. पालकांनी मुलांच्या भवितव्यासाठी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे, अन्यथा मुलांच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्हच राहील. अशा प्रकारामुळे गुन्हे विस्तार रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.इचलकरंजी परिसरातील आजूबाजूच्या गावांतील अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेले काही युवक गुन्हेगारी क्षेत्रात ओढले गेले आहेत. या युवकांकडून खंडणी उकळण्याचे, अमली पदार्थ तस्करीचे, दुचाकी चोरी, हाणामारी, दहशत निर्माण करणे, यासारखे अनेक गैरमार्ग हाताळले जात आहेत.या कुसंगतीने मुले व्यसनी बनली आणि त्याचे पालकांसमोर प्रदर्शन घडले. रात्रीअपरात्री मुले घरी येण्याचे गमक पालकांना उमगल्यामुळे त्यातील गांभीर्यता लक्षात आली. आपली मुले गुन्हेगारी क्षेत्रात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलांच्या मित्रांना त्यांनी विश्वासात घेतल्याने मुलाचे अनेक कारनामे ऐकून पालकांचे धाबे दणाणले. एवढ्या लहान वयात गुन्हेगारी क्षेत्राच्या गाढ विळख्यात मुले सापडली कशी, असा त्यांना प्रश्न पडला. मुले गुन्हेगारीत अडकली आहेत. त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न पालकांकडून झाला, तर बदनामी व खंडणीसारखे प्रसंग उद्भवू शकतात. प्रतिष्ठा झाकण्यासाठी एकाने तयारी केली, तर इतर पालकांनाही आर्थिक व मानसिक छळ सहन करावा लागू शकतो. मुलांचे भवितव्य बिघडू द्यायचे नसेल, तर पालकांनी याविरोधी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. अन्यथा, मुलांच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्हच राहील. हा प्रकार पोलिसांपुढे आव्हान आहे. त्यास कसे ते सामोरे जातात यावर या युवा पिढीचे भवितव्य अवलंबून आहे, अन्यथा गुन्हेगारी क्षेत्राच्या विस्ताराचा फटका आणखी इतर महाविद्यालयीन युवकांना बसण्याची शक्यता जोर धरत आहे.पोलीस सूत्रधारापर्यंत पोहोचणार कधीटोळ्याअंतर्गत या युवकांची विभागणी झाल्यामुळे एका टोळीतील युवकांचा गुन्हा रात्री-अपरात्री पोलिसांना बाहेर कोठेतरी बोलावून उघड करण्याची पद्धत दुसऱ्या टोळीने अवलंबली आहे. यातील बऱ्याच घटना त्यामध्ये सहभागी असलेल्यांकडूनच पोलिसांपुढे उघड झाल्या आहेत. बऱ्याच गुन्ह्यांची कल्पना पोलिसांना असूनही सूत्रधारापर्यंत कसे पोहोचले नाहीत, त्यांना जरब का बसविली नाही, हा पालकांपुढे प्रश्न उभा राहिला आहे.