शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

महाविद्यालयीन युवक गुन्हेगारीच्या जाळ्यात

By admin | Updated: June 12, 2015 00:48 IST

पोलिसांना आव्हान : मुलांचे भवितव्य, प्रतिष्ठा या पेचात पालक

घन:शाम कुंभार- यड्राव -इचलकरंजी परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या काही युवकांना गुन्हेगारीच्या जाळ्यात ओढण्यात आले असून, त्यांच्याकडून विविध प्रकारचे गुन्हे करवून घेतले जात आहेत. युवकांचे हे प्रकार सुसंस्कृत व प्रतिष्ठित असलेल्या पालकांना समजल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. मुलांना जाब विचारला, तर संबधितांकडून बदनाम होण्यास व खंडणीस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मुलांचे भवितव्य घडवायचे, की आपली प्रतिष्ठा जपायची, या दुहेरी पेचात काही पालक अडकले आहेत. पालकांनी मुलांच्या भवितव्यासाठी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे, अन्यथा मुलांच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्हच राहील. अशा प्रकारामुळे गुन्हे विस्तार रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.इचलकरंजी परिसरातील आजूबाजूच्या गावांतील अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेले काही युवक गुन्हेगारी क्षेत्रात ओढले गेले आहेत. या युवकांकडून खंडणी उकळण्याचे, अमली पदार्थ तस्करीचे, दुचाकी चोरी, हाणामारी, दहशत निर्माण करणे, यासारखे अनेक गैरमार्ग हाताळले जात आहेत.या कुसंगतीने मुले व्यसनी बनली आणि त्याचे पालकांसमोर प्रदर्शन घडले. रात्रीअपरात्री मुले घरी येण्याचे गमक पालकांना उमगल्यामुळे त्यातील गांभीर्यता लक्षात आली. आपली मुले गुन्हेगारी क्षेत्रात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलांच्या मित्रांना त्यांनी विश्वासात घेतल्याने मुलाचे अनेक कारनामे ऐकून पालकांचे धाबे दणाणले. एवढ्या लहान वयात गुन्हेगारी क्षेत्राच्या गाढ विळख्यात मुले सापडली कशी, असा त्यांना प्रश्न पडला. मुले गुन्हेगारीत अडकली आहेत. त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न पालकांकडून झाला, तर बदनामी व खंडणीसारखे प्रसंग उद्भवू शकतात. प्रतिष्ठा झाकण्यासाठी एकाने तयारी केली, तर इतर पालकांनाही आर्थिक व मानसिक छळ सहन करावा लागू शकतो. मुलांचे भवितव्य बिघडू द्यायचे नसेल, तर पालकांनी याविरोधी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. अन्यथा, मुलांच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्हच राहील. हा प्रकार पोलिसांपुढे आव्हान आहे. त्यास कसे ते सामोरे जातात यावर या युवा पिढीचे भवितव्य अवलंबून आहे, अन्यथा गुन्हेगारी क्षेत्राच्या विस्ताराचा फटका आणखी इतर महाविद्यालयीन युवकांना बसण्याची शक्यता जोर धरत आहे.पोलीस सूत्रधारापर्यंत पोहोचणार कधीटोळ्याअंतर्गत या युवकांची विभागणी झाल्यामुळे एका टोळीतील युवकांचा गुन्हा रात्री-अपरात्री पोलिसांना बाहेर कोठेतरी बोलावून उघड करण्याची पद्धत दुसऱ्या टोळीने अवलंबली आहे. यातील बऱ्याच घटना त्यामध्ये सहभागी असलेल्यांकडूनच पोलिसांपुढे उघड झाल्या आहेत. बऱ्याच गुन्ह्यांची कल्पना पोलिसांना असूनही सूत्रधारापर्यंत कसे पोहोचले नाहीत, त्यांना जरब का बसविली नाही, हा पालकांपुढे प्रश्न उभा राहिला आहे.