शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

corona virus-सरकारी कार्यालयात न येण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 15:22 IST

कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक योजनेचा भाग म्हणून नागरिकांनी एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयात येणे टाळावे. अतितातडीचे काम असेल तरच कार्यालयात प्रवेश द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एका परिपत्रकाद्वारे काढले आहेत.

ठळक मुद्देगर्दी नियंत्रणासाठी करण्यात आली उपाययोजना ३१ मार्चपर्यंत अर्ज ई-मेलवर पाठविण्याच्या सूचना

सातारा : कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक योजनेचा भाग म्हणून नागरिकांनी एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयात येणे टाळावे. अतितातडीचे काम असेल तरच कार्यालयात प्रवेश द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एका परिपत्रकाद्वारे काढले आहेत.जिल्हास्तरावर, क्षेत्रीयस्तरावर सर्वसामान्य जनतेस शासकीय माहिती अथवा इतर आवश्यक बाबींसाठी अर्जाद्वारे कार्यवाही करावयाची असेल तर शासकीय कार्यालयात न जाता ई-मेलद्वारे अर्ज करावेत व माहिती प्राप्त करून घ्यावी. यासाठी संबंधित विभागाने सामान्य जनतेसाठी शासकीय कार्यालयातील ई-मेल आयडी व दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना केल्या आहेत.क्षेत्रीय स्तरावरून अत्यंत तातडीचे टपाल, संदेश हे ई-मेलद्वारे पाठविण्यात यावे. सर्वसामान्य जनतेकडून ई-मेलद्वारे प्राप्त होणाऱ्या अर्जांवर नियमानुसार विहित मुदतीत उचित कार्यवाही करून अर्जदारांना कळविणे संबंधित शाखा, विभागांची जबाबदारी राहील.

सर्व शासकीय कार्यालयांमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काम करताना कागदपत्रे व हस्तांदोलन यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी कार्यालयांमध्ये वेळोवेळी सॅनिटायझरचा, हँडवॉशचा वापर करावा. शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी.कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपले संकलन तसेच विभागांमध्ये स्वच्छता राखावी. वैयक्तिक सुनावणीस एखादी व्यक्ती गैरहजर राहिली म्हणून प्रकरणे, केस निकाली न काढता त्याला वैयक्तिक हजेरीमध्ये सूट देऊन कोरोना संक्रमण कालावधीनंतर त्या सुनावणीस पुढील तारीख देण्यात यावी. वरील बाबींची अंमलबजावणी ३१ मार्च २०२० या कालावधीतपर्यंत करावी, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परिपत्रकान्वये कळविले आहे.आठवडी बाजार भरवताना घ्या काळजीआडवडे बाजार भरवताना मोठ्या प्रमाणात गर्दी होणार नाही, याची दक्षता जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, नगरपरिषद, नगरपंचायतींच्या मुख्याधिकारी व बाजार समितीच्या सचिवांनी घ्यावी, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.आठवडे बाजारामध्ये ग्रामीण भागातून शहरी भागात येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे कोरोना संसर्ग ग्रामीण भागाकडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आठवडी बाजारामध्ये कोरोना संसर्गाबाबत जनजागृती करावी. यामध्ये दर्शनी भागात फ्लेक्स लावणे, आॅडीओ संदेश, हँडवॉश, सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत सूचित करावे. आठवडे बाजार झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम त्वरित राबवावी.

आठवडे बाजारात भाजी, फळे, नाशवंत वस्तू आणि दूध आदी वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये सुरक्षित अंतर राहील, याची खबरदारी घेण्याबाबत सूचित करावे. आठवडे बाजारात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात उत्पादित केलेला भाजीपाला, कडधान्ये, धान्य याचीच विक्री करता येईल.

टॅग्स :corona virusकोरोनाSatara areaसातारा परिसर