शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
3
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
4
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
5
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
6
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
7
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
8
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
9
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
10
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
11
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
12
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
13
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
14
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
15
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
16
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
17
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
18
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
19
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
20
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक

शिवसेनेच्या आमदारांच्या पोटात गोळा

By admin | Updated: January 31, 2017 22:59 IST

स्वतंत्र ताकद दाखवा : दहा तालुक्यांत अन्य कुणाशी तरी आघाडी करूनच लढण्याची शक्यता

समीर देशपांडे --- कोल्हापूर --जिल्हा परिषदेत भाजपशी युती करणार नसल्याची स्पष्ट भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यामुळे सेनेच्या ग्रामीण भागातील पाच आमदारांच्या पोटात गोळा आला आहे. कारण दोन्ही कॉँग्रेसमधील असंतुष्टांच्या सहकार्याने विधानसभा गाठणाऱ्या या आमदारांचा आता खरा कस लागणार असून, त्यांच्या शक्तीची झाकली मूठ आता उघड होणार आहे. त्यामुळे बारा तालुक्यांपैकी कागल आणि करवीर वगळता दहा तालुक्यांमध्ये शिवसेना अन्य कुणाशी तरी आघाडी करूनच लढेल, असे सध्याचे चित्र आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्'ातील दहापैकी शिवसेनेचे तब्बल सहा आमदार निवडून आले. पश्चिम महाराष्ट्रातील धनुष्यबाणाच्या चिन्हावर इतके आमदार निवडून देणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरची चर्चा झाली. या सहापैकी राजेश क्षीरसागर हे कोल्हापूर शहरातील उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. उर्वरित पाच आमदार हे ग्रामीण भागातून निवडून आले आहेत. कोल्हापूर जिल्'ातील गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना गावागावांत रुजली असली तरी दोन्ही कॉँग्रेसच्या सहकारी संस्थांच्या तडाख्यात ती भरारी घेऊ शकली नव्हती; परंतु गेल्या विधानसभेला कधी नव्हे ते एवढे यश मिळाले. युतीच्या सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असलेले चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेनेला फार पुढे जाऊ दिले नाही. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आणि पाटील यांच्यामध्ये जाहीर शाब्दिक चकमकी घडल्या होत्या. परिणामी कोल्हापूर महापालिकेच्या सत्तासंघर्षात अनुपस्थित राहत शिवसेनेने अप्रत्यक्षपणे दोन्ही कॉँग्रेसना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. आता तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्येही भाजपसोबत कुठेही युती करणार नसल्याचे ठाकरे यांनी जाहीर केल्याने या ग्रामीण पाच आमदारांची जबाबदारी वाढली आहे. हे आमदार स्वत:च्या मोठ्या गटाच्या जोरावरच आमदार झाले, अशातला भाग नाही. प्रकाश आबिटकर यांना आजरा, भुदरगड, राधानगरीतील कॉँग्रेस, राष्ट्रवादीतील असंतुष्टांनी उघडपणे मदत केली. उल्हास पाटील यांना शिरोळमध्ये बहुजन विकास आघाडीने मदत केली आणि ते आमदार झाले; परंतु त्यांना पाठिंबा देणारी बहुजन विकास आघाडी पंधरा दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेली आहे. सत्यजित पाटील यांना राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी असलेल्या मानसिंगराव गायकवाड गटाने मदत केली आणि ते आमदार झाले. हातकणंगले तालुक्यातील दोन्ही कॉँग्रेसच्या राजकारणामध्ये सुजित मिणचेकर यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली. नाही म्हणायला करवीर तालुक्यात चंद्रदीप नरके यांनी आपला स्वतंत्र गट चांगल्या पद्धतीने उभारला आहे. कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या माध्यमातूनही त्यांना गट मजबूत करणे सोयीचे ठरले.