शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

घरांची पडझड, पोलिसांची धडपड !

By admin | Updated: April 27, 2016 00:54 IST

पोलिस वसाहतींची दुरवस्था : कुटुंबीयांचा जीव टांगणीला; के. पी. बक्षी करणार शुक्रवारी पाहणी

एकनाथ पाटील -- कोल्हापूर -पोलिसांना नवीन घरे देण्याची गृहखात्याची घोषणा फक्त कागदावर राहिली आहे. पोलिस प्रशासनाने पाठविलेल्या नवीन घरांच्या प्रस्तावावर कोणतीच हालचाल झालेली नाही. राज्याचे गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी हे शुक्रवारी (दि. २९) पोलिस वसाहतींची पाहणी करणार आहेत. नवीन घरांचे स्वप्न उराशी बाळगून संसाराची मोट बांधलेल्या पोलिसांसह कुटुंबीयांना आजही पडझड झालेल्या छोट्याखानी घरांमध्ये मरणयातना भोगाव्या लागत आहेत. मुख्य सचिव बक्षी यांनी आमच्या कुटुंबीयांच्या वेदना जाणून घेत घरांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिस वसाहतींना सध्या अवकळा प्राप्त झाली आहे. या वसाहती विविध समस्यांच्या भोवऱ्यात अडकल्याने घरे सोडून काही पोलिस भाड्याच्या घरात निघून गेले आहेत. पोलिसांच्या घरांची बिकट अवस्था पाहून गृहखात्याने पोलिसांना नवीन घरे देण्याची घोषणा यापूर्वी केली होती. त्यासाठी राज्यभरातून प्रस्तावही मागवून घेतले. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा पोलिस प्रशासनाने नवीन घरांचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या स्वाक्षरीने पोलिस महासंचालकांकडे पाठविला; तेथून तो गृहखात्याकडे पाठविण्यात आला आहे; परंतु या प्रस्तावावर अद्यापही कोणतीच कार्यवाही झालेली दिसत नाही. इंग्रजांच्या काळात सुमारे पाच एकरात बुधवार पेठ व लक्ष्मीपुरी परिसरात पोलिसांना राहण्यासाठी १७० घरे (क्वॉर्टर्स) बांधण्यात आली आहेत. त्याचबरोबर पोलिस मुख्यालयासमोरही पोलिसांसाठी घरे उभारली आहेत.पोलिस प्रशासनात अधिकारी १६५, कॉन्स्टेबल २५८१ असे एकूण २७४६ आहेत. अधिकाऱ्यांसाठी ४७, तर कॉन्स्टेबलसाठी १४८० अशी एकूण १५८० घरे सध्या आहेत. ही सर्व कौलारू आणि दहा बाय दहाच्या दोन खोल्या असून, यामध्ये स्वयंपाकखोली आणि बैठ्या खोलीसह आंघोळीसाठी छोटेसे बाथरूम अशी या घरांची रचना आहे. एकेकाळी ही वसाहत बहरून गेली होती. पोलिसांच्या कुटुंबीयांच्या वास्तव्यामुळे या वसाहतीला कॉलनीचे स्वरूप प्राप्त झाले होते. जस-जसे पोलिसांच्या कुटुंबीयांच्या संख्येत वाढ होत गेली, तशी घरे अपुरी पडू लागली. त्यातच वसाहतीमधील समस्यांकडे पोलिस प्रशासनाने लक्ष न दिल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे स्वास्थ्य हरपले आहे. वाढती गुन्हेगारी, आंदोलने यामुळे पोलिसांचा कामाचा ताण वाढत आहे. घटकाभर विश्रांती घ्यायची म्हटली तरी देखील हक्काच्या घरातील अडचणींमुळे ते त्यांच्या पदरी पडत नाही. गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव बक्षी हे पोलिस वसाहतींची पाहणी करणार आहेत येथील समस्या जाणून घेणार आहेत. त्यांच्या स्वागताची तयारीही पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. कित्येक वर्षांपासून छोट्याखानी घरांमध्ये मरणयातना भोगणाऱ्या पोलिसांच्या घरांचा प्रश्न बक्षी यांनी मार्गी लावावा, अशी अपेक्षा पोलिसांतून व्यक्त होत आहे.