शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नारळ फुटले; प्रचाराला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:30 IST

संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : अर्ज माघारीनंतर शिरोळ तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. गावांतील वातावरण तापू लागले आहे. नशीब आजमावण्यासाठी तसेच सरपंच, सदस्यपद मिळविण्यासाठी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या प्रचाराचा नारळ फुटला असून, भेटीगाठींना वेग आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी फटाके फोडण्यासाठी उमेदवार ...

संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : अर्ज माघारीनंतर शिरोळ तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. गावांतील वातावरण तापू लागले आहे. नशीब आजमावण्यासाठी तसेच सरपंच, सदस्यपद मिळविण्यासाठी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या प्रचाराचा नारळ फुटला असून, भेटीगाठींना वेग आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी फटाके फोडण्यासाठी उमेदवार सज्ज झाले आहेत.तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी १६ आॅक्टोबरला मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर चिंचवाड ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. सर्वच गट-तट व पक्ष एकत्र आल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. १४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाकरिता ४९, तर सदस्य पदाकरिता ३९५ उमेदवार निवडणूक रिंंगणात आहेत. सुरुवातीला पक्षीय पातळीवर निवडणूक लढणार म्हणणाºया नेत्यांनी आपली तलवार म्यान करून आघाड्यांना महत्त्व दिले आहे. कार्यकर्त्यांच्या हट्टापोटी नेत्यांनी सोयीच्या आघाड्या केल्या आहेत.दरम्यान, अर्ज मागे घेतल्यामुळे खरे उमेदवार स्पष्ट झाले आहेत. अनेक गावात सध्या प्रचाराचा नारळ फुटल्याने प्रचाराला वेग येत आहे. प्रचारासाठी सकाळी दुचाकी रॅली काढली जाते. हालगीचा वापर प्रचारासाठी केला जात आहे. यामुळे वाजविणाºयांनाही सुगीचे दिवस आले आहेत. ज्या उमेदवारांच्या सौभाग्यवती सरपंच, ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीसाठी रिंगणात उतरल्या आहेत. त्यांचे पतिराज दारोदारी, घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. रात्रीच्या वेळी कॉर्नर बैठका घेतल्या जात आहेत. यामध्ये विकासाच्या आश्वासनाचा पाऊस पॅनेलप्रमुखांकडून पाडला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. नेतेमंडळी मताची वजाबाकी व स्थानिक समीकरणांना महत्त्व देत आहेत.सरपंचपदाला महत्त्वंंलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिरोळ तालुक्यात भाजपला तीन, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व स्वाभिमानीला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. १४ ग्रामपंचायतींपैकी शिवनाकवाडी, हरोली, टाकवडे, कवठेसार, उमळवाड, कनवाड, अकिवाट व नवे दानवाड याठिकाणी भाजपचा उमेदवार सरपंचपदाची निवडणूक लढवित आहे. थेट सरपंचपदाची निवडणूक होत असल्याने ग्रामपंचायतीत सरपंचांना महत्त्व आले आहे.नेत्यांचे संभाजीपूर टार्गेटसंभाजीपूर ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार आहे. काँग्रेस-स्वाभिमानी-ज्येष्ठ नागरिक आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अशी तिरंगी लढत होत आहे. भाजपनेही उमेदवार दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जयसिंगपूर शहराजवळ असलेल्या संभाजीपूर ग्रामपंचायतीची सत्ता मिळविण्यासाठी नेत्यांनी ही निवडणूक टार्गेट केली आहे. यामुळे खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, गणपतराव पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अनिल यादव या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.