शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

नारळ फुटले; प्रचाराला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:30 IST

संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : अर्ज माघारीनंतर शिरोळ तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. गावांतील वातावरण तापू लागले आहे. नशीब आजमावण्यासाठी तसेच सरपंच, सदस्यपद मिळविण्यासाठी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या प्रचाराचा नारळ फुटला असून, भेटीगाठींना वेग आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी फटाके फोडण्यासाठी उमेदवार ...

संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : अर्ज माघारीनंतर शिरोळ तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. गावांतील वातावरण तापू लागले आहे. नशीब आजमावण्यासाठी तसेच सरपंच, सदस्यपद मिळविण्यासाठी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या प्रचाराचा नारळ फुटला असून, भेटीगाठींना वेग आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी फटाके फोडण्यासाठी उमेदवार सज्ज झाले आहेत.तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी १६ आॅक्टोबरला मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर चिंचवाड ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. सर्वच गट-तट व पक्ष एकत्र आल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. १४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाकरिता ४९, तर सदस्य पदाकरिता ३९५ उमेदवार निवडणूक रिंंगणात आहेत. सुरुवातीला पक्षीय पातळीवर निवडणूक लढणार म्हणणाºया नेत्यांनी आपली तलवार म्यान करून आघाड्यांना महत्त्व दिले आहे. कार्यकर्त्यांच्या हट्टापोटी नेत्यांनी सोयीच्या आघाड्या केल्या आहेत.दरम्यान, अर्ज मागे घेतल्यामुळे खरे उमेदवार स्पष्ट झाले आहेत. अनेक गावात सध्या प्रचाराचा नारळ फुटल्याने प्रचाराला वेग येत आहे. प्रचारासाठी सकाळी दुचाकी रॅली काढली जाते. हालगीचा वापर प्रचारासाठी केला जात आहे. यामुळे वाजविणाºयांनाही सुगीचे दिवस आले आहेत. ज्या उमेदवारांच्या सौभाग्यवती सरपंच, ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीसाठी रिंगणात उतरल्या आहेत. त्यांचे पतिराज दारोदारी, घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. रात्रीच्या वेळी कॉर्नर बैठका घेतल्या जात आहेत. यामध्ये विकासाच्या आश्वासनाचा पाऊस पॅनेलप्रमुखांकडून पाडला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. नेतेमंडळी मताची वजाबाकी व स्थानिक समीकरणांना महत्त्व देत आहेत.सरपंचपदाला महत्त्वंंलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिरोळ तालुक्यात भाजपला तीन, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व स्वाभिमानीला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. १४ ग्रामपंचायतींपैकी शिवनाकवाडी, हरोली, टाकवडे, कवठेसार, उमळवाड, कनवाड, अकिवाट व नवे दानवाड याठिकाणी भाजपचा उमेदवार सरपंचपदाची निवडणूक लढवित आहे. थेट सरपंचपदाची निवडणूक होत असल्याने ग्रामपंचायतीत सरपंचांना महत्त्व आले आहे.नेत्यांचे संभाजीपूर टार्गेटसंभाजीपूर ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार आहे. काँग्रेस-स्वाभिमानी-ज्येष्ठ नागरिक आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अशी तिरंगी लढत होत आहे. भाजपनेही उमेदवार दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जयसिंगपूर शहराजवळ असलेल्या संभाजीपूर ग्रामपंचायतीची सत्ता मिळविण्यासाठी नेत्यांनी ही निवडणूक टार्गेट केली आहे. यामुळे खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, गणपतराव पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अनिल यादव या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.