शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

नारळ फुटले; प्रचाराला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:30 IST

संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : अर्ज माघारीनंतर शिरोळ तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. गावांतील वातावरण तापू लागले आहे. नशीब आजमावण्यासाठी तसेच सरपंच, सदस्यपद मिळविण्यासाठी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या प्रचाराचा नारळ फुटला असून, भेटीगाठींना वेग आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी फटाके फोडण्यासाठी उमेदवार ...

संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : अर्ज माघारीनंतर शिरोळ तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. गावांतील वातावरण तापू लागले आहे. नशीब आजमावण्यासाठी तसेच सरपंच, सदस्यपद मिळविण्यासाठी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या प्रचाराचा नारळ फुटला असून, भेटीगाठींना वेग आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी फटाके फोडण्यासाठी उमेदवार सज्ज झाले आहेत.तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी १६ आॅक्टोबरला मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर चिंचवाड ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. सर्वच गट-तट व पक्ष एकत्र आल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. १४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाकरिता ४९, तर सदस्य पदाकरिता ३९५ उमेदवार निवडणूक रिंंगणात आहेत. सुरुवातीला पक्षीय पातळीवर निवडणूक लढणार म्हणणाºया नेत्यांनी आपली तलवार म्यान करून आघाड्यांना महत्त्व दिले आहे. कार्यकर्त्यांच्या हट्टापोटी नेत्यांनी सोयीच्या आघाड्या केल्या आहेत.दरम्यान, अर्ज मागे घेतल्यामुळे खरे उमेदवार स्पष्ट झाले आहेत. अनेक गावात सध्या प्रचाराचा नारळ फुटल्याने प्रचाराला वेग येत आहे. प्रचारासाठी सकाळी दुचाकी रॅली काढली जाते. हालगीचा वापर प्रचारासाठी केला जात आहे. यामुळे वाजविणाºयांनाही सुगीचे दिवस आले आहेत. ज्या उमेदवारांच्या सौभाग्यवती सरपंच, ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीसाठी रिंगणात उतरल्या आहेत. त्यांचे पतिराज दारोदारी, घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. रात्रीच्या वेळी कॉर्नर बैठका घेतल्या जात आहेत. यामध्ये विकासाच्या आश्वासनाचा पाऊस पॅनेलप्रमुखांकडून पाडला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. नेतेमंडळी मताची वजाबाकी व स्थानिक समीकरणांना महत्त्व देत आहेत.सरपंचपदाला महत्त्वंंलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिरोळ तालुक्यात भाजपला तीन, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व स्वाभिमानीला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. १४ ग्रामपंचायतींपैकी शिवनाकवाडी, हरोली, टाकवडे, कवठेसार, उमळवाड, कनवाड, अकिवाट व नवे दानवाड याठिकाणी भाजपचा उमेदवार सरपंचपदाची निवडणूक लढवित आहे. थेट सरपंचपदाची निवडणूक होत असल्याने ग्रामपंचायतीत सरपंचांना महत्त्व आले आहे.नेत्यांचे संभाजीपूर टार्गेटसंभाजीपूर ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार आहे. काँग्रेस-स्वाभिमानी-ज्येष्ठ नागरिक आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अशी तिरंगी लढत होत आहे. भाजपनेही उमेदवार दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जयसिंगपूर शहराजवळ असलेल्या संभाजीपूर ग्रामपंचायतीची सत्ता मिळविण्यासाठी नेत्यांनी ही निवडणूक टार्गेट केली आहे. यामुळे खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, गणपतराव पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अनिल यादव या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.