शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नारळ फुटला, एक अर्ज दाखल

By admin | Updated: October 8, 2015 01:18 IST

प्रकाश नाईकनवरेंचे शक्तिप्रदर्शन : दुसऱ्या दिवशीही केवळ प्रतीक्षाच

कोल्हापूर : पुरोगामी विचारांची कास धरणारे आणि संपूर्ण महाराष्ट्रासमोर या विचारांचा आदर्श ठेवणारे शहर म्हणून नावलौकिक असलेल्या कोल्हापूर शहरात महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही इच्छुक उमेदवारांनी पाठ फिरविली. पितृपंधरवडा असल्याने बुधवारीही उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज भरण्याचे टाळले. मात्र, असल्या शुभ-अशुभांच्या भ्रामक कल्पनांना छेद देत नगरसेवक प्रकाश रामचंद्र नाईकनवरे यांनी बुधवारी व्हीनस कॉर्नर प्रभागातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गेल्या काही महिन्यांपासून राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांना महानगरपालिका निवडणुकीची प्रतीक्षा लागून होती. प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम सुरू होऊन दोन दिवस झाले तरी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरण्याचा मोह टाळला आहे. सध्या पितृपंधरवडा सुरू असल्याने कथित अशुभ काळात उमेदवारी अर्ज भरायला नकोत, अशीच भूमिका उमेदवारांनी घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे.कोणत्याही पुरोगामी बदलाच्या प्रक्रियेत पुढाकार घेणाऱ्या शहरातील कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास उदासीनता दाखवावी, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे डावे, पुरोगामी विचारांच्या काही पक्षीय कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे टाळले आहे. दोन दिवस अक्षरश: निवडणूक कार्यालये ओस पडली आहेत. (पान १ वरून) दरम्यान, बुधवारी या शुभ-अशुभाच्या भ्रामक कल्पनेस छेद देत नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांनी व्हीनस कॉर्नर प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप-ताराराणी आघाडी महायुतीतर्फे नाईकनवरे निवडणूक लढविणार असून, त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास जाण्यापूर्वी त्यांच्या प्रभागातून रॅली काढून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले. नाईकनवरे यांची सून पूजा स्वप्निल नाईकनवरे यांनीही शक्तिप्रदर्शन केले. परंतु, त्यांनी निवडणूक कार्यालयात जाऊन फक्त माहिती घेतली.कॉँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप-ताराराणी महायुती, शिवसेना यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. त्यांच्या कार्यालयांत उमेदवारांनी आवश्यक ती माहिती दिल्यावर आॅनलाईन फॉर्म भरले जात आहेत. त्याची स्थळप्रत काढून उमेदवारांना दिली जात आहे. आॅनलाईन अर्ज भरला की जबाबदारी संपत नाही. आॅनलाईन अर्ज भरून त्याची स्थळप्रत उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर सादर केल्यानंतरच त्यांचा अर्ज दाखल झाल्याचे ग्राह्ण धरले जाणार आहे. अर्ज सादर केल्यावर निवडणूक निर्णय अधिकारीच तो अर्ज आॅनलाईन सबमीट करणार आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया आॅनलाईन सुरू झाली आहे. परंतु, ते निवडणूक कार्यालयात मात्र दाखल केले जात नाहीत. ते मुहूर्तानेच दाखल करण्याची अनेकांची इच्छा आहे. एकाच वेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेबसाईटचा वापर झाला तर सर्व्हर डाऊन होऊ शकतो. उमेदवारी अर्ज भरण्याच्या मंगळवारी पहिल्या दिवशी दुपारी दीड वाजेपर्यंत सर्व्हर डाऊन होता. वेबसाईटवर अर्जाचे नमुने खुले होत नव्हते. त्यामुळे शेवटच्या दिवशीही अशी घटना घडू शकते. याबाबत आयुक्त पी. शिवशंकर यांना विचारले असता त्यांनी, ‘काहीही घडू शकते. म्हणूनच उमेदवारांना अर्ज भरण्यास सहा दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. सर्व्हर डाऊन झालाच तर काय? या प्रश्नाचे उत्तर आज आपल्याजवळ नाही’, असे उत्तर दिले. ...तर अडचणी येऊ शकतात पितृपंधरवडा असल्याचे कारण देत उमेदवारी अर्ज भरण्याचे टाळले जात असले तरी शुभ मुहूर्तावर अर्ज भरायचा झाल्यास फक्त मंगळवारी (दि. १३) घटस्थापनेचा एकच दिवस उमेदवारांना मिळणार आहे. या दिवशी सर्व कार्यालयांतून उमेदवारांची गर्दी झाली तर कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होऊ शकते. एकाच वेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेबसाईटचा वापर झाला तर सर्व्हर डाऊन होऊ शकतो.