शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

नारळ फुटला, एक अर्ज दाखल

By admin | Updated: October 8, 2015 01:18 IST

प्रकाश नाईकनवरेंचे शक्तिप्रदर्शन : दुसऱ्या दिवशीही केवळ प्रतीक्षाच

कोल्हापूर : पुरोगामी विचारांची कास धरणारे आणि संपूर्ण महाराष्ट्रासमोर या विचारांचा आदर्श ठेवणारे शहर म्हणून नावलौकिक असलेल्या कोल्हापूर शहरात महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही इच्छुक उमेदवारांनी पाठ फिरविली. पितृपंधरवडा असल्याने बुधवारीही उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज भरण्याचे टाळले. मात्र, असल्या शुभ-अशुभांच्या भ्रामक कल्पनांना छेद देत नगरसेवक प्रकाश रामचंद्र नाईकनवरे यांनी बुधवारी व्हीनस कॉर्नर प्रभागातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गेल्या काही महिन्यांपासून राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांना महानगरपालिका निवडणुकीची प्रतीक्षा लागून होती. प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम सुरू होऊन दोन दिवस झाले तरी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरण्याचा मोह टाळला आहे. सध्या पितृपंधरवडा सुरू असल्याने कथित अशुभ काळात उमेदवारी अर्ज भरायला नकोत, अशीच भूमिका उमेदवारांनी घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे.कोणत्याही पुरोगामी बदलाच्या प्रक्रियेत पुढाकार घेणाऱ्या शहरातील कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास उदासीनता दाखवावी, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे डावे, पुरोगामी विचारांच्या काही पक्षीय कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे टाळले आहे. दोन दिवस अक्षरश: निवडणूक कार्यालये ओस पडली आहेत. (पान १ वरून) दरम्यान, बुधवारी या शुभ-अशुभाच्या भ्रामक कल्पनेस छेद देत नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांनी व्हीनस कॉर्नर प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप-ताराराणी आघाडी महायुतीतर्फे नाईकनवरे निवडणूक लढविणार असून, त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास जाण्यापूर्वी त्यांच्या प्रभागातून रॅली काढून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले. नाईकनवरे यांची सून पूजा स्वप्निल नाईकनवरे यांनीही शक्तिप्रदर्शन केले. परंतु, त्यांनी निवडणूक कार्यालयात जाऊन फक्त माहिती घेतली.कॉँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप-ताराराणी महायुती, शिवसेना यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. त्यांच्या कार्यालयांत उमेदवारांनी आवश्यक ती माहिती दिल्यावर आॅनलाईन फॉर्म भरले जात आहेत. त्याची स्थळप्रत काढून उमेदवारांना दिली जात आहे. आॅनलाईन अर्ज भरला की जबाबदारी संपत नाही. आॅनलाईन अर्ज भरून त्याची स्थळप्रत उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर सादर केल्यानंतरच त्यांचा अर्ज दाखल झाल्याचे ग्राह्ण धरले जाणार आहे. अर्ज सादर केल्यावर निवडणूक निर्णय अधिकारीच तो अर्ज आॅनलाईन सबमीट करणार आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया आॅनलाईन सुरू झाली आहे. परंतु, ते निवडणूक कार्यालयात मात्र दाखल केले जात नाहीत. ते मुहूर्तानेच दाखल करण्याची अनेकांची इच्छा आहे. एकाच वेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेबसाईटचा वापर झाला तर सर्व्हर डाऊन होऊ शकतो. उमेदवारी अर्ज भरण्याच्या मंगळवारी पहिल्या दिवशी दुपारी दीड वाजेपर्यंत सर्व्हर डाऊन होता. वेबसाईटवर अर्जाचे नमुने खुले होत नव्हते. त्यामुळे शेवटच्या दिवशीही अशी घटना घडू शकते. याबाबत आयुक्त पी. शिवशंकर यांना विचारले असता त्यांनी, ‘काहीही घडू शकते. म्हणूनच उमेदवारांना अर्ज भरण्यास सहा दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. सर्व्हर डाऊन झालाच तर काय? या प्रश्नाचे उत्तर आज आपल्याजवळ नाही’, असे उत्तर दिले. ...तर अडचणी येऊ शकतात पितृपंधरवडा असल्याचे कारण देत उमेदवारी अर्ज भरण्याचे टाळले जात असले तरी शुभ मुहूर्तावर अर्ज भरायचा झाल्यास फक्त मंगळवारी (दि. १३) घटस्थापनेचा एकच दिवस उमेदवारांना मिळणार आहे. या दिवशी सर्व कार्यालयांतून उमेदवारांची गर्दी झाली तर कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होऊ शकते. एकाच वेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेबसाईटचा वापर झाला तर सर्व्हर डाऊन होऊ शकतो.