शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

द्वेषापोटी अपात्रतेचा सहकार कायदा

By admin | Updated: February 17, 2016 01:16 IST

अजित पवार : कागलमध्ये वीजनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

कागल : द्वेषापोटी मुश्रीफांना त्रास देण्यासाठीच चंद्रकांतदादा पाटलांनी संचालक अपात्रतेचा नवा सहकार कायदा आणला. केवळ एका व्यक्तीसाठी हा कायदा राज्यभर केला गेला, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.कागल नगरपरिषदेतर्फे उभारलेल्या घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती या प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर येथील बापूसाहेब महाराज चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. हसन मुश्रीफ होते. यावेळी आ. सतेज पाटील, उपमहापौर शमा मुल्ला, निवेदिता माने, के. पी. पाटील, मच्छिंद्र सकटे, शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष एस. के. मगदूम, नवीद मुश्रीफ, आदी उपस्थित होते. सभेत अजित पवार म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रावर आगपाखड करणारे हे सरकार आहे. सहकार चळवळ मोडीत काढण्याचे प्रयत्न होत आहेत. गरीब, सर्वसामान्यांच्या योजना बंद करून शेतकरी आणि गरिबांची थट्टा करणारे हे सरकार आहे. बाजार समित्या बरखास्त करण्याचा कुटील डाव यांनी रचला अहे. आमचे सरकार सत्तेवर असताना ऊसदराबद्दल पंतप्रधानांपर्यंत जाऊन निर्णय घेत असू. तेव्हा आंदोलन करणारी शेतकरी संघटना आता गप्प आहे. कारण संघटनेचे नेते सरकारमध्ये बगलबच्चे बनले आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण खूप वाढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘अच्छे दिन आयेंगे’ म्हणत जनतेच्या डोळ्यांत धूळफेक केली आहे. काळा पैसा आणतो म्हणणारे आता कोठे आहेत? पाकिस्तानला धडा शिकवू म्हणणारे मोदी गुपचूप पाकिस्तानला भेटी देऊन मिठ्या मारत आहेत. हा विरोधाभास आहे, अशी टीका केली.यावेळी हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, भय्या माने, मनोहर पाटील, रमेश माळी यांची भाषणे झाली. नगराध्यक्षा संगीता गाडेकर यांनी स्वागत केले. मुख्याधिकारी प्रभाकर पत्की यांनी आभार मानले. कार्यक्रमास जयंत पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पवार, राजू लाटकर, नामदेवराव भोईटे, विष्णुपंत केसरकर, आदी उपस्थित होते. जान्हवीला ‘अच्छे दिन’ : मोदींचे कधी? ‘अच्छे दिन’ आलेच नाहीत हे सांगताना अजित पवार म्हणाले की, त्या टी.व्ही. मालिकेतील जान्हवीला दोन वर्षांनी अखेर बाळ झाले, तिला ‘अच्छे दिन’ आले; पण मोदींनी सांगितलेले ‘अच्छे दिन’ अजून आलेले नाहीत. काळ्या पैशातील प्रत्येकी १५ लाख रुपये कधी मिळणार? याची लोक वाट पाहत आहेत.केवळ कागलसाठी ‘जीआर’अजितदादा पवार म्हणाले की, कागलच्या राम मंदिरासाठी खासगी ट्रस्ट असतानाही आ. मुश्रीफांनी तीर्थक्षेत्र योजनेतून मोठा निधी दिला. खासगी ट्रस्टला असा निधी देता येत नाही. तो कसा दिला म्हणून मी चौकशी केली तर या बहाद्दराने एका दिवसासाठी तसा जीआर काढला. निधी वर्ग केला आणि जीआर रद्दही केला. फक्त कागलकरांसाठी जीआर, बारामतीलाही नाही. यावर एकच हशा पिकला.