शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

द्वेषापोटी अपात्रतेचा सहकार कायदा

By admin | Updated: February 17, 2016 01:16 IST

अजित पवार : कागलमध्ये वीजनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

कागल : द्वेषापोटी मुश्रीफांना त्रास देण्यासाठीच चंद्रकांतदादा पाटलांनी संचालक अपात्रतेचा नवा सहकार कायदा आणला. केवळ एका व्यक्तीसाठी हा कायदा राज्यभर केला गेला, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.कागल नगरपरिषदेतर्फे उभारलेल्या घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती या प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर येथील बापूसाहेब महाराज चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. हसन मुश्रीफ होते. यावेळी आ. सतेज पाटील, उपमहापौर शमा मुल्ला, निवेदिता माने, के. पी. पाटील, मच्छिंद्र सकटे, शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष एस. के. मगदूम, नवीद मुश्रीफ, आदी उपस्थित होते. सभेत अजित पवार म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रावर आगपाखड करणारे हे सरकार आहे. सहकार चळवळ मोडीत काढण्याचे प्रयत्न होत आहेत. गरीब, सर्वसामान्यांच्या योजना बंद करून शेतकरी आणि गरिबांची थट्टा करणारे हे सरकार आहे. बाजार समित्या बरखास्त करण्याचा कुटील डाव यांनी रचला अहे. आमचे सरकार सत्तेवर असताना ऊसदराबद्दल पंतप्रधानांपर्यंत जाऊन निर्णय घेत असू. तेव्हा आंदोलन करणारी शेतकरी संघटना आता गप्प आहे. कारण संघटनेचे नेते सरकारमध्ये बगलबच्चे बनले आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण खूप वाढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘अच्छे दिन आयेंगे’ म्हणत जनतेच्या डोळ्यांत धूळफेक केली आहे. काळा पैसा आणतो म्हणणारे आता कोठे आहेत? पाकिस्तानला धडा शिकवू म्हणणारे मोदी गुपचूप पाकिस्तानला भेटी देऊन मिठ्या मारत आहेत. हा विरोधाभास आहे, अशी टीका केली.यावेळी हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, भय्या माने, मनोहर पाटील, रमेश माळी यांची भाषणे झाली. नगराध्यक्षा संगीता गाडेकर यांनी स्वागत केले. मुख्याधिकारी प्रभाकर पत्की यांनी आभार मानले. कार्यक्रमास जयंत पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पवार, राजू लाटकर, नामदेवराव भोईटे, विष्णुपंत केसरकर, आदी उपस्थित होते. जान्हवीला ‘अच्छे दिन’ : मोदींचे कधी? ‘अच्छे दिन’ आलेच नाहीत हे सांगताना अजित पवार म्हणाले की, त्या टी.व्ही. मालिकेतील जान्हवीला दोन वर्षांनी अखेर बाळ झाले, तिला ‘अच्छे दिन’ आले; पण मोदींनी सांगितलेले ‘अच्छे दिन’ अजून आलेले नाहीत. काळ्या पैशातील प्रत्येकी १५ लाख रुपये कधी मिळणार? याची लोक वाट पाहत आहेत.केवळ कागलसाठी ‘जीआर’अजितदादा पवार म्हणाले की, कागलच्या राम मंदिरासाठी खासगी ट्रस्ट असतानाही आ. मुश्रीफांनी तीर्थक्षेत्र योजनेतून मोठा निधी दिला. खासगी ट्रस्टला असा निधी देता येत नाही. तो कसा दिला म्हणून मी चौकशी केली तर या बहाद्दराने एका दिवसासाठी तसा जीआर काढला. निधी वर्ग केला आणि जीआर रद्दही केला. फक्त कागलकरांसाठी जीआर, बारामतीलाही नाही. यावर एकच हशा पिकला.