शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

ढगफुटीसदृश पावसाचे शहरात थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : तब्बल दोन तास ढगफुटीसदृश झालेल्या धुवाधार पावसाने रविवारी दुपारी शहर व परिसरास झोडपले. या पावसाने रस्त्यांवर ठिकठिकाणी पाण्याची तळी साचल्याने वाहतुकीची कोंडी होऊन वाहनधारकांचे हाल झाले. अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचीही मंदिरात गुडघाभर पाणी आल्याने त्रेधातिरपीट उडाली, तसेच लक्ष्मीपुरीतील आठवडा बाजारातही या पावसामुळे विक्रेत्यांसह नागरिकांची दाणादाण उडाली.रविवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : तब्बल दोन तास ढगफुटीसदृश झालेल्या धुवाधार पावसाने रविवारी दुपारी शहर व परिसरास झोडपले. या पावसाने रस्त्यांवर ठिकठिकाणी पाण्याची तळी साचल्याने वाहतुकीची कोंडी होऊन वाहनधारकांचे हाल झाले. अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचीही मंदिरात गुडघाभर पाणी आल्याने त्रेधातिरपीट उडाली, तसेच लक्ष्मीपुरीतील आठवडा बाजारातही या पावसामुळे विक्रेत्यांसह नागरिकांची दाणादाण उडाली.रविवारी दुपारपर्यंत उन्हाच्या झळा जाणवत होत्या; परंतु दुपारनंतर वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले. दुपारी दोननंतर आभाळ काळवंडून आले व तीनच्या सुमारास पावसाला सुरुवात होऊन बघता-बघता ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोर धरला. शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाची आठवण या निमित्ताने पुन्हा आली. रविवारी दुपारी तीनपासून जवळपास सायंकाळी पाचपर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने शहरांमधून जाणारे ओढे व नाले तुडुंब भरून वाहू लागले. बहुतांश ठिकाणी पाणी रस्त्यावर आल्याने वाहनधारकांना कसरत करतच जावे लागले. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहतूक खोळंबली. लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, सुतारवाडा, शाहूपुरी येथील सखल भागात गुडघाभर पाणी साचले होते. लक्ष्मीपुरीतील आठवडा बाजारातही गुडघाभर पाणी आल्याने विक्रेत्यांसह ग्राहकांची तारांबळ उडाली. सायंकाळी पाचनंतर पाणी ओसरल्याने बाजारपेठेची परिस्थिती पूर्वपदावर येऊन व्यवहार पूर्ववत सुरू झाले. देवकर पाणंद येथील घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांची धावपळ उडाली तर शनिवार पेठेत या पावसाने एका घराची भिंत कोसळली परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नाही. काही वेळांतच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्य केले.सध्या नवरात्रौत्सव असल्याने अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या शहर, जिल्ह्यातील भाविकांसह परराज्यांतील पर्यटकांची त्रेधातिरपीट उडाली. मंदिरासह परिसरात गुडघाभर पाणी आल्याने यातूनच भाविकांना दर्शनासाठी जावे लागले.शहरासह कसबा बावडा, कळंबा, पाचगांव, उचगांव, सानेगुरुजी वसाहत, देवकर पाणंद, रामानंद नगर, जरगनगर, संभाजीनगर आदी उपनगरांतील भागालाही पावसाने झोडपले. या ठिकाणीही ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने आबालवृद्धांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सायंकाळी काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री पुन्हा विजांच्या कडकडाटात जोरदार हजेरी लावल्याने शहरात पुन्हा ठिकठिकाणी पाणी साचले.दोन घरांत शिरले पाणीशहरात झालेल्या मुसळधार पावसाने देवकर पाणंद येथील ओढ्याला पूर येऊन पाणी हर्षद ठाकूर यांच्या घरामध्ये शिरले; तर फिरंगाई तालीम, शिवाजी पेठ येथे शरद यादव यांच्या घरी ड्रेनेजचे पाणी शिरले. शनिवार पेठ, सोन्यामारुती चौकात जे. बी. पाटील यांच्या जुन्या धोकादायक घराची भिंत पडली. तिन्ही घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान कृष्णात मिठारी, शैलेश कांबळे, सर्जेराव लोहार, खानू शिनगारे, उदय शिंदे, जयवंत डकरे यांनी धाव घेत घरात घुसलेले पाणी बाहेर काढण्यास मदत केली. या तिन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.करवीर पूर्व व दक्षिण भागात मुसळधार पाऊसउचगाव : रविवारी दुपारनंतर उचगाव परिसरात विजांचा गडगडाट सुरू होऊन एक तास पाऊस झाला, तर रात्री सातनंतर जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे गल्लोगल्लीतील गटारी उलटून रस्त्यावरून पाणी वाहत होते. सखल भागातील खड्ड्यांत पाणी साचून राहिले. पावसाने गावातील विविध मंदिर परिसरात नवरात्रीच्या निमित्ताने आलेल्या भाविकांची मोठी तारांबळ उडाली. महामार्गावर तुरळक वाहनांची ये-जा सुरू होती. पावसाच्या जोरदार धारांमुळे गाडीचे लाईट लावूनही समोरचा रस्ता दिसेनासा झाला. रात्री उशिरापर्यंत या परिसरात पावसाची संततधार कायम होती.