शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन बंद करणार

By admin | Updated: March 15, 2017 00:23 IST

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचा इशारा

कोल्हापूर : प्रलंबित मागण्यांबाबत राज्य शासनाने दोन दिवसांत सकारात्मक निर्णय न घेतल्यास बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाचे काम पूर्णपणे बंद करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने दिला आहे. मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे उद्या, गुरुवारी विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती महासंघाचे कार्याध्यक्ष प्रा. अविनाश तळेकर यांनी मंगळवारी दिली.महासंघाच्या आदेशानुसार आतापर्यंत इंग्रजी, हिंदी, मराठी, भौतिकशास्त्र, चिटणीस, कार्यपद्धती, राज्यशास्त्र, रसायनशास्त्र, इतिहास, वाणिज्य संघटन, पुस्तपालन व लेखाकर्म, जीवशास्त्र, मानसशास्त्र, आदी विषयांच्या सर्व नियामकांनी परीक्षा असहकार आंदोलनात सहभागी असल्याचे निवेदन नियामक बैठकीदिवशी कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळास दिले आहे. यानंतर उत्तरपत्रिका मूल्यमापनाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे बारावीचा निकाल वेळेत लागण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासनाने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या, प्रश्नांबाबत दोन दिवसांत योग्य व सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर उत्तरपत्रिका मूल्यमापनाचे काम पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय महासंघाकडून घेतला जाईल, अशी माहिती प्रा. तळेकर यांनी दिली. तसेच मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे उद्या, गुरुवारी विधानसभेवर होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी होणार आहेत. जीवशास्त्र, मानसशास्त्र, आदी विषयांच्या नियामकांची बैठक कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळात झाली. यामध्ये कोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष व्ही. बी. पायमल यांना निवेदन दिले. यावेळी कोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे अध्यक्ष ए. डी. चौगले, प्रा. अविनाश तळेकर, सदस्य प्रा. व्ही. एस. मेटकरी, व्ही. पी. पांचाळ, ए. एम. जाधव, ए. एम. चव्हाण, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)महासंघाच्या काही प्रमुख मागण्यारिक्त पायाभूत पदांवरील शिक्षकांच्या नियुक्तीस नियुक्ती दिनांकापासून मान्यता व वेतन देणे.सन २००३ ते २०११ मधील शासनमान्य वाढीव पदावर मान्यता झालेल्या शिक्षकांचे वेतन त्वरित सुरू करणे.नोव्हेंबर २००५ पूर्वी व नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.कायम विनाअनुदानित मूल्यांकन पात्र कनिष्ठ महाविद्यालये घोषित करणे, शाळांमधील शिक्षकांना मान्यता व वेतने देणे.४सन २०११ पासूनच्या वाढीव पदांना तातडीने मंजुरी देणे.४सर्वांना सेवेची २४ वर्षे पूर्ण होताच विनाअट निवडश्रेणी देणे.४कनिष्ठ महाविद्यालयीन प्रशासन स्वतंत्र करणे.