शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

हुपरीत बंदसदृश स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:24 IST

हुपरी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच बाजारपेठेत सर्वत्र बंदसदृश स्थिती असल्याने हुपरी (ता. हातकणंगले) सह परिसरातील गावातील चांदी ...

हुपरी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच बाजारपेठेत सर्वत्र बंदसदृश स्थिती असल्याने हुपरी (ता. हातकणंगले) सह परिसरातील गावातील चांदी उद्योगालाही याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तसेच यापुढेही उद्भवणाऱ्या दीर्घकालीन मंदीच्या वातावरणालाही तोंड द्यावे लागणार आहे. गेले वर्षभर कोरोना महामारी आणि अर्थव्यवस्थेची नाजूक स्थिती यामुळे सराफ बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झालेले आहे. परिणामी येथील चांदी व्यवसायातील संपूर्ण उलाढाल ठप्प झाली असून, मोठ्या प्रमाणात मंदीसदृश परिस्थिती उभी राहिलेली आहे.

गेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीच्या चक्रव्यूहात चांदी उद्योग तर सापडला आहेच, याबरोबरच नजीकच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योगही बंद करण्यात आलेले आहेत. यामुळे परिसरातील संपूर्ण आर्थिक चक्रच कोलमडून गेल्याने हजारो कुटुंबांवर एकाचवेळी बेरोजगार होण्याचे संकट उभे राहिले आहे. हुपरी परिसरात जवळपास ५००० उद्योजक आणि २५००० कारागीर या व्यवसायात कार्यरत आहेत. या व्यवसायातील दररोज होणारी कोट्यवधींची उलाढाल थांबली आहे. तसेच लॉकडाऊन सुरू असल्याने राज्यात तसेच परराज्यात दागिनेही घेऊन जाऊ शकत नाहीत अन्‌ परपेठेवरून कच्ची चांदीही आयात होऊ शकत नाही. अशा विचित्र संकटात येथील चांदी व्यवसाय सापडला गेला आहे. त्यामुळे यापुढील काही महिने येथील चांदी उद्योगात दीर्घकालीन मंदीचेच वातावरण राहणार यात काही शंकाच नाही. चांदी उद्योगातील पूरक व्यावसायिकांनाही त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार असल्याने हुपरी व परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

चौकट :

उद्योजक परिस्थितीवर मात करतील

येथील उद्योजक कल्पक आणि नावीन्याची आस असणारे आहेत. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नक्कीच नवीन सुरुवात करतील. असा विश्वास उद्योजक अमर कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

सरकारने लक्ष देण्याची गरज

चांदी उद्योजक मोहन खोत म्हणाले, हुपरी व परिसरातील चांदी उद्योजक, चांदी धडी उत्पादक व कारागीर, पूरक उद्योग संघटित कामगारांत मोडतात. हा हस्तकला उद्योग असल्यामुळे आणि यामध्ये लाखो लोक आपला उदरनिर्वाह करत असल्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने त्यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

----------::---------