शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारचे गोडवे गाणे बंद करा, कोल्हापूर महापालिका सभेत तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 18:33 IST

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देणाऱ्या भाजप गटनेते विजय सूर्यवंशी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवत ‘भाजप सरकारचे गोडवे गाणे बंद करा,’ अशा शब्दांत काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी त्यांना फटकारले.

ठळक मुद्देभाजप सरकारचे गोडवे गाणे बंद करा, कोल्हापूर  महापालिका सभेत तणाव मराठा आरक्षण पाठिंब्यावरून शाब्दिक चकमक

कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देणाऱ्या भाजप गटनेते विजय सूर्यवंशी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवत ‘भाजप सरकारचे गोडवे गाणे बंद करा,’ अशा शब्दांत काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी त्यांना फटकारले.

मराठा आरक्षण मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यावरून उडालेली शाब्दिक चकमक आणि घोषणाबाजी यामुळे सोमवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सभेत काहीकाळ तणाव तसेच गोंधळ निर्माण झाला. अखेर ही सभा तहकूब ठेवण्यात आली.महापौर शोभा बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होताच विषयपत्रिकेचे वाचन करण्यापूर्वीच प्रा. जयंत पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्याचा विषय उपस्थित केला. गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरात आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनास मातृसंस्था असलेल्या महानगरपालिकेनेदेखील पाठिंबा देणे आवश्यक आहे म्हणूनच ही सभा तहकूब ठेऊन सर्व नगरसेवकांनी मोर्चाने जाऊन दसरा चौक येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात सहभागी होऊया,अशी सूचना केली. त्यावर सभागृहाचे एकमत झाले. सभा तहकूब ठेवण्याचा सर्वांनीच आग्रह धरला. महापौर बोंद्रे यांनीही सभा तहकूब करत असल्याचे जाहीर केले.मात्र, तत्पूर्वी सभागृहात या विषयावर चर्चा झाली. अशोक जाधव यांनी मराठा समाजातील मुलांची शिक्षण क्षेत्रात वाताहत झाली असल्याने सरकारने अधिक अंत न पाहता आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. मराठा समाजाची मागणी रास्त असून मागास व इतर मागास यांचे आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी भूपाल शेटे यांनी केली.बहुसंख्य मराठा समाज शेतीवर अवलंबून असल्याने आणि शेतीउद्योग धोक्यात आल्याने मराठा समाजाची वाताहत होत आहे म्हणूनच बी.सी., ओ.बी.सी.च्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासह मुस्लिम, धनगर समाजालाही आरक्षण द्या, अशी मागणी नीलोफर आजरेकर यांनी केली. शाहू महाराजांच्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, स्वातंत्र्यानंतर समाज दुर्लक्षित झाला.

मराठा समाज श्रीमंत, जमीनदार म्हणून गणला गेला. शेतीउद्योग अडचणीत आल्यानंतर या समाजाला आर्थिक व सामाजिक मागासलेपण प्राप्त झाले. हे मागासलेपण लक्षात घेऊन नोकरीत व शिक्षणात आरक्षण देणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्र्यांनी तातडीने विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा निर्णय घ्यावा, न्यायालयानेही या निर्णयात हस्तक्षेप करू नये, अशी अपेक्षा आजरेकर यांनी बोलून दाखविली. बारा बलुतेदारांचा पोशिंदा असलेल्या मराठा समाजाला मागासलेपण येत असल्याने आरक्षण देणे आवश्यक असल्याचे रूपाराणी निकम यांनी सांगितले.

सूर्यवंशी-देशमुख यांच्यात वादावादीभाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी यांनी मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा दिला. मात्र, पाठिंबा देत असताना सूर्यवंशी यांनी राज्य सरकार आरक्षणासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. आरक्षण देण्याकरीता सन २०१०पर्यंत मागासवर्गीय आयोग स्थापन करणे आवश्यक असताना तो केला नाही.

भाजप सरकारने तो स्थापन केला. सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. मराठा वसतिगृहे सुरू होत आहेत. पन्नास टक्के फी सवलत दिली जात आहे. दहा लाखांपर्यंतच्या कर्जाचे व्याज सरकार भरत आहे,असे सूर्यवंशी यांनी सांगितले.सूर्यवंशी यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, अर्जुन माने, भूपाल शेटे यांनी जोरदार हरकत घेतली.

पक्षाचे, सरकारचे प्रमोशन बंद करा, सरकारचे गोडवे गाणे बंद करा, अशा शब्दांत त्यांनी सूर्यवंशी यांना फटकारले तर जयंत पाटील यांनी ‘तुम्ही पक्षीय अभिनिवेश बाळगून बोलू नका. आम्हीही मग न्यायालयात याचिका दाखल करणारा केतन तिरोडकर कोण, त्याला कोणाचा पाठिंबा आहे, त्याचे वकील कोण, यावर आम्ही चर्चा उपस्थित केली तर तुमची अडचण होईल’, अशा शब्दांत सुनावले. त्यातूनही सूर्यवंशी बोलतच होते. त्यामुळे अधिकच संतप्त झालेले देशमुख यांनी ‘मराठा समाजातील एका विद्यार्थ्यांला शिष्यवृत्ती दिल्याचे सांगा,’ अशा शब्दांत आव्हान दिले.

भाजप-ताराराणी आघाडीचा सभागृहातच ठिय्याभाजप-ताराराणी आघाडी नगरसेवकांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला; पण काँग्रेस-राष्टÑवादी नगरसेवकांसह मोर्चाने जाऊन दसरा चौक येथे ठिय्या आंदोलनात सहभागी होण्यास नकार दिला. त्यांनी सभेचे कामकाज संपल्यानंतर सुमारे तासभर सभागृहातच ठिय्या आंदोलन केले. त्यामध्ये स्थायी सभापती आशिष ढवळे, विरोधी पक्षनेते विलास वास्कर, ताराराणीचे गटनेते सत्यजित कदम, भाजप गटनेते विजय सूर्यवंशी, किरण शिराळे, अजित ठाणेकर, शेखर कुसाळे यांच्यासह ३३ नगरसेवकांनी भाग घेतला. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर