शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: January 9, 2015 00:25 IST

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : कचरा उठाव करताना जंतुसंसर्गाचा धोका

एकनाथ पाटील - कोल्हापूर -शहरात पावला-पावलावर साचलेला कचरा उठाव करून कोल्हापूर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्गंधीयुक्त, सडलेल्या कचऱ्याचा उठाव करताना हातांना ग्लोव्हज, चेहऱ्याला मास्क, पायांत गमबूट, अंगावर प्लास्टिकचा कोट अथवा गाऊन अशी कोणतीच स्वसंरक्षणार्थ साधनसामग्री जवळ नाही; त्यामुळे कर्मचाऱ्यांना जंतुसंसर्गाचा धोका उद्भवला असून, महापालिका प्रशासनाने मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.अशी वस्तुस्थिती असली तरी महापालिका प्रशासन कर्मचाऱ्यांना स्वसंरक्षणार्थ साधनसामग्रीची पूर्तता केली असल्याचे सांगत आहे. मग ती प्रत्यक्षात कचरा उठाव करताना कर्मचाऱ्यांच्या अंगावर का दिसत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात दररोज १८० टन घनकचरा साचला जातो. महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाची कचरा उठावाची स्वतंत्र, सक्षम यंत्रणा कार्यरत आहे. त्यामध्ये कायमस्वरूपी १२००, तर रोजंदारी २५० कामगार आहेत. कायमस्वरूपी कामगारांना सरासरी १२ हजार रुपये महिना वेतन मिळते; तर रोजंदारी कामगारांना दिवसा २५० रुपये हजेरी दिली जाते. शहरात दररोज सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत स्वच्छता मोहीम राबविली जाते. या वेळेत सफाई कर्मचारी दिलेल्या भागात स्वच्छता करतात, तसेच साचलेला कचरा ट्रकमधून उचलत असतात. याशिवाय शहराच्या काही भागांत रात्री १० ते पहाटे २ वाजेपर्यंत अशाच प्रकारची मोहीम राबविली जाते. कचऱ्याची विल्हेवाट हा गंभीर प्रश्न असल्याने कचरा कोंडाळ्यांमुळे शहरवासीयांना डासांचा प्रादुर्भाव तसेच जंतुसंसर्ग होण्याची शक्यता ओळखून रोजच्या रोज कचऱ्याचा उठाव केला जातो. पुरुष कर्मचारी खाकी शर्ट-पॅँट, तर महिला निळ्या साड्यांमध्ये शहरात कचरा उठाव करताना दिसून येतात. त्यांच्याजवळ ग्लोव्हज, चेहऱ्याला मास्क, पायांत गमबूट, अंगावर प्लास्टिकचा कोट अथवा गाऊन अशी कोणतीच स्वसंरक्षणार्थ साधनसामग्री दिसून येत नाही. औषध फवारणी किंवा गटारे साफ करतानाही कर्मचाऱ्यांना श्वास रोखूनच साफसफाई करावी लागते. कचऱ्याच्या दुर्गंधीमधून तर कर्मचाऱ्यांना अनेक रोगरार्इंना सामोरे जावे लागते. महापालिकेने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी चालविलेला हा खेळ त्वरित थांबवावा, अशी मागणी होत आहे.