शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जनतेची काळजी घेणारे स्वच्छ, पारदर्शक सरकार

By admin | Updated: October 8, 2015 00:02 IST

चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन : बहिरेवाडीत समाधान गावभेट योजना; सात हजार लाभार्थ्यांना लाभ मिळणार

उत्तूर : आधीचे सरकार व आताचे असणारे महायुतीचे सरकार यातील फरक जनतेला कळावा म्हणून महायुतीचे सर्वसामान्य जनतेची काळजी घेणारे सरकार म्हणून उल्लेख व्हावा यासाठी स्वच्छ व पारदर्शक कारभार सुरू आहे. सर्वसामान्य जनतेसाठी प्रशासन गतिमान करण्यात येत असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार व वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.बहिरेवाडी (ता. आजरा) येथील सुवर्णजयंती महाराजस्व अभियानांतर्गत समाधान गावभेट योजनेंतर्गत पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी होते. सर्व मान्यवरांची बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. व्यासपीठावर डॉ. जे. पी. नाईक, शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचा सत्कार सरपंच अर्जुन कुंभार, उपसरपंच दत्तात्रय मिसाळ, तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पाटील यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले. जि. प. सदस्य उमेश आपटे यांच्या फंडातून बहिरेवाडीस, ट्रॅक्टर, ताडपत्री, पंखे, सायकली, तसेच आपटे फौंडेशनतर्फे स्कूल बॅग व ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.यावेळी डॉ. सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा वनअधिकारी नाईकडे, जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश आपटे, भुदरगडच्या प्रांताधिकारी कीर्ती नलावडे, चंद्रकांत गोरूले, सुरेश खोत, आदींची भाषणे झाली.यावेळी पंचायत समितीचे सभापती विष्णुपंत केसरकर, आजरा कारखाना अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा, मुकुंद देसाई, माजी सभापती वसंतराव धुरे, पं. स. सदस्या निर्मला व्हनबट्टे, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, प्रांताधिकारी मोनिका सिंह, प्रांताधिकारी कीर्ती नलावडे, जिल्हा कृषी अधिकारी मोहन कांबळे, नायब तहसीलदार डी. डी. कोळी, मंडल अधिकारी पी. डी. कोळी, तलाठी सी. एच. चौगुले, एस. वाय. कांबळे, गटशिक्षणाधिकारी बी. एम. कासार उपस्थित होते.तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. जिल्ह्यात पहिले अभियान असेल की सात हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. ग्रामस्थांनी तहसीलदारांचा सत्कार केला. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. बंडोपंत चौगुले यांनी आभार मानले. (वार्ताहर)जिल्हा वनअधिकाऱ्यांनी गाव घेतले दत्तकजिल्हा वनअधिकारी रंगनाथ नाईकडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक माहिती मिळावी म्हणून विद्यार्थ्यांना खास मार्गदर्शन करणार असून, गाव दत्तक घेऊन बहिरेवाडीतील युवक प्रशासकीय सेवेत मोठ्या संख्येने यावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.