शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

जनतेची काळजी घेणारे स्वच्छ, पारदर्शक सरकार

By admin | Updated: October 8, 2015 00:02 IST

चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन : बहिरेवाडीत समाधान गावभेट योजना; सात हजार लाभार्थ्यांना लाभ मिळणार

उत्तूर : आधीचे सरकार व आताचे असणारे महायुतीचे सरकार यातील फरक जनतेला कळावा म्हणून महायुतीचे सर्वसामान्य जनतेची काळजी घेणारे सरकार म्हणून उल्लेख व्हावा यासाठी स्वच्छ व पारदर्शक कारभार सुरू आहे. सर्वसामान्य जनतेसाठी प्रशासन गतिमान करण्यात येत असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार व वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.बहिरेवाडी (ता. आजरा) येथील सुवर्णजयंती महाराजस्व अभियानांतर्गत समाधान गावभेट योजनेंतर्गत पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी होते. सर्व मान्यवरांची बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. व्यासपीठावर डॉ. जे. पी. नाईक, शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचा सत्कार सरपंच अर्जुन कुंभार, उपसरपंच दत्तात्रय मिसाळ, तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पाटील यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले. जि. प. सदस्य उमेश आपटे यांच्या फंडातून बहिरेवाडीस, ट्रॅक्टर, ताडपत्री, पंखे, सायकली, तसेच आपटे फौंडेशनतर्फे स्कूल बॅग व ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.यावेळी डॉ. सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा वनअधिकारी नाईकडे, जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश आपटे, भुदरगडच्या प्रांताधिकारी कीर्ती नलावडे, चंद्रकांत गोरूले, सुरेश खोत, आदींची भाषणे झाली.यावेळी पंचायत समितीचे सभापती विष्णुपंत केसरकर, आजरा कारखाना अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा, मुकुंद देसाई, माजी सभापती वसंतराव धुरे, पं. स. सदस्या निर्मला व्हनबट्टे, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, प्रांताधिकारी मोनिका सिंह, प्रांताधिकारी कीर्ती नलावडे, जिल्हा कृषी अधिकारी मोहन कांबळे, नायब तहसीलदार डी. डी. कोळी, मंडल अधिकारी पी. डी. कोळी, तलाठी सी. एच. चौगुले, एस. वाय. कांबळे, गटशिक्षणाधिकारी बी. एम. कासार उपस्थित होते.तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. जिल्ह्यात पहिले अभियान असेल की सात हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. ग्रामस्थांनी तहसीलदारांचा सत्कार केला. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. बंडोपंत चौगुले यांनी आभार मानले. (वार्ताहर)जिल्हा वनअधिकाऱ्यांनी गाव घेतले दत्तकजिल्हा वनअधिकारी रंगनाथ नाईकडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक माहिती मिळावी म्हणून विद्यार्थ्यांना खास मार्गदर्शन करणार असून, गाव दत्तक घेऊन बहिरेवाडीतील युवक प्रशासकीय सेवेत मोठ्या संख्येने यावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.