शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

कोल्हापूर शहरात कचऱ्याचा डोंगर...वाढता वाढे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:33 IST

कोल्हापूर : शहरातील कचरा कसबा बावडा ते लाईन बझार दरम्यानच्या जागेत टाकला जातो. ही जागा नागरी वस्तीला लागून असल्याने आणि आता तेथे कचºयाचा मोठा डोंगर तयार झाला असल्याने कचºयासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. साचलेल्या तीन लाख टन कचºयामुळे परिसरात दुर्गंधीचे व कीटकांचे साम्राज्य पसरले आहे.राज्य शासनाने पुढील चाळीस वर्षांचा विचार ...

कोल्हापूर : शहरातील कचरा कसबा बावडा ते लाईन बझार दरम्यानच्या जागेत टाकला जातो. ही जागा नागरी वस्तीला लागून असल्याने आणि आता तेथे कचºयाचा मोठा डोंगर तयार झाला असल्याने कचºयासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. साचलेल्या तीन लाख टन कचºयामुळे परिसरात दुर्गंधीचे व कीटकांचे साम्राज्य पसरले आहे.राज्य शासनाने पुढील चाळीस वर्षांचा विचार करून टोप येथील भली मोठी दगडाची खाण महानगरपालिकेच्या नावे केली. तेथे भूमी पुनर्भरण प्रकल्प राबविण्याचा महापालिकेचा विचार होता; परंतु खाणीपासून दोन-तीन किलोमीटर लांब वस्ती असलेल्या टोप ग्रामस्थांनी यास विरोध केला. राजकीय नेत्यांना या विरोधास पाठबळ दिले. त्यामुळे प्रकल्पाचे काम थांबले. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.त्यानंतर टाकाळा परिसरातील एक खाण निवडली गेली. त्यावर भूमी पुनर्भरण प्रकल्प राबविण्याचे ठरले. त्यावर सुमारे दीड ते दोन कोटी रुपये खर्चही करण्यात आले. लाईन बझार येथे साचलेला सर्व कचरा टाकाळा खणीत आणून टाकण्यासाठी १८ ते २० कोटी रुपये वाहतूक खर्च येणार म्हणून प्रशासकीय अधिकाºयांनी त्यात खोडा घातला. आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करीत अधिकाºयांनी हात वर केले. कचºयापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाचे काम रोकेम कंपनीला दिले; पण कंपनीच्या आर्थिक अडचणीमुळे हे काम रेंगाळले. त्याकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले आणि प्रशासनाने बोटचेपेपणाची भूमिका घेतली. शहरात कचरा टाकण्यास जागा आहेत; पण केवळ इच्छाशक्ती आणि अधिकाºयांची मानसिकता नसल्यामुळे कचºयाचा प्रश्न गंभीर झाला आहे.१) कसबा बावडा ते लाईन बझारदरम्यान असलेल्या डंपिंग ग्राउंडवर सध्या सुमारे तीन लाख टन कचरा साचला असून, त्या ठिकाणी कचºयाचे डोंगर तयार झाले आहेत. त्यामध्ये विघटन न होणाºया कचºयाचे (इनर्ट मटेरियल) प्रमाण सर्वाधिक आहे.२) शास्त्रोक्त पद्धतीने कचºयापासून भूमी पुनर्भरण प्रकल्प राबविण्याकरिता शहरातील टाकाळा खण तयार करण्यात आली आहे. त्यावर सुमारे अडीच कोटी खर्च करण्यात आला आहे; परंतु लाईन बझार ते टाकाळा खणीपर्यंत कचºयाची वाहतूक करण्याचा खर्च १८ ते २० कोटी रुपये येणार आहे. तो महापालिकेस परवडणारा नाही. म्हणून आता सध्याच्या डंपिंग ग्राउंडलाच कॅपिंग करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. त्याला आठ ते नऊ कोटी रुपये खर्च येईल, असा अंदाज आहे.३) शहरातील सर्व घरांतून कचरा रोज घंटागाडीद्वारे उचलला जातो; पण तो साठवायचा कोठे हा प्रशासनासमोर गंभीर प्रश्न आहे.