शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

रोजच्या पाच तासांच्या वाहतूक कोंडीने रुक्मिणीनगरातील नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:41 IST

कोल्हापूर : वन-वे (एकेरी मार्ग) चा नियम धाब्यावर बसवित यु-टर्नबाबतच्या मनाईचे उल्लंघन करत वाहने सुसाटपणे दामटत नेणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांमुळे ...

कोल्हापूर : वन-वे (एकेरी मार्ग) चा नियम धाब्यावर बसवित यु-टर्नबाबतच्या मनाईचे उल्लंघन करत वाहने सुसाटपणे दामटत नेणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांमुळे रुक्मिणीनगरमध्ये रोज पाच तास वाहतुकीची कोंडी होत आहे. शेकडो वाहनांची वर्दळ, त्यांचे वाजणारे हॉर्न, आदींमुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत पोलीस प्रशासनाकडे गेल्या दहा वर्षांपासून पाठपुरावा करूनही वाहतुकीच्या कोडींचा त्रास कमी झालेला नाही.

रुक्मिणीनगर ते निरामय हॉस्पिटलपर्यंतचा (वायचळ पथ ते रुईकर कॉलनी मार्गाला जोडणारा मार्ग) एक किलोमीटर अंतराचा हा रस्ता २० फुटी आहे. या नगरातील हा अंतर्गत रस्ता आहे. मात्र, तावडे हॉटेल, मार्केट यार्डकडून येणारे वाहनधारक लिशा हॉटेल चौक, महाडिक वसाहत आणि ताराराणी चौकातील सिग्नल चुकविण्यासाठी, तर टेंबलाईवाडी उड्डाणपूल, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, सीबीएस स्टँडकडून येणारे सर्रास वाहनधारक हे शॉर्टकट म्हणून रुक्मिणीनगरातील मार्गाचा वापर करतात. त्यात दुचाकी, चारचाकी, स्कूलबस, मालवाहतुकीचे टेम्पो, अवजड वाहनांचा समावेश आहे. या मार्गावर सकाळी साडेसात ते साडेनऊ आणि सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ या वेळेत वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्याचा त्रास होत असल्याने येथील नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांना येथील वाहतुकीला शिस्त लावण्याच्या मागणीची निवेदने दिली. त्यावर गेल्या पाच महिन्यांपूर्वी रक्मिणीनगरातून उड्डाण पुलाकडे जाण्यासाठी हा मार्ग वन-वे केला. त्यासह याठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी नियुक्त केला. मात्र, वाहनधारक हे वाहतूक पोलीस कर्मचारी त्याठिकाणी असेपर्यंतच वन-वे, यु-टर्न मनाई या नियमांचे पालन करतात. संबंधित कर्मचारी नसला की, वाहनधारक नियम धाब्यावर बसवून वाहने दामटतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन त्याचा येथील नागरिकांना त्रास होत आहे. (पूर्वार्ध)

चौकट

घरातून बाहेर पडणे मुश्कील

रुक्मिणीनगरमधील या मार्गालगत सध्या सुमारे पाचशे नागरिक राहतात. उड्डाणपूल होण्यापूर्वी या मार्गावर परिसरातील नागरिकांशिवाय क्वचितच बाहेरील वाहने यायची. त्यामुळे येथून परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग, इव्हिनिंग वॉक करायचे. मात्र, आता रोज पाच तास होणारी वाहतुकीची कोंडी, सुसाटपणे जाणाऱ्या वाहनांमुळे येथील नागरिकांना घरातून बाहेर पडणे, तेथून चालत जाणे मुश्किलीचे झाले आहे.