शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

सर्किट बेंचप्रश्नी पुढील आठवड्यात सहा जिल्हयाची बैठक- २६ ला मुख्य न्यायाधीश यांची भेट : चिटणीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 20:12 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांनी २६ फेब्रुवारीला भेट दिली आहे; त्यामुळे कोल्हापूरसह सहा जिल्तील वकिलांची पुढील आठवड्यात कोल्हापुरात बैठक घेतली जाईल, असे कोल्हापूर

ठळक मुद्दे‘बार’ची सर्वसाधारण सभा : वकिलांसाठी कल्याणकारी योजनेकरिता केंद्र, राज्य सरकारने आर्थिक संकल्पात तरतूद करावी;

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांनी २६ फेब्रुवारीला भेट दिली आहे; त्यामुळे कोल्हापूरसह सहा जिल्तील वकिलांची पुढील आठवड्यात कोल्हापुरात बैठक घेतली जाईल, असे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी सोमवारी सांगितले.

ते जिल्हा बार असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत न्यायसंकुलमधील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. भारतीय विधिज्ञ परिषदेने वकिलांसाठी कल्याणकारी योजनेकरिता केंद्र व राज्य सरकारने आर्थिक संकल्पामध्ये तरतूद करावी व त्या योजना राबविण्यात याव्यात, असा ठराव सभेत यावेळी करण्यात आला.

अ‍ॅड. चिटणीस म्हणाले, मुख्य न्यायाधीश पाटील यांना भेटण्यासाठी कितीजणांचे शिष्टमंडळ जायचे याचा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन करू,फक्त तुम्ही माझ्या पाठीशी राहा. सर्किट बेंचबाबत सहा जिल्'ांपैकी तीन जिल्'ांतील वकिलांशी यापूर्वी माझे बोलणे झाले आहे; त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्हयातील वकिलांची पुढील आठवड्यात बैठक घेणार आहे. त्यात शिष्टमंडळाबाबत निर्णय होईल. शनिवारी (दि. १६) सोलापूर जिल्'ातील वकिलांना भेटू.

अ‍ॅड. राजेंद्र मंडलिक म्हणाले, सर्किट बेंचप्रश्नी सहा जिल्हयातील  वकिलांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या. मुख्य न्यायाधीश पाटील यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने वकिलांची संख्या असावी. अ‍ॅड. किरण पाटील म्हणाले, अजून आपल्याकडे १५ दिवस आहेत. सर्व पदाधिकारी, वकिलांना घेऊन ठोस निर्णय घ्या. मुख्य न्यायाधीश यांच्याकडे सर्किट बेंचप्रश्नी भक्कम बाजू मांडा. अ‍ॅड. अजित मोहिते म्हणाले, मुख्य न्यायाधीश यांच्या भेटीपूर्वी सोलापूर जिल्हयातील वकिलांना भेटण्याचे नियोजन करावे; त्यासाठी एक लक्झरी बस काढून, सर्वजण त्यांच्याकडे जाऊया. अ‍ॅड. विजय महाजन म्हणाले, मुख्य न्यायाधीशांना भेटा; पण ते म्हणतील फाईल पाहतो. मोघमपणे उत्तर देतील; त्यामुळे सर्किट बेंचप्रश्नी ठोस बाजू मांडा.

अ‍ॅड. विवेक घाटगे म्हणाले, कोल्हापूरसह सहा जिल्हयातील आठ ते १0 शिष्टमंडळ मुख्य न्यायाधीशांना भेटावे. अ‍ॅड. अशोक पाटील म्हणाले, २५ ते ३० जणांचे शिष्टमंडळ भेटायला गेल्यावर ताकद दिसेल; त्यामुळे वकिलांची संख्या जास्त असू दे. यावेळी अ‍ॅड. पी. एस. भावके, अ‍ॅड. हुक्कीरे यांनी मते व्यक्तकेली.

सेक्रेटरी अ‍ॅड. सुशांत गुडाळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष अ‍ॅड. आनंदराव जाधव यांनी ठरावाचे वाचन केले. सभेत अ‍ॅड. तहजीज नदाफ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अ‍ॅड. ओेंकार देशपांडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय