शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

सर्किट बेंचचे पुन्हा ‘ग म भ न’

By admin | Updated: August 6, 2015 01:13 IST

पुण्याचा कोलदांडा : मंत्रिमंडळ बैठकीत नव्याने ठराव झाल्याशिवाय वाट बिकट

विश्वास पाटील, कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात होण्यास पुण्याच्या मागणीने कोलदांडा घातला आहे. त्यामुळे येथे गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरू असलेले आंदोलनाची पीछेहाट झाली आहे. आता ‘मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ कोल्हापूरला होण्यास मंत्रिमंडळ मान्यता देत आहे.’ असा एका ओळीचा ठराव नव्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होत नाही तोपर्यंत हे खंडपीठ होण्याची वाट बिकट आहे. त्यामुळे असा ठराव होण्यासाठीच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामार्फत सरकारवर दबाव वाढविण्याची गरज आहे. इतकी वर्षे सातत्याने आंदोलन करूनही कुरघोडीमुळे पुन्हा ही मागणी ‘ग म भ न’ या प्राथमिक टप्प्यावर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन व्हावे, या मागणीसाठी सहा जिल्ह्यांतील सुमारे १७ हजार वकील गेल्या २५ वर्षांपासून लढा देत आहेत. सर्किट बेंचसाठी ‘आर या पार’ची लढाई सुरू ठेवून जोपर्यंत राज्य सरकार व उच्च न्यायालय निर्णय घेत नाही, तोपर्यंत माघार नाही, असा निर्धार वकिलांनी केला होता. त्यांच्या या लढ्याला राजकीय, सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. त्याची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी सर्किट बेंचसाठी मंत्रिमंडळाच्या ठरावाची मागणी केली. त्यानुसार कृती समितीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला. त्याची दखल घेऊन फडणवीस यांनी १२ मे २०१५च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘सर्किट बेंच’चा ठराव मंजूर केला; परंतु हा ठराव करताना त्यास पुणे येथेही आणखी एक फिरते खंडपीठ स्थापन करण्याबाबत विचार करावा, अशी शेपूट जोडली. मुंबई उच्च न्यायालयाची सध्या नागपूर, औरंगाबाद व गोवा अशी तीन खंडपीठे आहेत. त्यामुळे आणखी खंडपीठांना मंजुरी देण्यास उच्च न्यायालय तयार नाही. न्यायालय एकच खंडपीठ देण्यास तयार आहे. त्यामुळे कोल्हापूरचाच ठराव आला तर फिरते खंडपीठ मंजूर होऊ शकते; परंतु सध्याच्या सरकारमध्ये कोल्हापूरपेक्षा पुण्याचा राजकीय प्रभाव जास्त आहे. कारण कोल्हापूर हा दोन्ही काँग्रेसला बळ देणारा जिल्हा आहे. उलट पुण्यात भाजपचे वर्चस्व आहे. पुण्यातील भाजपचे नेते व अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी कोल्हापूरला खंडपीठ देताना त्यात पुण्याच्याही मागणीचा उल्लेख करण्यास मुख्यमंत्र्यांना भाग पाडले. त्यामुळे आता ‘कोल्हापूरलाही नाही व पुण्यालाही नाही’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. पुण्याला खंडपीठ द्यायचे असेल तर ते जरूर द्यावे त्यास कोल्हापूरचा कधीच विरोध नाही, परंतु कोल्हापूरच्या आडवे पुण्याने येऊ नये, अशी येथील वकील व पक्षकारांसह जनतेचीही भावना आहे. कोल्हापूर बार असोसिएशनने खंडपीठाच्या मागणीसाठी आता पुन्हा २४ आॅगस्टपासून आंदोलनाची हाक दिली आहे. प्रसंगी त्यासाठी आत्मदहन करण्याचीही तयारी वकिलांनी ठेवली आहे, परंतु ते करीत असतानाच जोपर्यंत राज्य मंत्रिमंडळ एका ओळीचा ठराव करीत नाही तोपर्यंत ही मागणी मार्गी लागत नाही हे तितकेच खरे आहे. कारण न्याय यंत्रणेला पुण्याच्या मागणीचे आयतेच निमित्त मिळाले आहे. त्यामुळे ठराव मंजूर करून आणा...आम्ही खंडपीठ मंजुरीचा विचार करतो, अशी भूमिका न्याय यंत्रणेची पूर्वीही होती व आताही आहे.