शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्किट बेंच’प्रश्नी वकिलांच्या आशा पल्लवित

By admin | Updated: February 17, 2016 00:45 IST

कृती समिती भेटणार : राजेंद्र चव्हाण यांची माहिती; वाघेलांनी स्वीकारले मुख्य न्यायमूर्तीं पद

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी धीरेंद्र हिरालाल वाघेला यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी सौराष्ट्रमध्ये सर्किट बेंच स्थापन करावे, यासाठी आंदोलन केले होते. ते आता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाल्याने कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेली ३० वर्षे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्याची मागणी उच्च न्यायालयाच्या दरबारी प्रलंबित आहे. खंडपीठ कृती समिती लवकरच मुख्य न्यायमूर्ती वाघेला यांची भेट घेऊन सर्किट बेंचप्रश्नी चर्चा करणार असल्याचे कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रिक्त असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची सूत्रे धीरेंद्र वाघेला यांनी सोमवारी स्वीकारली. वाघेला हे सौराष्ट्रमध्ये वकिली व्यवसाय करत होते. त्यांनी सौराष्ट्रमध्ये सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी गुजरात उच्च न्यायालयाकडे मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी संषर्घमय आंदोलने केली. कामगार चळवळीमध्येही सहभागी होऊन त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. आंदोलनाची धग काय असते, याची जाणीव वाघेला यांना आहे. त्यामुळे सहा जिल्ह्यांतील वकील गेल्या ३० वर्षांपासून सर्किट बेंचसाठी धडपडत आहेत. वाघेलांच्या नियुक्तीने खंडपीठ स्थापनेचा निर्णय सुकर होईल, त्यासाठी वकिलांच्या आशा पल्लवित झाल्या. (प्रतिनिधी) मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी धीरेंद्र वाघेला यांची नियुक्ती झाली आहे. वाघेला यांनी सौराष्ट्रमध्ये सर्किट बेंच स्थापनेसाठी आंदोलन केले होते. त्यांना वकिलांच्या प्रश्नांची जाणीव आहे. त्यामुळे ते सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लावतील, अशी आशा आहे. - अ‍ॅड. शिवाजीराव राणे, माजी निमंत्रक, खंडपीठ कृती समिती गेली ३० वर्षे कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांतील वकिलांच्या संघटना मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी लढत आहेत. दि. २९ आॅगस्ट २०१२ पासून या सहा जिल्ह्यांतील वकिलांनी ‘बेमुदत काम बंद’ आंदोलन केले होते. ते ५५ दिवस सुरू राहिले. तत्कालीन मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी सेवानिवृत्ती घेतल्याने खंडपीठाचा निर्णय नव्या न्यायाधीशांवर सोपविला. त्यानंतर हे पद रिक्त होते. मुख्य न्यायमूर्ती विजया ताहिलरमाणी यांच्याकडे प्रभारी पदभार होता. न्यायसंकुलाच्या उद्घाटनासाठी त्या कोल्हापुरात आल्या होत्या. यावेळी खंडपीठ कृती समितीने त्यांची भेट घेऊन निवेदन दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सर्किट बेंचसाठी सर्वजण सकारात्मक आहेत. शासनाकडून खंडपीठाच्या स्थापनेसाठी अकराशे कोटींच्या निधीला तत्त्वत: मान्यता दिली आहे, असे सांगत येणारे नवे न्यायमूर्ती योग्य निर्णय घेतील, अशी ग्वाही दिली आहे.