शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘सर्किट बेंच’ लटकले, मुख्य न्यायाधीशासह मुख्यमंत्र्यांकडून फक्त आश्वासनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 10:43 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी मुख्य न्यायाधीशासह मुख्यमंत्र्यांच्या फक्त आश्वासनावरच लटकले आहे. पुणे बार असोसिएशनची मागणीही कळीचा मुद्दा ठरत आहे. ठोस असा निर्णय अद्याप कोणत्याही स्तरावर झालेला नाही. खंडपीठ कृती समितीकडून सर्व प्रकारची आंदोलने झाली. आता हीच समिती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्रजोग यांच्या निमंत्रणाची प्रतीक्षा करीत आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने या प्रश्नावर सन जानेवारी २०२० मध्येच घडामोडी घडतील, असे चित्र आहे.

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने ‘सर्किट बेंच’ लटकलेमुख्य न्यायाधीशासह मुख्यमंत्र्यांकडून फक्त आश्वासनच

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी मुख्य न्यायाधीशासह मुख्यमंत्र्यांच्या फक्त आश्वासनावरच लटकले आहे. पुणे बार असोसिएशनची मागणीही कळीचा मुद्दा ठरत आहे. ठोस असा निर्णय अद्याप कोणत्याही स्तरावर झालेला नाही. खंडपीठ कृती समितीकडून सर्व प्रकारची आंदोलने झाली. आता हीच समिती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्रजोग यांच्या निमंत्रणाची प्रतीक्षा करीत आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने या प्रश्नावर सन जानेवारी २०२० मध्येच घडामोडी घडतील, असे चित्र आहे.कोल्हापूरच्या सर्किट बेंचचा प्रश्न गेली काही वर्षे ऐरणीवर आला असून, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यांंतील वकिलांनी या प्रश्नासंबंधी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी घ्यावयाचा असून, त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या प्रश्नासंबंधी खंडपीठ कृती समितीने २८ आॅगस्टला मुख्य न्यायाधीश नंद्रजोग यांची भेट घेतली. यावेळी कृती समिती निमंत्रक अ‍ॅड. रणजित गावडे यांनी तत्कालीन मुख्य न्यायाधीशांसमोर सर्किट बेंच संदर्भातील मंत्रिमंडळाचा ठराव सादर केला आहे. न्यायाधीश नंद्रजोग यांनी कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापनेसंदर्भात मी सकारात्मक असून, लवकरच निर्णय घेतला जाईल, असा विश्वास कृती समितीला दिला होता, असे कृती समिती सांगते.न्यायाधीश नंद्रजोग हे कोल्हापुरातील वकील प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाला आले नाहीत. त्यांनी बैठक घेऊ, असे कृती समितीला सांगितले होते; परंतु या बैठकीचे निमंत्रण त्यांच्याकडून अद्यापही आलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील ठोस निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीत. ते काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आल्यावर त्यांनी कृती समितीला उच्च न्यायाधीशांसोबत बैठकीचा निरोप देतो, असे आश्वासन दिले होते; परंतु त्यांच्याकडूनही कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाही. मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर सर्किट बेंचचा प्रश्न सध्यातरी लटकल्याचे चित्र आहे.

सर्किट बेंच प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्री यांच्या निर्णयावर आहे. दोघांनी बैठकीसाठी निमंत्रण देतो, असे सांगितले आहे; परंतु त्यांच्याकडून अद्यापही बोलावणे आलेले नाही. आम्ही सतत पाठपुरावा करीत असून, लवकरच आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे.अ‍ॅड. रणजित गावडे,कृती समितीचे निमंत्रक 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर