शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

‘सर्किट बेंच’ लटकले, मुख्य न्यायाधीशासह मुख्यमंत्र्यांकडून फक्त आश्वासनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 10:43 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी मुख्य न्यायाधीशासह मुख्यमंत्र्यांच्या फक्त आश्वासनावरच लटकले आहे. पुणे बार असोसिएशनची मागणीही कळीचा मुद्दा ठरत आहे. ठोस असा निर्णय अद्याप कोणत्याही स्तरावर झालेला नाही. खंडपीठ कृती समितीकडून सर्व प्रकारची आंदोलने झाली. आता हीच समिती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्रजोग यांच्या निमंत्रणाची प्रतीक्षा करीत आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने या प्रश्नावर सन जानेवारी २०२० मध्येच घडामोडी घडतील, असे चित्र आहे.

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने ‘सर्किट बेंच’ लटकलेमुख्य न्यायाधीशासह मुख्यमंत्र्यांकडून फक्त आश्वासनच

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी मुख्य न्यायाधीशासह मुख्यमंत्र्यांच्या फक्त आश्वासनावरच लटकले आहे. पुणे बार असोसिएशनची मागणीही कळीचा मुद्दा ठरत आहे. ठोस असा निर्णय अद्याप कोणत्याही स्तरावर झालेला नाही. खंडपीठ कृती समितीकडून सर्व प्रकारची आंदोलने झाली. आता हीच समिती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्रजोग यांच्या निमंत्रणाची प्रतीक्षा करीत आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने या प्रश्नावर सन जानेवारी २०२० मध्येच घडामोडी घडतील, असे चित्र आहे.कोल्हापूरच्या सर्किट बेंचचा प्रश्न गेली काही वर्षे ऐरणीवर आला असून, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यांंतील वकिलांनी या प्रश्नासंबंधी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी घ्यावयाचा असून, त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या प्रश्नासंबंधी खंडपीठ कृती समितीने २८ आॅगस्टला मुख्य न्यायाधीश नंद्रजोग यांची भेट घेतली. यावेळी कृती समिती निमंत्रक अ‍ॅड. रणजित गावडे यांनी तत्कालीन मुख्य न्यायाधीशांसमोर सर्किट बेंच संदर्भातील मंत्रिमंडळाचा ठराव सादर केला आहे. न्यायाधीश नंद्रजोग यांनी कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापनेसंदर्भात मी सकारात्मक असून, लवकरच निर्णय घेतला जाईल, असा विश्वास कृती समितीला दिला होता, असे कृती समिती सांगते.न्यायाधीश नंद्रजोग हे कोल्हापुरातील वकील प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाला आले नाहीत. त्यांनी बैठक घेऊ, असे कृती समितीला सांगितले होते; परंतु या बैठकीचे निमंत्रण त्यांच्याकडून अद्यापही आलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील ठोस निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीत. ते काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आल्यावर त्यांनी कृती समितीला उच्च न्यायाधीशांसोबत बैठकीचा निरोप देतो, असे आश्वासन दिले होते; परंतु त्यांच्याकडूनही कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाही. मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर सर्किट बेंचचा प्रश्न सध्यातरी लटकल्याचे चित्र आहे.

सर्किट बेंच प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्री यांच्या निर्णयावर आहे. दोघांनी बैठकीसाठी निमंत्रण देतो, असे सांगितले आहे; परंतु त्यांच्याकडून अद्यापही बोलावणे आलेले नाही. आम्ही सतत पाठपुरावा करीत असून, लवकरच आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे.अ‍ॅड. रणजित गावडे,कृती समितीचे निमंत्रक 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर