शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्किट बेंच’ लटकले, मुख्य न्यायाधीशासह मुख्यमंत्र्यांकडून फक्त आश्वासनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 10:43 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी मुख्य न्यायाधीशासह मुख्यमंत्र्यांच्या फक्त आश्वासनावरच लटकले आहे. पुणे बार असोसिएशनची मागणीही कळीचा मुद्दा ठरत आहे. ठोस असा निर्णय अद्याप कोणत्याही स्तरावर झालेला नाही. खंडपीठ कृती समितीकडून सर्व प्रकारची आंदोलने झाली. आता हीच समिती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्रजोग यांच्या निमंत्रणाची प्रतीक्षा करीत आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने या प्रश्नावर सन जानेवारी २०२० मध्येच घडामोडी घडतील, असे चित्र आहे.

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने ‘सर्किट बेंच’ लटकलेमुख्य न्यायाधीशासह मुख्यमंत्र्यांकडून फक्त आश्वासनच

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी मुख्य न्यायाधीशासह मुख्यमंत्र्यांच्या फक्त आश्वासनावरच लटकले आहे. पुणे बार असोसिएशनची मागणीही कळीचा मुद्दा ठरत आहे. ठोस असा निर्णय अद्याप कोणत्याही स्तरावर झालेला नाही. खंडपीठ कृती समितीकडून सर्व प्रकारची आंदोलने झाली. आता हीच समिती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्रजोग यांच्या निमंत्रणाची प्रतीक्षा करीत आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने या प्रश्नावर सन जानेवारी २०२० मध्येच घडामोडी घडतील, असे चित्र आहे.कोल्हापूरच्या सर्किट बेंचचा प्रश्न गेली काही वर्षे ऐरणीवर आला असून, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यांंतील वकिलांनी या प्रश्नासंबंधी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी घ्यावयाचा असून, त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या प्रश्नासंबंधी खंडपीठ कृती समितीने २८ आॅगस्टला मुख्य न्यायाधीश नंद्रजोग यांची भेट घेतली. यावेळी कृती समिती निमंत्रक अ‍ॅड. रणजित गावडे यांनी तत्कालीन मुख्य न्यायाधीशांसमोर सर्किट बेंच संदर्भातील मंत्रिमंडळाचा ठराव सादर केला आहे. न्यायाधीश नंद्रजोग यांनी कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापनेसंदर्भात मी सकारात्मक असून, लवकरच निर्णय घेतला जाईल, असा विश्वास कृती समितीला दिला होता, असे कृती समिती सांगते.न्यायाधीश नंद्रजोग हे कोल्हापुरातील वकील प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाला आले नाहीत. त्यांनी बैठक घेऊ, असे कृती समितीला सांगितले होते; परंतु या बैठकीचे निमंत्रण त्यांच्याकडून अद्यापही आलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील ठोस निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीत. ते काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आल्यावर त्यांनी कृती समितीला उच्च न्यायाधीशांसोबत बैठकीचा निरोप देतो, असे आश्वासन दिले होते; परंतु त्यांच्याकडूनही कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाही. मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर सर्किट बेंचचा प्रश्न सध्यातरी लटकल्याचे चित्र आहे.

सर्किट बेंच प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्री यांच्या निर्णयावर आहे. दोघांनी बैठकीसाठी निमंत्रण देतो, असे सांगितले आहे; परंतु त्यांच्याकडून अद्यापही बोलावणे आलेले नाही. आम्ही सतत पाठपुरावा करीत असून, लवकरच आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे.अ‍ॅड. रणजित गावडे,कृती समितीचे निमंत्रक 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर