शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सर्किट बेंच : चर्चा निष्फळ

By admin | Updated: January 30, 2015 00:52 IST

आता ‘ठरावा’चा खोडा : वकील आक्रमक; उद्या तीव्र आंदोलन करणार

कोल्हापूर : कोल्हापुरात सर्किट बेंच हवे असेल तर तसा राज्य शासनाकडून ठराव करून आणा, अशी सूचना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी आज, गुरुवारी झालेल्या बैठकीत केली; परंतु असा ठराव यापूर्वीच शासनाने केला असल्याने नव्याने ठराव करण्याची गरज नाही, असा पवित्रा खंडपीठ कृती समितीने घेतल्याने या प्रश्नावर मुंबईत आज झालेली बैठक निष्फळ ठरली. यानंतर सर्किट बेंच करतानाही कालहरण होत असल्याच्या निषेधार्थ आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय वकिलांनी घेतला. त्यानुसार शनिवारी (दि. ३१) कोल्हापुरातील टाउन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना अटकाव करण्यात येणार आहे.बैठकीतील चर्चेची माहिती कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी पत्रकारांना दिली. कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, सातारा या सहा जिल्ह्यांसाठी प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ स्थापन व्हावे, या मागणीसाठी कोल्हापुरात गेल्या दशकाहून अधिक काळ आंदोलन सुरू आहे. आज मुंबईत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शहा यांच्या दालनात यासंबंधी बैठक झाली. बैठकीत शहा यांनी, कोल्हापूरला सर्किट बेंच हवे असेल तर तसा शासनाकडून ठराव आणावा व राज्य शासनाने पुन्हा कोणत्याही जिल्ह्यात खंडपीठासाठी ठराव करणार नाही, असे लेखी आणावे, अशी सूचना केली. त्यावर खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी, सर्किट बेंचचा निर्णय आपल्या अखत्यारीत आहे. प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ करावे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, यापूर्वी कोल्हापूर सर्किट बेंचसाठी पायाभूत व मूलभूत सुविधा देऊ, असे लेखी पत्र शासनाच्यावतीने दिले आहे. हा प्रश्न आपल्या अखत्यारीत आहे. तो सोडविण्यासाठी तातडीने निर्णय व्हावा, अशी विनंती केली. परंतु न्यायाधीशांकडून त्यासंबंधी सकारात्मक आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. या आंदोलनाचा भाग म्हणून शनिवारी (दि. ३१) न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वाराजवळ अटकाव करण्याचे ठरले. बैठकीला सचिव अ‍ॅड. राजेंद्र मंडलिक, अ‍ॅड. अजित मोहिते, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील (अरळगुंडीकर), अ‍ॅड. अशोक पाटील, अ‍ॅड. दीपक पाटील, अ‍ॅड. धैर्यशील पाटील (सातारा), अ‍ॅड. श्रीकांत जाधव (सांगली) आदी सहभागी झाले.कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, अशी कृती समितीची मागणी आहे. मुंबईत गुरुवारी झालेल्या बैठकीत त्यासंबंधी ठोस आश्वासन न मिळाल्याने सहा जिल्ह्यातील वकिलांनी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. फेबु्रवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईत आंदोलन केले जाईल.- अ‍ॅड. विवेक घाटगे, निमंत्रक, खंडपीठ कृती समिती, कोल्हापूर.