शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

कागलमधील बागेची चित्रपटसृष्टीलाही भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:54 IST

जहाँगीर शेख । लोकमत न्यूज नेटवर्क कागल : दूधगंगा नदी आणि जयसिंगराव तलाव, पाझर तलाव यांच्यामध्ये वसलेल्या कागल शहरात ...

जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : दूधगंगा नदी आणि जयसिंगराव तलाव, पाझर तलाव यांच्यामध्ये वसलेल्या कागल शहरात वृक्षसंपदा कमी नाही. सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र शासनाचा जैव विविधता पार्क येथे आहे. याचबरोबर कागल नगरपालिकेच्या तीन बागा, शाहू साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयासमोरील बगीचा कागलचे सौंदर्य खुलविण्याचे काम करीत आहेत. जयसिंगराव पार्कातील श्रीमंत विजयादेवी घाटगे बगीचा पर्यटकांना आकर्षित करणारा, तर कारखाना कार्यालयासमोरील बगीचा ज्येष्ठ नागरिकांपासून शहरात कामानिमित्त आलेल्या लोकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण बनले आहे. काही किरकोळ अपवाद वगळता शहरातील बागबगीचे ठिकठाकच आहेत.शहरातील निपाणी वेसजवळ असणारे राजर्षी शाहू उद्यान जुने आहे. येथे आकर्षक झाडे आहेत. लहान मुलांसाठी खेळणी आहेत. यातील काही मोडली गेली आहेत. येथील कारंजाही बंद आहे. येथील बगीचाही साधारणच आहे. छत्रपती संभाजीराजे चौकाजवळ असणारे छत्रपती शिवाजी बालोद्यान हे देखील एकेकाळी शहरातील नागरिकांना आकर्षित करणारे उद्यान होते. येथील कोरवी खण मुजवून हे उद्यान विकसित केले होते. कालांतराने पालिकेचे दुर्लक्ष होत गेले. त्यामुळे सध्या येथे केवळ नावापुरते बालोद्यान आहे. येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राला ही जागा दिल्याने तेथे मंदिर उभारले गेले आहे. आमदार हसन मुश्रीफ हे मंत्री असताना कागल शहरासाठी जवळपास दोन एकर जागेत जो विशेष बगीचा मंजूर करून आणला, त्यास कागलचे भूतपूर्व अधिपती कै. श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या पत्नी कै. श्रीमंत विजयादेवी घाटगे यांचे नाव दिले आहे. शहरातील सर्वांत सुंदर असा हा बगीचा आहे. याशिवाय यशवंत किल्ला अ‍ॅम्युझमेन्ट पार्क, पाझर तलाव येथील कै. व्ही. ए. घाटगे बोटिंग क्लबवरही बगीचा विकसित करण्याचा प्रयत्न पालिकेने केला, पण तो अर्धवटच राहिला आहे. नगरपालिकेने यापूर्वी जयसिंगराव तलावाजवळ हर्बल गार्डन, जैव विविधता पार्क उभारण्याच्या घोषणा सर्वसाधारण सभेत झाल्या, पण त्या हवेतच राहिल्या आहेत.सध्या शहरात झपाट्याने उपनगरे तयार होत आहेत. तेथे बगीच्यासाठी जागा आरक्षित करणे आणि तेथे उद्याने तयार करण्याकडे पालिकेने लक्ष दिले पाहिजे. खरे तर भूखंड विकसित करणाऱ्याकडेच ही जबाबदारी दिली पाहिजे. बगीच्यातून सकाळी सकाळी फेरफटका मारावा, व्यायाम करावा, अशा उद्यानांचीही अजून गरज आहे. बगीच्यामधील साहित्याची मोडतोड हाही चिंतेचा विषय आहे.राणी विजयादेवी गार्डनचे आकर्षणया बगीच्याची रचना आणि उभारणी अत्यंत आकर्षक आहे. पालिकेने देखरेखही चांगली ठेवली आहे. दोन एकर जागेत पसरलेल्या या बगीच्यात कारंजा, छोटे पूल, पर्णकुटी, सजावट कमानी, उंच कमानी असणारी गॅलरी, भिंत असलेले संवाद केंद्र, हिरवळीचे गालिचे, विविध झाडे, फुले यांनी हा बगीचा बहरलेला आहे. येथे एका हिंदी, तर तीन मराठी चित्रपटांचे चित्रीकरणही झाले आहे. बागेत प्रवेशासाठीही दोन रूपयाचे तिकीट आकारले जाते.राजर्षी शाहू उद्यानाला विशेष महत्त्व..डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरालगत असलेल्या राजर्षी शाहू उद्यानाला विशेष महत्त्व आहे. येथे राजर्षी शाहूंचा शहरातील पहिला सार्वजनिक अर्धपुतळा १९६६ला उभारण्यात आला. हा पुतळा करवीरचे तत्कालीन छत्रपती शहाजी महाराज यांनी भेट दिला आहे. शाहू कारखान्याच्या कुस्ती स्पर्धेपूर्वी येथूनच क्रीडाज्योत नेली जाते. दलदलीने भरलेला छोटा तलाव मुजवून हे उद्यान विकसित करण्यात आले.‘शाहू’चा बगीचा विरंगुळ्यासाठीबाहेरगावाहून शासकीय व अन्य कामासाठी आलेले नागरिक विश्रांती, शिदोरी खाण्यासाठी शाहू साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयासमोरील बगीच्यात येतात. ऐतिहासिक इमारत, छत्रपती शाहूंचा भव्य पुतळा, सजावट, नारळाची झाडे, हिरवळीचे गालिचे आणि महामार्गालगतच्या ठिकाणामुळे येथे दिवसभर लोक येत असतात. सायंकाळी स्थानिक लोक येतात.