शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रनगरी बनतेय ‘क्राईम’नगरी

By admin | Updated: April 1, 2015 00:05 IST

पोलीस यंत्रणा ‘जैसे थे’ : अवैध धंदे पुन्हा डोके वर काढताहेत

अतुल आंबी - इचलकरंजी शहरातील पोलीस दलात काही बदल झाले आणि अंतर्गत नियोजन बिघडत गेले. चोऱ्यांचे प्रमाण वाढत गेले. धूम स्टाईलने दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणे, वाहनांवरून जाणाऱ्या लोकांच्या बॅगा चोरून लाखो रुपये पळवून नेणे, यासह घरफोड्या, आॅनलाईन बॅँक खात्यावरून चोरी, वाटमारी, शस्त्रांचा धाक दाखवून वेळप्रसंगी मारहाण करून जबरी चोऱ्या यांचा सपाटाच सुरू झाला. आता जिल्ह्यातील मोठा दरोडा इचलकरंजीतील भरवस्तीत पडला. यामध्ये सुमारे साडेचार कोटी रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळविला. मात्र, पोलीस यंत्रणा ‘जैसे थे’ परिस्थितीतूनच जाताना दिसत आहे.शहराची वाढती लोकसंख्या, त्याचबरोबर वाढता गुन्हेगारी आलेख पाहता नव्याने एक पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक निर्माण केले. शहरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची सर्व रिक्त पदे भरली. त्यामुळे शहर पोलीस दलाची संख्या सुमारे ३००च्या वर पोहोचली. आता चोरी, मारामारी यासह अवैध व्यवसायांवर अधिक जरब बसणे गरजेचे होते. मात्र, परिस्थिती वेगळीच झाल्याचे चित्र आहे. आता हळूहळू अवैध व्यवसायिकही आपले डोके वर काढताना दिसत आहेत. शहर परिसरात किरकोळ स्वरूपात उघडपणे मटका, जुगार, गावठी दारूचे अड्डे सुरू झाल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांपूर्वी भरचौकात पडलेल्या दरोड्यामुळे तर पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली आहे. विशेष म्हणजे साडेचार कोटींचा मुद्देमाल लुटून नेला असला, तरी पोलिसांनी तत्काळ तपास यंत्रणा गतिमान न करता हद्दीचा वाद व पाहणी तपासणी करण्यात वेळ काढला. त्यामुळे पाठलाग किंवा नाकाबंदी होऊ शकली नाही. त्याचबरोबर पोलिसांवर येणारे अधिकाऱ्यांचे गंडांतर यामुळे कित्येक पोलिसांचे खबरे दुरावले गेले आहेत, तर कित्येक नव्याने आलेले अधिकारी व पोलीस अबोल असल्यामुळे त्यांचे खबऱ्यांचे नेटवर्कच नाही. त्यामुळे अशा खबऱ्यांच्या माध्यमातून उघडकीस येणारे गुन्हे थांबले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून शहरातील पोलीस यंत्रणा सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.एस. चैतन्य गप्प का ?आयपीएस अधिकारी एस. चैतन्य यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध व्यावसायिकांवर त्यांनी बसविलेली जरब हळूहळू ढिली होत चालल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण होत आहे. चैतन्य यांची बदली झाली का?, त्यांच्या अधिकारावर कोणते बंधन आले का? यासह अनेक प्रश्न सामान्य नागरिकांतून उपस्थित केले जात आहे.खाबुगिरीमुळे परिस्थिती बदललीहद्दीतील अवैध व्यवसाय मोडून निघावेत, सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन सुरळीतपणे चालावे, उद्योजक, व्यापारी यांनी निर्भयपणे आपला व्यवसाय करावा, अशी प्रामाणिक इच्छा बाळगून आपले कर्तव्य चोखपणे पार पाडणारे अनेक पोलीस कार्यरत आहेत. त्यांनी एस. चैतन्य यांना चांगली साथ दिल्यानेच सर्व काही शक्य झाले होते. मात्र, खाबुगिरी मानसिकतेच्या काही पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांमुळे सध्या परिस्थिती बदलल्याचे दिसत आहे.