शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रनगरी बनतेय ‘क्राईम’नगरी

By admin | Updated: April 1, 2015 00:05 IST

पोलीस यंत्रणा ‘जैसे थे’ : अवैध धंदे पुन्हा डोके वर काढताहेत

अतुल आंबी - इचलकरंजी शहरातील पोलीस दलात काही बदल झाले आणि अंतर्गत नियोजन बिघडत गेले. चोऱ्यांचे प्रमाण वाढत गेले. धूम स्टाईलने दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणे, वाहनांवरून जाणाऱ्या लोकांच्या बॅगा चोरून लाखो रुपये पळवून नेणे, यासह घरफोड्या, आॅनलाईन बॅँक खात्यावरून चोरी, वाटमारी, शस्त्रांचा धाक दाखवून वेळप्रसंगी मारहाण करून जबरी चोऱ्या यांचा सपाटाच सुरू झाला. आता जिल्ह्यातील मोठा दरोडा इचलकरंजीतील भरवस्तीत पडला. यामध्ये सुमारे साडेचार कोटी रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळविला. मात्र, पोलीस यंत्रणा ‘जैसे थे’ परिस्थितीतूनच जाताना दिसत आहे.शहराची वाढती लोकसंख्या, त्याचबरोबर वाढता गुन्हेगारी आलेख पाहता नव्याने एक पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक निर्माण केले. शहरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची सर्व रिक्त पदे भरली. त्यामुळे शहर पोलीस दलाची संख्या सुमारे ३००च्या वर पोहोचली. आता चोरी, मारामारी यासह अवैध व्यवसायांवर अधिक जरब बसणे गरजेचे होते. मात्र, परिस्थिती वेगळीच झाल्याचे चित्र आहे. आता हळूहळू अवैध व्यवसायिकही आपले डोके वर काढताना दिसत आहेत. शहर परिसरात किरकोळ स्वरूपात उघडपणे मटका, जुगार, गावठी दारूचे अड्डे सुरू झाल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांपूर्वी भरचौकात पडलेल्या दरोड्यामुळे तर पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली आहे. विशेष म्हणजे साडेचार कोटींचा मुद्देमाल लुटून नेला असला, तरी पोलिसांनी तत्काळ तपास यंत्रणा गतिमान न करता हद्दीचा वाद व पाहणी तपासणी करण्यात वेळ काढला. त्यामुळे पाठलाग किंवा नाकाबंदी होऊ शकली नाही. त्याचबरोबर पोलिसांवर येणारे अधिकाऱ्यांचे गंडांतर यामुळे कित्येक पोलिसांचे खबरे दुरावले गेले आहेत, तर कित्येक नव्याने आलेले अधिकारी व पोलीस अबोल असल्यामुळे त्यांचे खबऱ्यांचे नेटवर्कच नाही. त्यामुळे अशा खबऱ्यांच्या माध्यमातून उघडकीस येणारे गुन्हे थांबले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून शहरातील पोलीस यंत्रणा सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.एस. चैतन्य गप्प का ?आयपीएस अधिकारी एस. चैतन्य यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध व्यावसायिकांवर त्यांनी बसविलेली जरब हळूहळू ढिली होत चालल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण होत आहे. चैतन्य यांची बदली झाली का?, त्यांच्या अधिकारावर कोणते बंधन आले का? यासह अनेक प्रश्न सामान्य नागरिकांतून उपस्थित केले जात आहे.खाबुगिरीमुळे परिस्थिती बदललीहद्दीतील अवैध व्यवसाय मोडून निघावेत, सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन सुरळीतपणे चालावे, उद्योजक, व्यापारी यांनी निर्भयपणे आपला व्यवसाय करावा, अशी प्रामाणिक इच्छा बाळगून आपले कर्तव्य चोखपणे पार पाडणारे अनेक पोलीस कार्यरत आहेत. त्यांनी एस. चैतन्य यांना चांगली साथ दिल्यानेच सर्व काही शक्य झाले होते. मात्र, खाबुगिरी मानसिकतेच्या काही पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांमुळे सध्या परिस्थिती बदलल्याचे दिसत आहे.