शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

परिपत्रक चुलीत घाला, आधी कनेक्शनचे बोला- शेतकऱ्यांचे खडेबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 23:41 IST

शेती पंपाच्या वीज जोडणीत चालढकल करणाºया महावितरण अधिकाऱ्यांना शेतकºयांनी सोमवारी चांगलेच खडेबोल सुनावले. अधिकारी सातत्याने शासन परिपत्रकाचा उल्लेख करू लागल्याने संतप्त शेतकºयांनी तुमचे परिपत्रक घाला चुलीत

ठळक मुद्देमहिन्यात कनेक्शन न दिल्यास कुलूप लावू

कोल्हापूर : शेती पंपाच्या वीज जोडणीत चालढकल करणाºया महावितरण अधिकाऱ्यांना शेतकºयांनी सोमवारी चांगलेच खडेबोल सुनावले. अधिकारी सातत्याने शासन परिपत्रकाचा उल्लेख करू लागल्याने संतप्त शेतकºयांनी तुमचे परिपत्रक घाला चुलीत, कनेक्शन कधी देणार ते सांगा’, अशा शब्दांत संताप व्यक्त केला. प्रलंबित कनेक्शन महिन्याभरात न दिल्यास १ जून रोजी महावितरणच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकू, असा इशाराही देण्यात आला.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील शेतकरी पाच वर्षे वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत. महावितरणची डिपॉझिट भरूनही विभागातील १0 हजार शेतकरी कनेक्शन कधी मिळणार, यासाठी हेलपाटे मारत आहेत. बोअरवेल, विहिरी खोदल्या; पण कनेक्शन नसल्याने पाणी उपसा कसा करायचा, असा पेच आहे; त्यामुळे वीज जोडणी कधी देणार; यासाठी सोमवारी इरिगेशन फेडरेशनच्या वतीने महावितरणच्या अधिकाºयांना जाब विचारला. फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, प्रताप होगाडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी यावेळी उपस्थित होते.

मागण्यांचे निवेदन विभागीय अधीक्षक अभियंता अनिल भोसले यांना देण्यात आले. शेतकºयांनी पैसे भरूनही कनेक्शन का दिले जात नाही. तुमचा ठेकेदार नेमका कोठे काम करीत आहे. जाणीवपूर्वक पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांना टार्गेट केले जात असून, प्रामाणिक वीज भरणाºयांना अशी शिक्षा देणार असाल, तर हे खपवून घेणार नसल्याचे विक्रांत पाटील यांनी सांगितले. अधीक्षक अभियंता शैलेश राठोड हे शेतकºयांशी सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप प्रताप होगाडे यांनी केला.

शेतीपंपांना आठ तास वीज दिली म्हणून त्याप्रमाणे वसुली केली जाते; पण प्रत्यक्षात पाच ते सहा तासच वीज मिळत आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. पैसे भरून शेतकºयांनी किती वर्षे वाट बघायची, महिन्यात प्रलंबित कनेक्शन दिली नाही, तर १ जून रोजी महावितरणच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकू, असा इशारा विक्रांत पाटील यांनी दिला.दरम्यान, उपसाबंदी विरोधात इरिगेशन फेडरेशनने पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांना निवेदन दिले.पाच वर्षांत १६६ कनेक्शनमहावितरणच्या कनेक्शन जोडणीच्या गतीवर जोरदार टीका करताना विक्रांत पाटील म्हणाले, पाच वर्षांत केवळ १६६ कनेक्शन जोडण्यात आली. यावरून तुमच्या कामाची गती किती हे लक्षात येते.इरिगेशन फेडरेशनच्यावतीने सोमवारी प्रलंबित शेतीपंपांना वीज कनेक्शन द्यावे, या मागणीचे निवेदन महावितरणचे विभागीय अधीक्षक अभियंता अनिल भोसले यांना दिले. यावेळी बाबासाहेब पाटील, प्रताप होगाडे, आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणStrikeसंप