शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

परिपत्रक चुलीत घाला, आधी कनेक्शनचे बोला- शेतकऱ्यांचे खडेबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 23:41 IST

शेती पंपाच्या वीज जोडणीत चालढकल करणाºया महावितरण अधिकाऱ्यांना शेतकºयांनी सोमवारी चांगलेच खडेबोल सुनावले. अधिकारी सातत्याने शासन परिपत्रकाचा उल्लेख करू लागल्याने संतप्त शेतकºयांनी तुमचे परिपत्रक घाला चुलीत

ठळक मुद्देमहिन्यात कनेक्शन न दिल्यास कुलूप लावू

कोल्हापूर : शेती पंपाच्या वीज जोडणीत चालढकल करणाºया महावितरण अधिकाऱ्यांना शेतकºयांनी सोमवारी चांगलेच खडेबोल सुनावले. अधिकारी सातत्याने शासन परिपत्रकाचा उल्लेख करू लागल्याने संतप्त शेतकºयांनी तुमचे परिपत्रक घाला चुलीत, कनेक्शन कधी देणार ते सांगा’, अशा शब्दांत संताप व्यक्त केला. प्रलंबित कनेक्शन महिन्याभरात न दिल्यास १ जून रोजी महावितरणच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकू, असा इशाराही देण्यात आला.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील शेतकरी पाच वर्षे वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत. महावितरणची डिपॉझिट भरूनही विभागातील १0 हजार शेतकरी कनेक्शन कधी मिळणार, यासाठी हेलपाटे मारत आहेत. बोअरवेल, विहिरी खोदल्या; पण कनेक्शन नसल्याने पाणी उपसा कसा करायचा, असा पेच आहे; त्यामुळे वीज जोडणी कधी देणार; यासाठी सोमवारी इरिगेशन फेडरेशनच्या वतीने महावितरणच्या अधिकाºयांना जाब विचारला. फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, प्रताप होगाडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी यावेळी उपस्थित होते.

मागण्यांचे निवेदन विभागीय अधीक्षक अभियंता अनिल भोसले यांना देण्यात आले. शेतकºयांनी पैसे भरूनही कनेक्शन का दिले जात नाही. तुमचा ठेकेदार नेमका कोठे काम करीत आहे. जाणीवपूर्वक पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांना टार्गेट केले जात असून, प्रामाणिक वीज भरणाºयांना अशी शिक्षा देणार असाल, तर हे खपवून घेणार नसल्याचे विक्रांत पाटील यांनी सांगितले. अधीक्षक अभियंता शैलेश राठोड हे शेतकºयांशी सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप प्रताप होगाडे यांनी केला.

शेतीपंपांना आठ तास वीज दिली म्हणून त्याप्रमाणे वसुली केली जाते; पण प्रत्यक्षात पाच ते सहा तासच वीज मिळत आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. पैसे भरून शेतकºयांनी किती वर्षे वाट बघायची, महिन्यात प्रलंबित कनेक्शन दिली नाही, तर १ जून रोजी महावितरणच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकू, असा इशारा विक्रांत पाटील यांनी दिला.दरम्यान, उपसाबंदी विरोधात इरिगेशन फेडरेशनने पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांना निवेदन दिले.पाच वर्षांत १६६ कनेक्शनमहावितरणच्या कनेक्शन जोडणीच्या गतीवर जोरदार टीका करताना विक्रांत पाटील म्हणाले, पाच वर्षांत केवळ १६६ कनेक्शन जोडण्यात आली. यावरून तुमच्या कामाची गती किती हे लक्षात येते.इरिगेशन फेडरेशनच्यावतीने सोमवारी प्रलंबित शेतीपंपांना वीज कनेक्शन द्यावे, या मागणीचे निवेदन महावितरणचे विभागीय अधीक्षक अभियंता अनिल भोसले यांना दिले. यावेळी बाबासाहेब पाटील, प्रताप होगाडे, आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणStrikeसंप