शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

परिपत्रक चुलीत घाला, आधी कनेक्शनचे बोला- शेतकऱ्यांचे खडेबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 23:41 IST

शेती पंपाच्या वीज जोडणीत चालढकल करणाºया महावितरण अधिकाऱ्यांना शेतकºयांनी सोमवारी चांगलेच खडेबोल सुनावले. अधिकारी सातत्याने शासन परिपत्रकाचा उल्लेख करू लागल्याने संतप्त शेतकºयांनी तुमचे परिपत्रक घाला चुलीत

ठळक मुद्देमहिन्यात कनेक्शन न दिल्यास कुलूप लावू

कोल्हापूर : शेती पंपाच्या वीज जोडणीत चालढकल करणाºया महावितरण अधिकाऱ्यांना शेतकºयांनी सोमवारी चांगलेच खडेबोल सुनावले. अधिकारी सातत्याने शासन परिपत्रकाचा उल्लेख करू लागल्याने संतप्त शेतकºयांनी तुमचे परिपत्रक घाला चुलीत, कनेक्शन कधी देणार ते सांगा’, अशा शब्दांत संताप व्यक्त केला. प्रलंबित कनेक्शन महिन्याभरात न दिल्यास १ जून रोजी महावितरणच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकू, असा इशाराही देण्यात आला.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील शेतकरी पाच वर्षे वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत. महावितरणची डिपॉझिट भरूनही विभागातील १0 हजार शेतकरी कनेक्शन कधी मिळणार, यासाठी हेलपाटे मारत आहेत. बोअरवेल, विहिरी खोदल्या; पण कनेक्शन नसल्याने पाणी उपसा कसा करायचा, असा पेच आहे; त्यामुळे वीज जोडणी कधी देणार; यासाठी सोमवारी इरिगेशन फेडरेशनच्या वतीने महावितरणच्या अधिकाºयांना जाब विचारला. फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, प्रताप होगाडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी यावेळी उपस्थित होते.

मागण्यांचे निवेदन विभागीय अधीक्षक अभियंता अनिल भोसले यांना देण्यात आले. शेतकºयांनी पैसे भरूनही कनेक्शन का दिले जात नाही. तुमचा ठेकेदार नेमका कोठे काम करीत आहे. जाणीवपूर्वक पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांना टार्गेट केले जात असून, प्रामाणिक वीज भरणाºयांना अशी शिक्षा देणार असाल, तर हे खपवून घेणार नसल्याचे विक्रांत पाटील यांनी सांगितले. अधीक्षक अभियंता शैलेश राठोड हे शेतकºयांशी सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप प्रताप होगाडे यांनी केला.

शेतीपंपांना आठ तास वीज दिली म्हणून त्याप्रमाणे वसुली केली जाते; पण प्रत्यक्षात पाच ते सहा तासच वीज मिळत आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. पैसे भरून शेतकºयांनी किती वर्षे वाट बघायची, महिन्यात प्रलंबित कनेक्शन दिली नाही, तर १ जून रोजी महावितरणच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकू, असा इशारा विक्रांत पाटील यांनी दिला.दरम्यान, उपसाबंदी विरोधात इरिगेशन फेडरेशनने पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांना निवेदन दिले.पाच वर्षांत १६६ कनेक्शनमहावितरणच्या कनेक्शन जोडणीच्या गतीवर जोरदार टीका करताना विक्रांत पाटील म्हणाले, पाच वर्षांत केवळ १६६ कनेक्शन जोडण्यात आली. यावरून तुमच्या कामाची गती किती हे लक्षात येते.इरिगेशन फेडरेशनच्यावतीने सोमवारी प्रलंबित शेतीपंपांना वीज कनेक्शन द्यावे, या मागणीचे निवेदन महावितरणचे विभागीय अधीक्षक अभियंता अनिल भोसले यांना दिले. यावेळी बाबासाहेब पाटील, प्रताप होगाडे, आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणStrikeसंप