शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी नेत्यांचे सोयीचे ‘ठोके’; कार्यकर्त्यांची धडधड वाढविणार

By admin | Updated: September 30, 2014 01:04 IST

‘सोयीच्या राजकारणा’मुळे विधानसभा निवडणुकीत पक्ष बॅकफूटवर पडल्याची चर्चा

राजाराम लोंढे / कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘सोयीच्या राजकारणा’मुळे विधानसभा निवडणुकीत पक्ष बॅकफूटवर पडल्याची चर्चा कार्यकर्त्यांत सुरू आहे. दहांपैकी चारच ठिकाणी पक्षाने ताकदीचे उमेदवार देऊन नेत्यांनी आपले मतदारसंघ सुरक्षित करत पक्षांतर्गत विरोधकांशी काटशहाचे राजकारण केल्याचेही बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कोल्हापुरात झाली. त्यामुळे साहजिकच पक्षाची मुळे येथे लवकर रुजली. स्थापनेनंतर दीड-दोन वर्षांत पक्षाने जिल्ह्यातील ‘गोकुळ’वगळता सर्वच सत्तास्थाने आपल्या ताब्यात घेतली; पण अलीकडील पाच-सहा वर्षांत पक्षातील वातावरण काहीसे गढूळ बनले. पक्षांतर्गत शह-काटशहाचे राजकारण सुरू झाल्याने पक्षाला गळती लागण्यास सुरुवात झाली. त्याचा पहिला झटका २००९ च्या लोकसभा निवडणुकीत बसला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला तीन जागा मिळाल्या. या तिन्ही नेत्यांनी आपले मतदारसंघ सोडून इतर ठिकाणी लक्ष न दिल्याने पक्षावर उमेदवार शोधण्याची वेळ आली. पक्षाचे राज्यपातळीवरील नेते स्वबळाची भाषा करीत असताना जिल्ह्यात काहीच तयारी नव्हती. आपापले मतदारसंघ सुरक्षित ठेवण्यासाठीच नेत्यांच्या तडजोडी सुरू होत्या. कोल्हापुरात पक्षाचा प्रचार प्रारंभ सभेत दहाच्या-दहा जागा जिंकण्याची गर्जना केली होती; परंतु प्रत्यक्षात दहा मतदारसंघांत ताकदीचे उमेदवारही या पक्षाला देता आले नाहीत. लढायच्या अगोदरच करवीरच्या रिंगणातून माघार घेतली. येथे ‘जनसुराज्य’च्या उमेदवाराला पाठिंबा दिला असला, तरी माघारीमागे शिवसेनेच्या उमेदवाराला मदतच अशीच चर्चा मतदारसंघात आहे. ‘दक्षिण’मध्ये ऐनवेळी महायुतीतील घटक पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या दूर्वास कदम यांना उमेदवारी दिली; पण भाजप उमेदवाराच्या सोयीसाठी येथेही पक्षाचे चिन्ह दिसणार नसल्याची खबरदारी घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. जिथे खासदार धनंजय महाडिक यांनी गेली निवडणूक प्रतिष्ठेने लढविली, तिथे पक्षाला ताकदीचा उमेदवार मिळू नये. या मागील नेमके राज‘कारण’ काय हेच कार्यकर्त्यांना समजेनासे झाले आहे. ‘शाहूवाडी’मधून बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी दिली. पाटील हे विनय कोरे यांचे कट्टर विरोधक आहेत. त्यांना उमेदवारी न दिल्यास ते अन्य कुणाला तरी मदत करतील म्हणून त्यांनाच निवडणुकीत गुंतवून ठेवण्याची खेळी खेळण्यात आली आहे. येथेही राष्ट्रवादीने जुन्या मित्राचा मार्ग सोपा केल्याची चर्चा सुरू आहे. हातकणंगलेमध्ये पक्षातील कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्यालाच उमेदवारी दिली. तेथेही तसेच राजकारण आकारास आले आहे. ‘कोल्हापूर उत्तर’मधून पक्षाचे निष्ठावंत आर. के. पोवार यांना उमेदवारी दिली; पण ते प्रचारात एकाकी दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत ताकदीने बाहेर पडलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक कुठे आहेत? यामागील ‘इंगित’ काय याचीही चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षापेक्षा आपलीच सोय अधिक बघितल्याने कार्यकर्त्यांमधून संतप्त प्रतिक्रिया आहेत. माने गटाला शह ! लोकसभा निवडणुकीपासून निवेदिता माने यांच्या गटाला झुलवत ठेवले आहे. धैर्यशील माने यांना शिरोळमधून उमेदवारी मिळविण्यासाठी माने वहिनींनी शर्थीचे प्रयत्न केले; पण तेही व्यर्थ ठरले. इचलकरंजीतही त्यांच्या गटाला शह देण्याचा प्रयत्न केल्याने माने गटातून तीव्र नाराजी आहे. असाच प्रकार चंदगडच्या बाबतीतही झाला आहे. तेथेही घराण्याचा वाद विकोपाला गेला आहे.