शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
3
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
4
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
5
pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
6
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
7
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
8
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
9
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
10
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
11
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
12
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
13
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."
14
'परवानगी मिळाली नाही, १९६२ च्या युद्धात हवाई दलाचा वापर झाला असता तर...", चीनवर CDS यांचे मोठे विधान
15
Crime: स्मशानभूमीत महिलांच्या मृतदेहांसोबत...; तरुणाचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद, पाहून नागरिक हादरले!
16
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
17
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
18
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
19
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
20
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय

राष्ट्रवादी नेत्यांचे सोयीचे ‘ठोके’; कार्यकर्त्यांची धडधड वाढविणार

By admin | Updated: September 30, 2014 01:04 IST

‘सोयीच्या राजकारणा’मुळे विधानसभा निवडणुकीत पक्ष बॅकफूटवर पडल्याची चर्चा

राजाराम लोंढे / कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘सोयीच्या राजकारणा’मुळे विधानसभा निवडणुकीत पक्ष बॅकफूटवर पडल्याची चर्चा कार्यकर्त्यांत सुरू आहे. दहांपैकी चारच ठिकाणी पक्षाने ताकदीचे उमेदवार देऊन नेत्यांनी आपले मतदारसंघ सुरक्षित करत पक्षांतर्गत विरोधकांशी काटशहाचे राजकारण केल्याचेही बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कोल्हापुरात झाली. त्यामुळे साहजिकच पक्षाची मुळे येथे लवकर रुजली. स्थापनेनंतर दीड-दोन वर्षांत पक्षाने जिल्ह्यातील ‘गोकुळ’वगळता सर्वच सत्तास्थाने आपल्या ताब्यात घेतली; पण अलीकडील पाच-सहा वर्षांत पक्षातील वातावरण काहीसे गढूळ बनले. पक्षांतर्गत शह-काटशहाचे राजकारण सुरू झाल्याने पक्षाला गळती लागण्यास सुरुवात झाली. त्याचा पहिला झटका २००९ च्या लोकसभा निवडणुकीत बसला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला तीन जागा मिळाल्या. या तिन्ही नेत्यांनी आपले मतदारसंघ सोडून इतर ठिकाणी लक्ष न दिल्याने पक्षावर उमेदवार शोधण्याची वेळ आली. पक्षाचे राज्यपातळीवरील नेते स्वबळाची भाषा करीत असताना जिल्ह्यात काहीच तयारी नव्हती. आपापले मतदारसंघ सुरक्षित ठेवण्यासाठीच नेत्यांच्या तडजोडी सुरू होत्या. कोल्हापुरात पक्षाचा प्रचार प्रारंभ सभेत दहाच्या-दहा जागा जिंकण्याची गर्जना केली होती; परंतु प्रत्यक्षात दहा मतदारसंघांत ताकदीचे उमेदवारही या पक्षाला देता आले नाहीत. लढायच्या अगोदरच करवीरच्या रिंगणातून माघार घेतली. येथे ‘जनसुराज्य’च्या उमेदवाराला पाठिंबा दिला असला, तरी माघारीमागे शिवसेनेच्या उमेदवाराला मदतच अशीच चर्चा मतदारसंघात आहे. ‘दक्षिण’मध्ये ऐनवेळी महायुतीतील घटक पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या दूर्वास कदम यांना उमेदवारी दिली; पण भाजप उमेदवाराच्या सोयीसाठी येथेही पक्षाचे चिन्ह दिसणार नसल्याची खबरदारी घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. जिथे खासदार धनंजय महाडिक यांनी गेली निवडणूक प्रतिष्ठेने लढविली, तिथे पक्षाला ताकदीचा उमेदवार मिळू नये. या मागील नेमके राज‘कारण’ काय हेच कार्यकर्त्यांना समजेनासे झाले आहे. ‘शाहूवाडी’मधून बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी दिली. पाटील हे विनय कोरे यांचे कट्टर विरोधक आहेत. त्यांना उमेदवारी न दिल्यास ते अन्य कुणाला तरी मदत करतील म्हणून त्यांनाच निवडणुकीत गुंतवून ठेवण्याची खेळी खेळण्यात आली आहे. येथेही राष्ट्रवादीने जुन्या मित्राचा मार्ग सोपा केल्याची चर्चा सुरू आहे. हातकणंगलेमध्ये पक्षातील कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्यालाच उमेदवारी दिली. तेथेही तसेच राजकारण आकारास आले आहे. ‘कोल्हापूर उत्तर’मधून पक्षाचे निष्ठावंत आर. के. पोवार यांना उमेदवारी दिली; पण ते प्रचारात एकाकी दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत ताकदीने बाहेर पडलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक कुठे आहेत? यामागील ‘इंगित’ काय याचीही चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षापेक्षा आपलीच सोय अधिक बघितल्याने कार्यकर्त्यांमधून संतप्त प्रतिक्रिया आहेत. माने गटाला शह ! लोकसभा निवडणुकीपासून निवेदिता माने यांच्या गटाला झुलवत ठेवले आहे. धैर्यशील माने यांना शिरोळमधून उमेदवारी मिळविण्यासाठी माने वहिनींनी शर्थीचे प्रयत्न केले; पण तेही व्यर्थ ठरले. इचलकरंजीतही त्यांच्या गटाला शह देण्याचा प्रयत्न केल्याने माने गटातून तीव्र नाराजी आहे. असाच प्रकार चंदगडच्या बाबतीतही झाला आहे. तेथेही घराण्याचा वाद विकोपाला गेला आहे.