शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी नेत्यांचे सोयीचे ‘ठोके’; कार्यकर्त्यांची धडधड वाढविणार

By admin | Updated: September 30, 2014 01:04 IST

‘सोयीच्या राजकारणा’मुळे विधानसभा निवडणुकीत पक्ष बॅकफूटवर पडल्याची चर्चा

राजाराम लोंढे / कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘सोयीच्या राजकारणा’मुळे विधानसभा निवडणुकीत पक्ष बॅकफूटवर पडल्याची चर्चा कार्यकर्त्यांत सुरू आहे. दहांपैकी चारच ठिकाणी पक्षाने ताकदीचे उमेदवार देऊन नेत्यांनी आपले मतदारसंघ सुरक्षित करत पक्षांतर्गत विरोधकांशी काटशहाचे राजकारण केल्याचेही बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कोल्हापुरात झाली. त्यामुळे साहजिकच पक्षाची मुळे येथे लवकर रुजली. स्थापनेनंतर दीड-दोन वर्षांत पक्षाने जिल्ह्यातील ‘गोकुळ’वगळता सर्वच सत्तास्थाने आपल्या ताब्यात घेतली; पण अलीकडील पाच-सहा वर्षांत पक्षातील वातावरण काहीसे गढूळ बनले. पक्षांतर्गत शह-काटशहाचे राजकारण सुरू झाल्याने पक्षाला गळती लागण्यास सुरुवात झाली. त्याचा पहिला झटका २००९ च्या लोकसभा निवडणुकीत बसला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला तीन जागा मिळाल्या. या तिन्ही नेत्यांनी आपले मतदारसंघ सोडून इतर ठिकाणी लक्ष न दिल्याने पक्षावर उमेदवार शोधण्याची वेळ आली. पक्षाचे राज्यपातळीवरील नेते स्वबळाची भाषा करीत असताना जिल्ह्यात काहीच तयारी नव्हती. आपापले मतदारसंघ सुरक्षित ठेवण्यासाठीच नेत्यांच्या तडजोडी सुरू होत्या. कोल्हापुरात पक्षाचा प्रचार प्रारंभ सभेत दहाच्या-दहा जागा जिंकण्याची गर्जना केली होती; परंतु प्रत्यक्षात दहा मतदारसंघांत ताकदीचे उमेदवारही या पक्षाला देता आले नाहीत. लढायच्या अगोदरच करवीरच्या रिंगणातून माघार घेतली. येथे ‘जनसुराज्य’च्या उमेदवाराला पाठिंबा दिला असला, तरी माघारीमागे शिवसेनेच्या उमेदवाराला मदतच अशीच चर्चा मतदारसंघात आहे. ‘दक्षिण’मध्ये ऐनवेळी महायुतीतील घटक पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या दूर्वास कदम यांना उमेदवारी दिली; पण भाजप उमेदवाराच्या सोयीसाठी येथेही पक्षाचे चिन्ह दिसणार नसल्याची खबरदारी घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. जिथे खासदार धनंजय महाडिक यांनी गेली निवडणूक प्रतिष्ठेने लढविली, तिथे पक्षाला ताकदीचा उमेदवार मिळू नये. या मागील नेमके राज‘कारण’ काय हेच कार्यकर्त्यांना समजेनासे झाले आहे. ‘शाहूवाडी’मधून बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी दिली. पाटील हे विनय कोरे यांचे कट्टर विरोधक आहेत. त्यांना उमेदवारी न दिल्यास ते अन्य कुणाला तरी मदत करतील म्हणून त्यांनाच निवडणुकीत गुंतवून ठेवण्याची खेळी खेळण्यात आली आहे. येथेही राष्ट्रवादीने जुन्या मित्राचा मार्ग सोपा केल्याची चर्चा सुरू आहे. हातकणंगलेमध्ये पक्षातील कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्यालाच उमेदवारी दिली. तेथेही तसेच राजकारण आकारास आले आहे. ‘कोल्हापूर उत्तर’मधून पक्षाचे निष्ठावंत आर. के. पोवार यांना उमेदवारी दिली; पण ते प्रचारात एकाकी दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत ताकदीने बाहेर पडलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक कुठे आहेत? यामागील ‘इंगित’ काय याचीही चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षापेक्षा आपलीच सोय अधिक बघितल्याने कार्यकर्त्यांमधून संतप्त प्रतिक्रिया आहेत. माने गटाला शह ! लोकसभा निवडणुकीपासून निवेदिता माने यांच्या गटाला झुलवत ठेवले आहे. धैर्यशील माने यांना शिरोळमधून उमेदवारी मिळविण्यासाठी माने वहिनींनी शर्थीचे प्रयत्न केले; पण तेही व्यर्थ ठरले. इचलकरंजीतही त्यांच्या गटाला शह देण्याचा प्रयत्न केल्याने माने गटातून तीव्र नाराजी आहे. असाच प्रकार चंदगडच्या बाबतीतही झाला आहे. तेथेही घराण्याचा वाद विकोपाला गेला आहे.