शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

राष्ट्रवादी नेत्यांचे सोयीचे ‘ठोके’; कार्यकर्त्यांची धडधड वाढविणार

By admin | Updated: September 30, 2014 01:04 IST

‘सोयीच्या राजकारणा’मुळे विधानसभा निवडणुकीत पक्ष बॅकफूटवर पडल्याची चर्चा

राजाराम लोंढे / कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘सोयीच्या राजकारणा’मुळे विधानसभा निवडणुकीत पक्ष बॅकफूटवर पडल्याची चर्चा कार्यकर्त्यांत सुरू आहे. दहांपैकी चारच ठिकाणी पक्षाने ताकदीचे उमेदवार देऊन नेत्यांनी आपले मतदारसंघ सुरक्षित करत पक्षांतर्गत विरोधकांशी काटशहाचे राजकारण केल्याचेही बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कोल्हापुरात झाली. त्यामुळे साहजिकच पक्षाची मुळे येथे लवकर रुजली. स्थापनेनंतर दीड-दोन वर्षांत पक्षाने जिल्ह्यातील ‘गोकुळ’वगळता सर्वच सत्तास्थाने आपल्या ताब्यात घेतली; पण अलीकडील पाच-सहा वर्षांत पक्षातील वातावरण काहीसे गढूळ बनले. पक्षांतर्गत शह-काटशहाचे राजकारण सुरू झाल्याने पक्षाला गळती लागण्यास सुरुवात झाली. त्याचा पहिला झटका २००९ च्या लोकसभा निवडणुकीत बसला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला तीन जागा मिळाल्या. या तिन्ही नेत्यांनी आपले मतदारसंघ सोडून इतर ठिकाणी लक्ष न दिल्याने पक्षावर उमेदवार शोधण्याची वेळ आली. पक्षाचे राज्यपातळीवरील नेते स्वबळाची भाषा करीत असताना जिल्ह्यात काहीच तयारी नव्हती. आपापले मतदारसंघ सुरक्षित ठेवण्यासाठीच नेत्यांच्या तडजोडी सुरू होत्या. कोल्हापुरात पक्षाचा प्रचार प्रारंभ सभेत दहाच्या-दहा जागा जिंकण्याची गर्जना केली होती; परंतु प्रत्यक्षात दहा मतदारसंघांत ताकदीचे उमेदवारही या पक्षाला देता आले नाहीत. लढायच्या अगोदरच करवीरच्या रिंगणातून माघार घेतली. येथे ‘जनसुराज्य’च्या उमेदवाराला पाठिंबा दिला असला, तरी माघारीमागे शिवसेनेच्या उमेदवाराला मदतच अशीच चर्चा मतदारसंघात आहे. ‘दक्षिण’मध्ये ऐनवेळी महायुतीतील घटक पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या दूर्वास कदम यांना उमेदवारी दिली; पण भाजप उमेदवाराच्या सोयीसाठी येथेही पक्षाचे चिन्ह दिसणार नसल्याची खबरदारी घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. जिथे खासदार धनंजय महाडिक यांनी गेली निवडणूक प्रतिष्ठेने लढविली, तिथे पक्षाला ताकदीचा उमेदवार मिळू नये. या मागील नेमके राज‘कारण’ काय हेच कार्यकर्त्यांना समजेनासे झाले आहे. ‘शाहूवाडी’मधून बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी दिली. पाटील हे विनय कोरे यांचे कट्टर विरोधक आहेत. त्यांना उमेदवारी न दिल्यास ते अन्य कुणाला तरी मदत करतील म्हणून त्यांनाच निवडणुकीत गुंतवून ठेवण्याची खेळी खेळण्यात आली आहे. येथेही राष्ट्रवादीने जुन्या मित्राचा मार्ग सोपा केल्याची चर्चा सुरू आहे. हातकणंगलेमध्ये पक्षातील कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्यालाच उमेदवारी दिली. तेथेही तसेच राजकारण आकारास आले आहे. ‘कोल्हापूर उत्तर’मधून पक्षाचे निष्ठावंत आर. के. पोवार यांना उमेदवारी दिली; पण ते प्रचारात एकाकी दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत ताकदीने बाहेर पडलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक कुठे आहेत? यामागील ‘इंगित’ काय याचीही चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षापेक्षा आपलीच सोय अधिक बघितल्याने कार्यकर्त्यांमधून संतप्त प्रतिक्रिया आहेत. माने गटाला शह ! लोकसभा निवडणुकीपासून निवेदिता माने यांच्या गटाला झुलवत ठेवले आहे. धैर्यशील माने यांना शिरोळमधून उमेदवारी मिळविण्यासाठी माने वहिनींनी शर्थीचे प्रयत्न केले; पण तेही व्यर्थ ठरले. इचलकरंजीतही त्यांच्या गटाला शह देण्याचा प्रयत्न केल्याने माने गटातून तीव्र नाराजी आहे. असाच प्रकार चंदगडच्या बाबतीतही झाला आहे. तेथेही घराण्याचा वाद विकोपाला गेला आहे.