शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

चिपरीत नऊ वर्षांपासून मोफत आरोग्य सेवेचा वसा- जीवनदीप आरोग्य सेवा संस्था : रणजित आवळे, विजय कांबळे या दोन तरुणांचा प्रेरणादायी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:28 IST

उदगाव : शिरोळ तालुक्यातील चिपरी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने जयसिंगपूर येथे उपचारासाठी जाणे सर्वसामान्य लोकांना परवडत नाही.

संतोष बामणे ।उदगाव : शिरोळ तालुक्यातील चिपरी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने जयसिंगपूर येथे उपचारासाठी जाणे सर्वसामान्य लोकांना परवडत नाही. त्यामुळे एक पाऊल पुढे येऊन रणजित आवळे व विजय कांबळे या दोन युवकांनी जीवनदीप आरोग्य सेवा संस्थेची स्थापना करून ते गेल्या नऊ वर्षांपासून चिपरीच्या नागरिकांना मोफत आरोग्य सेवा व औषधे देत आहेत. ग्रामीण भागात ही संस्था चिपरीकरांना आधारवड बनली आहे.

सध्या होत असलेल्या आजारांमुळे अनेक रुग्णांना उपचार मिळत नाहीत. आर्थिक अडचणींमुळे रुग्ण दगावतात. याचा अनुभव घेऊन रणजित आवळे व विजय कांबळे यांनी २००८ साली जीवनदीप आरोग्य सेवा संस्थेची स्थापना केली. चिपरी येथील बस थांब्याजवळच मोफत दवाखाना केंद्र आहे. नागरिकांना चांगली व विनामूल्य आरोग्यसेवा मिळावी यासाठी या संस्थेत रुग्णांची ताप, सर्दी, खोकला, पोटदुखी, गुडघेदुखी आजारांची तपासणी करून औषधे दिली जातात. आठवड्यातून सोमवार, बुधवार, शुक्रवार व रविवारी हे चार दिवस दवाखान्याची सोय आहे.

डॉ. सुरेश पाटील (जयसिंगपूर), डॉ. मिलिंद कोलप (डॉ. जे. जे. मगदूम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज), डॉ. मिलिंद सांवत (मिरज) यांच्याकडून रुग्णांची तपासणी केली जाते. आठवड्यात १५० हून अधिक रुग्ण आरोग्य सेवेचा लाभ घेतात. तर याच संस्थेकडून शिरोळ, हातकणंगले, कागल, पन्हाळा व करवीर तालुक्यांत आरोग्य सेवकांद्वारे काम सुरू आहे.मार्गदर्शन व विविध सेवारक्तदान शिबिर, सर्वरोग निदान शिबिर, डोळे तपासणी, वृक्षारोपण, सामाजिक प्रबोधन याबरोबरच एच.आय.व्ही. व क्षयरोगांवर मार्गदर्शन केंद्रांतून सेवा दिल्या जातात. गरजूंना मोफत रक्तपुरवठाही केला जातो. मणक्याचे संसर्ग, कॅन्सर, हृदयरोग, मेंदू यांसह विविध आजारांच्या चिपरीतील रुग्णांना मोफत व शासकीय लाभातून सेवा देण्याचे काम ही संस्था करते.माणसांच्या जिवासाठी प्रयत्ननागरिकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे गोरगरीब रुग्णांना चांगले उपचार घेता येत नाहीत. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन माणसांच्या जिवासाठी काहीतरी चांगले करावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहोत. लवकरच दहा बेडचे रुग्णालय सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे. तो सामाजिक कार्यातून लवकरच पूर्ण करणार असल्याचे रणजित आवळे व विजय कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.