शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

चिपरीत नऊ वर्षांपासून मोफत आरोग्य सेवेचा वसा- जीवनदीप आरोग्य सेवा संस्था : रणजित आवळे, विजय कांबळे या दोन तरुणांचा प्रेरणादायी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:28 IST

उदगाव : शिरोळ तालुक्यातील चिपरी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने जयसिंगपूर येथे उपचारासाठी जाणे सर्वसामान्य लोकांना परवडत नाही.

संतोष बामणे ।उदगाव : शिरोळ तालुक्यातील चिपरी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने जयसिंगपूर येथे उपचारासाठी जाणे सर्वसामान्य लोकांना परवडत नाही. त्यामुळे एक पाऊल पुढे येऊन रणजित आवळे व विजय कांबळे या दोन युवकांनी जीवनदीप आरोग्य सेवा संस्थेची स्थापना करून ते गेल्या नऊ वर्षांपासून चिपरीच्या नागरिकांना मोफत आरोग्य सेवा व औषधे देत आहेत. ग्रामीण भागात ही संस्था चिपरीकरांना आधारवड बनली आहे.

सध्या होत असलेल्या आजारांमुळे अनेक रुग्णांना उपचार मिळत नाहीत. आर्थिक अडचणींमुळे रुग्ण दगावतात. याचा अनुभव घेऊन रणजित आवळे व विजय कांबळे यांनी २००८ साली जीवनदीप आरोग्य सेवा संस्थेची स्थापना केली. चिपरी येथील बस थांब्याजवळच मोफत दवाखाना केंद्र आहे. नागरिकांना चांगली व विनामूल्य आरोग्यसेवा मिळावी यासाठी या संस्थेत रुग्णांची ताप, सर्दी, खोकला, पोटदुखी, गुडघेदुखी आजारांची तपासणी करून औषधे दिली जातात. आठवड्यातून सोमवार, बुधवार, शुक्रवार व रविवारी हे चार दिवस दवाखान्याची सोय आहे.

डॉ. सुरेश पाटील (जयसिंगपूर), डॉ. मिलिंद कोलप (डॉ. जे. जे. मगदूम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज), डॉ. मिलिंद सांवत (मिरज) यांच्याकडून रुग्णांची तपासणी केली जाते. आठवड्यात १५० हून अधिक रुग्ण आरोग्य सेवेचा लाभ घेतात. तर याच संस्थेकडून शिरोळ, हातकणंगले, कागल, पन्हाळा व करवीर तालुक्यांत आरोग्य सेवकांद्वारे काम सुरू आहे.मार्गदर्शन व विविध सेवारक्तदान शिबिर, सर्वरोग निदान शिबिर, डोळे तपासणी, वृक्षारोपण, सामाजिक प्रबोधन याबरोबरच एच.आय.व्ही. व क्षयरोगांवर मार्गदर्शन केंद्रांतून सेवा दिल्या जातात. गरजूंना मोफत रक्तपुरवठाही केला जातो. मणक्याचे संसर्ग, कॅन्सर, हृदयरोग, मेंदू यांसह विविध आजारांच्या चिपरीतील रुग्णांना मोफत व शासकीय लाभातून सेवा देण्याचे काम ही संस्था करते.माणसांच्या जिवासाठी प्रयत्ननागरिकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे गोरगरीब रुग्णांना चांगले उपचार घेता येत नाहीत. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन माणसांच्या जिवासाठी काहीतरी चांगले करावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहोत. लवकरच दहा बेडचे रुग्णालय सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे. तो सामाजिक कार्यातून लवकरच पूर्ण करणार असल्याचे रणजित आवळे व विजय कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.