शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

पाण्याच्या बादलीत पडून बालकाचा मृत्यू

By admin | Updated: December 5, 2015 00:43 IST

शिवाजी विद्यापीठातील हृदयद्रावक घटना

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील पाळणाघरात खेळताना पाण्याच्या बादलीत पडून शुक्रवारी दुपारी दीड वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रणजय उत्तम सुर्वे (रा. शिवाजी विद्यापीठ) असे त्याचे नाव आहे. मृत रणजय हा विद्यापीठातील मुख्य लेखापाल उत्तम हणुमंत सुर्वे यांचा मुलगा आहे.याबाबत अधिक माहिती अशी, उत्तम सुर्वे यांचे मूळ गाव दुधोंडी (ता. पलूस, जि. सांगली) आहे. ते कुटुंबासह विद्यापीठातील शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी राहतात. त्यांच्या पत्नी प्राजक्ता या गृहिणी आहेत. त्यांना रणजय, नील व मुलगी राधा ऊर्फ मृणाल अशी तीन जुळी मुले आहेत. नील हा आजोळी आष्टा येथे असतो. रणजय व मृणाल सकाळी घरी खेळत होती. दोन मुले सांभाळणे कठीण असल्याने प्राजक्ता या मुलांना विद्यापीठातील (पान १० वर) ‘डे केअर सेंटर’ या पाळणाघरात ठेवतात. या ठिकाणी नेहमी १२ मुले असतात. त्यांना सांभाळण्यासाठी दोन आया आहेत. दरम्यान, शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास उत्तम सुर्वे हे कार्यालयात गेले. त्यानंतर काही वेळाने प्राजक्ता या रणजय याला पाळणाघरात सोडून घरी आल्या. दुपारी चारच्या सुमारास रणजय हा खेळत असताना पाळणाघरातील पाण्याच्या बादलीत पडला. त्याच्याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने सुमारे अर्धा तास तो पाण्यात पडून होता. आया गार्गी कुडाळकर हिने हा प्रकार पाहिला. त्यानंतर तिने त्याला बादलीतून बाहेर काढून प्राजक्ता यांना फोन करून बोलावून घेतले. त्यांनी निपचित पडलेल्या बाळाला विद्यापीठातील केअर सेंटरमध्ये दाखविले असता तेथील डॉक्टरांनी त्याची प्रकृती अत्यवस्थ असून त्याला खासगी रुग्णालयात नेण्यास सांगितले. तेथून त्याला राजारामपुरीतील खासगी रुग्णालयाते नेल्यावर तिथे त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोटच्या गोळ्याचा मृतदेह पाहून आई-वडिलांना मानसिक धक्काच बसला. दोघांनाही अश्रू अनावर झाले. तेथून मृतदेह सीपीआर रुग्णालयात विच्छेदनासाठी आणला. या ठिकाणी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. (प्रतिनिधी)‘आयां’कडे कसून चौकशी पाळणाघरात जिथे मुले खेळतात, तिथे पाण्याची बादली कोणी भरून ठेवली होती. तिथे दोन आया बालकांचा सांभाळ करतात. रणजय हा खेळत असताना त्या कोठे गेल्या होत्या? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी विद्यापीठ प्रशासन त्या दोन आयांकडे रात्री उशिरापर्यंत करीत होते. पाळणाघराकडे धावपाळणाघरात पाण्याच्या बादलीत पडून बालकाचा मृत्यू झाल्याची वार्ता विद्यापीठ परिसरात समजताच अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी पाळणाघराकडे धाव घेतली. या ठिकाणी १२ मुले असल्याने सर्वांच्याच आई-वडिलांच्या जिवाची घालमेल झाली होती.