शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

बालसाहित्याने दृक्श्राव्य माध्यमात यायला हवे : लवटे, बालसाहित्य परिषद उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 11:19 IST

बालसाहित्याने मुद्रित माध्यमांसह दृक्श्राव्य माध्यमात यायला हवे. जगभर या क्षेत्रात काय चालले आहे, त्याचे भान बालसाहित्यकांना हवे. हे साहित्य ९९ टक्के बालककेंद्रित आणि एका टक्का पालककेंद्रित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी येथे केले.

ठळक मुद्देबालसाहित्याने दृक्श्राव्य माध्यमात यायला हवे : सुनीलकुमार लवटे बालसाहित्य परिषद उत्साहात

कोल्हापूर : बालसाहित्याने मुद्रित माध्यमांसह दृक्श्राव्य माध्यमात यायला हवे. जगभर या क्षेत्रात काय चालले आहे, त्याचे भान बालसाहित्यकांना हवे. हे साहित्य ९९ टक्के बालककेंद्रित आणि एका टक्का पालककेंद्रित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी येथे केले.येथील रवळनाथ हौसिंग क्रेडिट सोसायटीमध्ये आजरा येथील चैतन्य सृजन व सेवा संस्था आणि बालमित्र समूहातर्फे आयोजित बालसाहित्य परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्यांचे बीजभाषण झाले. यावेळी ज्येष्ठ बालसाहित्यिक राजीव तांबे प्रमुख उपस्थित होते.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लवटे म्हणाले, जग, भारत, महाराष्ट्र आणि मराठी भाषा असा फेर घेत बालकांसाठी सर्व काहीचा धांडोळा घेताना जे काही हाती येते, ते खिन्न करणारे आहे. म्हणूनच भविष्यात देश आणि समाजाने बालककेंद्री विकास असे ध्येयधोरण अंगीकारले पाहिजे.

मराठीत बालसाहित्यिकांची पिढी अजून जुन्या लेखनशैलीत अडकली आहे. त्यास लेखकांसह प्रकाशक, पालक, समाज जबाबदार आहे. हे पिढीतील अंतर मिटायलाच पाहिजे. ज्येष्ठ बालसाहित्यिक तांबे म्हणाले, मराठीतील बालसाहित्य इतर भाषांमध्ये पोहोचविण्याची गरज आहे. बालसाहित्य निर्मितीत दिव्यांग, विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा विचार व्हावा. महाराष्ट्र बालसाहित्य परिषदेची स्थापना व्हावी.

या कार्यक्रमात सावित्री जगदाळे लिखित ‘आज्जोपिझ्झा’, किशोर पाठक लिखित ‘टिंबाच्या कविता’ या पुस्तकांचे प्रकाशन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशांत गौतम, गोविंद गोडबोले, बाळ पोतदार, प्रकाश क्षीरसागर, आदींसह महाराष्ट्र, गोव्यातील बालसाहित्यिक, लेखिका, लेखक उपस्थित होते.

‘चैतन्य सृजन’चे अध्यक्ष डॉ. शिवशंकर उपासे यांनी स्वागत केले. ते म्हणाले, बालसाहित्य एका विशिष्ट टप्प्यावर आले आहे. आता आपण नवीन शक्यतांचा विचार करायला हवा. सुभाष विभूते यांनी सूत्रसंचालन केले. सुनील सुतार यांनी आभार मानले. दरम्यान, उद्घाटनानंतरच्या सत्रात खुली चर्चा आणि पुढील कार्याचे नियोजन करण्यात आले.

ज्येष्ठ साहित्यिक लवटे म्हणाले,

  1.  वर्तमानाचा प्रश्न माध्यमांतराचा आहे. त्याचे भान बालसाहित्यात आले पाहिजे.
  2.  आपले बालसाहित्य ई-बुक्स, व्हिडीओ गेम्स, आदींच्या माध्यमातून दृश्यमय व्हायला हवे.
  3.  याचा अर्थ मुुद्रित माध्यमाला पूर्णांशाने छेद देणे नव्हे; पण बालकेंद्रित मुद्रित माध्यमांचा पुनर्विचार करणे हा आहे.

 

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर