शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

लेकरे उदंड झाली - भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:27 IST

केव्हढ्या मोठ्या जुड्या बांधतात नै? कॉलनीत सगळ्या वहिन्यांची अश्शी फोनाफोनी होत होती. प्रॉब्लेम असा होता. की सगळ्यांच्या घरकामाला बाया ...

केव्हढ्या मोठ्या जुड्या बांधतात नै? कॉलनीत सगळ्या वहिन्यांची अश्शी फोनाफोनी होत होती. प्रॉब्लेम असा होता. की सगळ्यांच्या घरकामाला बाया होत्या. पण त्या शिळं अजिबात खायच्या नाहीत. फ्रीज मधलं त्याना चालायचं नाही. टीव्हीवरचं ऐकून, बघून त्यांचं लोकशिक्षण झालं होतं. लोकांनी दिलेलं स्वच्छ असेलच असं नाही, स्वतःच्या हातानी केलेलं ,आपल्या डोळ्यासमोर रांधलेलंच खायचं. वहिन्या आपल्या कामवाल्या बायांना प्रेमाने सांगायच्या, "आम्ही जे खातो तेच तुला देतो. फ्रीजमध्ये ठेवलेलं आम्ही घरातली सगळी खातोच की.ते चांगलंच असतं पण जास्त झालं तर खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवावं लागतं ग. नीट समजून घे.’.सुलभाताईंच्या बाईने तर कमालच केली. होळीला त्यांनी दरवर्षीप्रमाणे पुरणपोळ्या केल्या . दोन पोळ्या, कटाची आमटी, मसालेभात, सांडगे पापड असं ताट वाढलं नि त्या बाईला म्हणाल्या, ‘सोनाबाई, इथे जेवता की घरी नेता?’तर सोनाबाई म्हणाल्या,‘आव वैनी, मीबी आज शेम अस्साच समदा सैपाक केलाया. किलोचं पुरण घातलंय.’

‘निम्म्या अर्ध्या पोळ्या करून आले उरलेल्या जाऊन करणार. ताट ठेवा. ह्ये आनि कवा न्हेऊ?’ सुलभाताईनी हसण्यावारी न्हेल.‘.बरं, उद्या तुझ्या कडचं ताट वाढून मला आण. मला तेव्हढाच रुचिपालट.’

सरलाभाभीनी आज ठरवलच, कॉलनीतल्या सगळ्या स्त्रियांची ही समस्या पुरुषांपर्यत पोचवायचीच. कॉलनीतल्या बायकांमध्ये बराच एकोपा होता पण पुरुषांमध्ये तितका नव्हता. तिथे प्रत्येकजण आपला ईगो महत्त्वाचा मानत होता. त्यांच्या पोस्टची लेवल म्हणजे दर्जा त्यांना महत्त्वाचा वाटत होता. सरलाभाभींचे मिस्टर असि. प्रोफेसर ह्या लेवलचे होते. ते सिव्हिल इंजिनिअर होते. त्यांनी आपल्या डिपार्टमेंटच्या काही मंडळीना कॉल करून बोलावलं. सगळ्यांना वाटलं, बांधकामाच्या एखाद्या प्रोजेक्टसाठी जमायचं असावं. प्रत्यक्षात समस्या गृहिणींची निघाली. ‘त्यांनी विषय मांडला. हल्ली मोलकरणी शिळंपाकं नेत नाहीत, खात नाहीत, रस्त्यावर पूर्वीसारखे अन्नाला मोताद असे भिकारी दिसत नाहीत, तर त्या उरलेल्या अन्नाचं काय करायचं? फ्रीजमधलं स्वतः खाऊन सगळ्यांची वजनं वाढताहेत. तर ह्याला उपाय सुचवा. ‘अहो, रस्त्यावर भिकारी नाहीत, पण भटकी कुत्री तर आहेत, त्यांना घाला म्हणावं.’ हा उपाय सुचवून मि.इनामदार उठले. सरलाभाभीनी आपल्या काही मैत्रिणींना सभेला बोलावलं होतंच. त्यातल्या शीलाताई उठल्याच .म्हणाल्या, ‘अहो, आपण मागच्या सोमवारीच नगरपालिकेकडे तक्रार अर्ज केलाय. भटक्या कुत्र्यांना पकडून न्या म्हणून. आणि आम्हीच त्यांना खायला घातलं तर पलिकडच्या गल्लीतून आणखी येतील.’

‘इनामदार, बसा, समस्येवर विचार करुया. अजून संपलं नाही.’

‘मला वाटतयं. उरलेलं अन्न सरळ झाडांना घातलं तर? ती बिचारी नको म्हणणार नाहीत. खत दिल्यासारखंच की.’

‘आमच्या कुंड्यांमध्ये घालत होते बाई. मुंग्या येतात. खत कुठलं? विष होतंय. बाल्कनीत कावळे पण येतात.’

‘आपल्या कुंड्यात नका घालू, बंगलेवाल्यांच्या बागेत मोठी झाडं आहेत .त्यांच्या मुळात घालून यायचं,हळुच.’

‘हूँम् .माळी असतोय तिथे हजर. गेल्यावर्षी मी आमच्या मोलकरणीला ते काम दिलं होतं,पैसे देऊन. तर प्राचार्यांच्या मिसेस किती खवळल्या. असं अन्न घालून म्हणे त्यांच्या कलमी आंब्याला वाळवी लागली. किती औषधं करावी लागली. पार रत्नागिरीहून माणूस आणला होता झाडावर उपचार करण्यासाठी.’

‘गांडूळ खत करू शकतो आपण. ती सगळं खातात म्हणे.’ मि. आराणकेनी अगदी निर्वाणीसारखं सांगितलं.

‘ती आणि उसाभर कोणी करायची? आपल्या चार कुंड्या. तयार गांडुळखत आणलं की आपलं भागतं.’

‘आता अगदी मूलभूत उपाय मी सांगतलय् ’. मालवणच्या वाडेकरांना मधूनच मालवणी बोलायची सुरसुरी यायची.‘हं सांगा.’ सगळी म्हणाली. वाडेकरनी मूळ मुद्यालाच हात घातला. ते म्हणाले, ‘त्या-अमुक एका कार्डधारकांना ----थोडं थोडकं नाही, पंधरा-वीस किलो तांदूळ, पाच किलो डाळ, पाच किलो हरभरे,एव्हढं धान्य, नि ते सुद्धा मोफत मिळतं. हे द्यायला कोणी सुरुवात केली? अर्थात मोदींनी. त्यांना पत्र पाठवूया.‘तुमच्या ह्या योजनेमुळे लोकांना अन्नाची किंमत वाटेनाशी झाली आहे, कितीतरी दुकानदार वरकामाला माणसं मिळत नाहीत म्हणून टेकीला आलेत. लोकं इतकी आळशी झालीयत् कामाला बोलावलं तर येत नाहीत. बसून खायला मिळतंय. कोण कशाला काम करील! ह्याही पुढची एक आश्चर्यकारक गोष्ट ऐका. असं धान्य मिळणाऱ्या काही बायका ते फुकट मिळणारे तांदूळ घरात भातासाठी वापरत नाहीत. डाळी, हरभरे आमटी, उसळीसाठी खर्च करीत नाहीत.