शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

चिकोत्रा धरणाला हवी पुनर्भरणाची मात्रा

By admin | Updated: May 5, 2017 23:53 IST

दीड टीएमसी पाणीसाठा वाढविणे शक्य : वाया जाणाऱ्या पाण्याचा सदुपयोग होऊन धरण पूर्ण भरण्याची शक्यता

दत्तात्रय पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : कागल, आजरा व भुदरगड मधील काही गावांना वरदाई ठरलेल्या चिकोत्रा धरणातील पाणीसाठा बेभरवशाचा असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात येथील ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र आणि येथील पावसाचे अत्यल्प प्रमाण लक्षात घेता हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अन्य पर्यायाचीच गरज आहे. यामध्ये म्हातारीच्या पठारावरील पाणी या धरणाकडे वळविण्याबरोबरच पुनर्भरण प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. धरणाच्या खालील भागातून ऐन पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी आणि चिकोत्रा नदीला पश्चिमेकडून नागणवाडी प्रकल्पापासून आलेला ओढा मिळतो. त्या हसूर खुर्द बंधाऱ्यावर हा पुनर्भरणाचा प्रकल्प राबवून चिकोत्रा धरण दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरणे शक्य आहे. १९९६ मध्ये चिकोत्रा खोऱ्यातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची गरज ओळखून पाटबंधारे विभागाने १.५ टी.एम.सी. इतका पाणीसाठी होईल या दृष्टीने चिकोत्रा नदीवर (झुलपेवाडी जवळ) हे धरण बांधले. परंतु, हे धरण आजपर्यंत केवळ तीन वेळाच पूर्ण क्षमतेने भरले. त्या-त्या वर्षी या भागात पाण्याचा सुकाळ झाला. या लाभ क्षेत्रातील १३ हजार एकर पिकावू जमिनीपैकी तब्बल १० हजार क्षेत्रावर उसासारखी बारमाई पिके घेण्यात आली. परंतु, गेल्या चार वर्षांपासून या धरणात अल्प पाणीसाठा झाला. गतवर्षी तर अगदी नीचांकी ४६ टक्के पाणीसाठा झाल्याने या भागातील पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागली. चिकोत्रा नदीवर खडकेवाडा- बेळुंकीपर्यंत २९ कोल्हापुरी बंधारे बांधून त्यामध्ये पाणी साठविले जाते. परंतु, ही नदी उथळ असल्यामुळे पाणी सोडणे बंद करताच २० ते २२ तासांत हे बंधारे रिकामे पडतात. त्यामुळे धरणातून वारंवार पाणी सोडावे लागते. परिणामी हे धरण पूर्ण क्षमतेने भरणे हाच एकमेव पर्याय आहे. गत पावसाळ्यामध्ये म्हातारीच्या पठारावरील वाया जाणारे पाणी या धरणात वळविण्यात पाटबंधारे विभागाला यश मिळाले. मात्र, यामुळे पाणीसाठ्यात १० ते १२ टक्के इतकीच अल्पशी वाढ झाली. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही कमी-अधिक प्रमाणात पाण्याची टंचाई भासत आहे. पाटबंधारे विभाग व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयामुळे आॅक्टोबर-एप्रिल अखेर पाण्याचे नियोजन करून लोकांना पिण्यासह थोड्याफार शेतासीठीही पाणी उपलब्ध करून दिले. यासाठी प्रसंगी जीव धोक्यात घालून या दोन्ही विभागाचे अधिकारी रात्री-अपरात्री गस्त घालून नदीतील पाण्याची राखण करताना दिसत होते, तर उपसाबंदी काळात अवैधपणे पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई केली. दरम्यान, केवळ दीड टी.एम.सी. क्षमता असणारे प्रत्येक वर्षी भरले तर कागलसह आजरा व भुदरगडमधील काही गावांतील १३ ते १५ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निकालात निघणार आहे. यासाठी शासनाच्या पुढाकारासह तिन्ही तालुक्यांतील लोकप्रतिनिधींची प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. शेतीसाठी शेवटचेच पाणी...चिकोत्रा धरणात सध्या, २१ टक्केच म्हणजेच २५० दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा शिल्लक आहे, तर धरणातून ५ ते १४ मे दरम्यान पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी शेवटच्या बेळुंकी बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी १०० दशलक्ष घनफूट इतके पाणी लागणार आहे. त्यामुळे भविष्यात पाऊस पडेपर्यंत उर्वरित पाणी शिल्लक ठेवले जाणार असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात बंधाऱ्याचे सर्व बरगे काढून शेतीसाठी उपसाबंदी करून केवळ पिण्यासाठीच पाणी सोडले जाणार आहे. त्यामळे या काळात वळीव पावसाच्या हजेरीवरच ऊस पिकांचे भवितव्य अवलंबून आहे. असे करता येईल पुनर्भरण१ हसूर बंधाऱ्याजवळ चिकोत्रा नदीला पश्चिम भागातून मोठा ओढा मिळाला आहे. जुलै व आॅगस्ट महिन्यांत येथे मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होते. २ मात्र, हे पाणी वाहूनच जाते. त्यामुळे ७ ते८ कि.मी. अंतर हसूर येथून पाणी योजना करून हे पाणी चिकोत्रा धरणात टाकले तर हे धरण प्रतिवर्षी पूर्ण क्षमतेने भरू शकते, असा तज्ज्ञांचा दावा आहे. ३ मात्र, ही बाब खर्चिक असून, याचे शासन- स्तरावरच धोरण राबविणे गरजेचे आहे. तर हजारो कुटुंबांचे नंदनवन...पुनर्भरणाचा प्रकल्प राबवून चिकोत्रातील पाणीसाठा वाढविला तर ३४ ते ४० गावांतील जनजीवन उंचावणार आहे. या भागात शेताची उत्पादकता वाढणार असून, दुग्ध व्यवसायालाही बरकत येणार आहे. त्यामुळे एक-दोन रस्ते करण्याचे मागे-पुढे झाले तरी चालेल; परंतु, हजारो कुटुंबांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणणाऱ्या अशा प्रकल्पाला अग्रकम देणे गरजेचे असल्याचेही अनेक जाणकारांनी याबाबत ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.