शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनाही अजून हवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:58 IST

विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लघु दाब, उच्च दाब वितरणप्रणाली व त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनांचा ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लघु दाब, उच्च दाब वितरणप्रणाली व त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनांचा धडाका महावितरणने लावला खरा, परंतु या योजनेतून प्रत्यक्षात कनेक्शन मिळताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. सौरकृषी पंप योजनेतून नुसते अर्ज भरून घेण्यात आले असून, अजून एकही कनेक्शन या योजनेतून सुरूझाले नसल्याचे कोल्हापूर - सांगली जिल्ह्यातील चित्र आहे.कोल्हापूर जिल्ह्यात नदीत पाणी आहे; परंतु ते कृषिपंप नसल्याने पिकाला देता येत नसल्याचे चित्र आहे. ३१ मार्च २०१८ अखेर कोल्हापूर जिल्ह्यात ८४४२, तर सांगली जिल्ह्यात १६४१७ शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत. हे पैसे २०१४ पासून भरले आहेत; परंतु शेतकºयांना कनेक्शन मिळालेले नाही. शेतकºयांनी पैसे भरूनही त्यांना वीज कनेक्शन देता येत नाही म्हणून महावितरण कंपनीने गाजावाजा करून उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) तातडीने कनेक्शन देणार, असे जाहीर केले.मार्च २०१८ चा बेस धरून ज्या शेतकºयांनी पैसे भरले आहेत, परंतु त्यांना कनेक्शन देता आलेले नाही, अशांना जुन्याच पारंपरिक योजनेतून म्हणजे लघुदाब वाहिनींवरून कनेक्शन देण्यात आलीत.कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात जे पैसे भरून प्रतीक्षा यादीत शेतकरी होते, त्यांच्यासाठी उच्चदाब वाहिनीतून तातडीने कनेक्शन देणार, असे जाहीर केले; त्यासाठी १०,१६ आणि २५ केव्हीए क्षमतेचे व्यक्तिगत डीपी बसवून देण्यात येणार होते; परंतु त्यासाठी नवीन रोहित्रे उपलब्ध झाली नाहीत आणि खासगी निविदेला मार्जिन कमी असल्याच्या कारणावरून ठेकेदारांनी सुरुवातीला प्रतिसाद दिला नाही; त्यामुळे या दोन जिल्ह्यात जे २४८५९ प्रलंबित कनेक्शन्स होती, त्यातील उच्चदाब प्रणालीतून फक्त ३१६ कनेक्शन्स देण्यात आली आहेत.विधिमंडळातील आश्वासनालाही हरताळपश्चिम महाराष्ट्रातील पेड पेंडिंग वीज कनेक्शन्सचा विषय आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके यांनी विधिमंडळात उपस्थित केला होता. त्यावेळी सरकारने ही कनेक्शन्स मार्च २०१९ पर्यंत देण्याचे आश्वासन सभागृहात दिले होते; परंतु प्रत्यक्षात त्या आश्वासनालाही हरताळ फासला गेला आहे.पैसे भरून कनेक्शन न मिळालेली शेतकरी(१५ एप्रिल २०१९ अखेर)कोल्हापूर : ५०६०सांगली : १०७२५उच्चदाब प्रणालीतील कनेक्शन्सकोल्हापूर : १२९सांगली : १८७दोन्ही जिल्ह्यातील प्रोसेसमध्ये असलेली प्रकरणे : ६००कोल्हापूर सांगलीअर्ज प्राप्त २३४८ १२६१अर्ज बाद १४१४ ७८३कोटेशन दिले ३५० १०५कोटेशन भरून घेतले २०५ ७२वर्क आॅर्डर : १९२ ७०प्रत्यक्षात कनेक्शन : एकही नाहीयुती सरकारमधील मंत्र्यांच्या मनांत पश्चिम महाराष्ट्राबद्दल आकस असल्यानेच या भागातील शेतकºयांच्या वीज कनेक्शन्सबद्दल सरकार काहीच करायला तयार नसल्याचा अनुभव आम्ही चार वर्षे घेत आहोत. शेतकºयांचे शिष्टमंडळ घेऊन दोन दिवसांत मुख्य अभियंत्यांना जाब विचारणार आहोत.- विक्रांत पाटील- किणीकर, कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशन