शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनाही अजून हवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:58 IST

विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लघु दाब, उच्च दाब वितरणप्रणाली व त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनांचा ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लघु दाब, उच्च दाब वितरणप्रणाली व त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनांचा धडाका महावितरणने लावला खरा, परंतु या योजनेतून प्रत्यक्षात कनेक्शन मिळताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. सौरकृषी पंप योजनेतून नुसते अर्ज भरून घेण्यात आले असून, अजून एकही कनेक्शन या योजनेतून सुरूझाले नसल्याचे कोल्हापूर - सांगली जिल्ह्यातील चित्र आहे.कोल्हापूर जिल्ह्यात नदीत पाणी आहे; परंतु ते कृषिपंप नसल्याने पिकाला देता येत नसल्याचे चित्र आहे. ३१ मार्च २०१८ अखेर कोल्हापूर जिल्ह्यात ८४४२, तर सांगली जिल्ह्यात १६४१७ शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत. हे पैसे २०१४ पासून भरले आहेत; परंतु शेतकºयांना कनेक्शन मिळालेले नाही. शेतकºयांनी पैसे भरूनही त्यांना वीज कनेक्शन देता येत नाही म्हणून महावितरण कंपनीने गाजावाजा करून उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) तातडीने कनेक्शन देणार, असे जाहीर केले.मार्च २०१८ चा बेस धरून ज्या शेतकºयांनी पैसे भरले आहेत, परंतु त्यांना कनेक्शन देता आलेले नाही, अशांना जुन्याच पारंपरिक योजनेतून म्हणजे लघुदाब वाहिनींवरून कनेक्शन देण्यात आलीत.कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात जे पैसे भरून प्रतीक्षा यादीत शेतकरी होते, त्यांच्यासाठी उच्चदाब वाहिनीतून तातडीने कनेक्शन देणार, असे जाहीर केले; त्यासाठी १०,१६ आणि २५ केव्हीए क्षमतेचे व्यक्तिगत डीपी बसवून देण्यात येणार होते; परंतु त्यासाठी नवीन रोहित्रे उपलब्ध झाली नाहीत आणि खासगी निविदेला मार्जिन कमी असल्याच्या कारणावरून ठेकेदारांनी सुरुवातीला प्रतिसाद दिला नाही; त्यामुळे या दोन जिल्ह्यात जे २४८५९ प्रलंबित कनेक्शन्स होती, त्यातील उच्चदाब प्रणालीतून फक्त ३१६ कनेक्शन्स देण्यात आली आहेत.विधिमंडळातील आश्वासनालाही हरताळपश्चिम महाराष्ट्रातील पेड पेंडिंग वीज कनेक्शन्सचा विषय आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके यांनी विधिमंडळात उपस्थित केला होता. त्यावेळी सरकारने ही कनेक्शन्स मार्च २०१९ पर्यंत देण्याचे आश्वासन सभागृहात दिले होते; परंतु प्रत्यक्षात त्या आश्वासनालाही हरताळ फासला गेला आहे.पैसे भरून कनेक्शन न मिळालेली शेतकरी(१५ एप्रिल २०१९ अखेर)कोल्हापूर : ५०६०सांगली : १०७२५उच्चदाब प्रणालीतील कनेक्शन्सकोल्हापूर : १२९सांगली : १८७दोन्ही जिल्ह्यातील प्रोसेसमध्ये असलेली प्रकरणे : ६००कोल्हापूर सांगलीअर्ज प्राप्त २३४८ १२६१अर्ज बाद १४१४ ७८३कोटेशन दिले ३५० १०५कोटेशन भरून घेतले २०५ ७२वर्क आॅर्डर : १९२ ७०प्रत्यक्षात कनेक्शन : एकही नाहीयुती सरकारमधील मंत्र्यांच्या मनांत पश्चिम महाराष्ट्राबद्दल आकस असल्यानेच या भागातील शेतकºयांच्या वीज कनेक्शन्सबद्दल सरकार काहीच करायला तयार नसल्याचा अनुभव आम्ही चार वर्षे घेत आहोत. शेतकºयांचे शिष्टमंडळ घेऊन दोन दिवसांत मुख्य अभियंत्यांना जाब विचारणार आहोत.- विक्रांत पाटील- किणीकर, कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशन