शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री हे थापाडे, बोलघेवडे

By admin | Updated: October 29, 2015 00:47 IST

नारायण राणे यांची सडकून टीका : भाजपकडून जनतेची घोर फसवणूक

कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थापाडे, बोलघेवडे, बालीश व बेजबाबदार वक्तव्य करणारे असून, त्यांनी वर्षभरात राज्याच्या विकासासाठी काहीही केलेले नाही. फक्त जाहिरातबाजी, पत्रकबाजी करून जनतेला फसविले आहे, अशी प्रखर टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी येथे केली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे कोल्हापुरात आले होते. शिवाजी विद्यापीठ मार्गावर माऊली पुतळ्यानजीक आयोजित सभेत ते बोलत होते. त्यांनी केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेताना गेले वर्षभर तरी ‘अच्छे दिन’ दिसले नसल्याचे कोल्हापूरकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारण्याची आवश्यकता होती, असे मत त्यांनी व्यक्त केले.राणे म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात यशवंतराव चव्हाणांपासून पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी कधीही बेजबाबदारपणाची वक्तव्ये केली नव्हती; पण फडणवीस यांनी काल (मंगळवारी) झालेल्या प्रचारात वैचारिक पातळीच शिल्लक ठेवली नाही, संयुक्त महाराष्ट्राच्या ५० वर्षांच्या सत्तेत आलेल्या राज्यकर्त्यांना फडणवीस यांनी बेईमान म्हणणे हे मुख्यमंत्र्यांना शोभा देणारे नाही. त्यांची सत्ता येऊन वर्ष झाले तरीही जनतेला काही ‘अच्छे दिन’ दिसले नाहीत. केंद्रातून राज्याच्या विकासासाठी निधी आणतो म्हणून जनतेला हे फडणवीस फसवत आहेत. त्यांनी कोल्हापूरच्या पदरी नेहमीच निराशा टाकली आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपने तयार केलेल्या जाहीरनाम्यात शाहू, शिवाजी महाराजांचा त्यांना विसर पडला आहे. जाहीरनाम्यात ‘सब कुछ मोदी’ असे फोटोवरून दिसते. हा फसविण्याचा धंदा लोकसभा-विधानसभेसाठी पचला पण महापालिका निवडणुकीत शाहूंच्या नगरीत आता पचणार नाही, अशीही टीकाही त्यांनी केली. कोल्हापूरला ‘स्मार्ट सिटी’ देऊ, असे सांगणारे मुख्यमंत्री त्यासाठी पैसे कसे व कुठून देणार याबाबत मात्र मौन पाळत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेवरही तसेच कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवरही टीकेची झोड उठविले. माजी मंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरला विकासगंगा काँग्रेस सरकारने आणल्याचे सांगितले तर यावेळी डॉ. पतंगराव कदम यांनीही काँग्रेसच्या विचारधारेने गेल्यास विकास दूर नसल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, सत्यजित देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.फडणवीसांचे पानसरेंंबाबत मौन का?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात आले असताना ते ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या घरी का गेले नाहीत? की त्याबद्दल त्यांनी एकही ‘शब्द’ काढलेला नाही. त्यांनी या प्रकरणाची जात-पात-धर्म न पाहता नि:पक्षपातीपणे चौकशी करणे गरजेचे आहे, असेही राणे म्हणाले.तीर्थक्षेत्र विकासात ‘अंबाबाई’चे नाव का नाही?केंद्राने महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी देण्याची घोषणा केली; पण त्यामध्ये अंबाबाईचे का नाव नाही. अमरावती, विदर्भातील तीर्थक्षेत्रांची नावे कशी मुख्यमंत्र्यांनी घुसडली. त्यामळे अशा दुतोंडी मुख्यमंत्र्यांचे फक्त बोलघेवडे प्रेम कोल्हापूरवर असल्याचे राणे म्हणाले.