शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

मुख्यमंत्री हे थापाडे, बोलघेवडे

By admin | Updated: October 29, 2015 00:47 IST

नारायण राणे यांची सडकून टीका : भाजपकडून जनतेची घोर फसवणूक

कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थापाडे, बोलघेवडे, बालीश व बेजबाबदार वक्तव्य करणारे असून, त्यांनी वर्षभरात राज्याच्या विकासासाठी काहीही केलेले नाही. फक्त जाहिरातबाजी, पत्रकबाजी करून जनतेला फसविले आहे, अशी प्रखर टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी येथे केली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे कोल्हापुरात आले होते. शिवाजी विद्यापीठ मार्गावर माऊली पुतळ्यानजीक आयोजित सभेत ते बोलत होते. त्यांनी केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेताना गेले वर्षभर तरी ‘अच्छे दिन’ दिसले नसल्याचे कोल्हापूरकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारण्याची आवश्यकता होती, असे मत त्यांनी व्यक्त केले.राणे म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात यशवंतराव चव्हाणांपासून पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी कधीही बेजबाबदारपणाची वक्तव्ये केली नव्हती; पण फडणवीस यांनी काल (मंगळवारी) झालेल्या प्रचारात वैचारिक पातळीच शिल्लक ठेवली नाही, संयुक्त महाराष्ट्राच्या ५० वर्षांच्या सत्तेत आलेल्या राज्यकर्त्यांना फडणवीस यांनी बेईमान म्हणणे हे मुख्यमंत्र्यांना शोभा देणारे नाही. त्यांची सत्ता येऊन वर्ष झाले तरीही जनतेला काही ‘अच्छे दिन’ दिसले नाहीत. केंद्रातून राज्याच्या विकासासाठी निधी आणतो म्हणून जनतेला हे फडणवीस फसवत आहेत. त्यांनी कोल्हापूरच्या पदरी नेहमीच निराशा टाकली आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपने तयार केलेल्या जाहीरनाम्यात शाहू, शिवाजी महाराजांचा त्यांना विसर पडला आहे. जाहीरनाम्यात ‘सब कुछ मोदी’ असे फोटोवरून दिसते. हा फसविण्याचा धंदा लोकसभा-विधानसभेसाठी पचला पण महापालिका निवडणुकीत शाहूंच्या नगरीत आता पचणार नाही, अशीही टीकाही त्यांनी केली. कोल्हापूरला ‘स्मार्ट सिटी’ देऊ, असे सांगणारे मुख्यमंत्री त्यासाठी पैसे कसे व कुठून देणार याबाबत मात्र मौन पाळत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेवरही तसेच कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवरही टीकेची झोड उठविले. माजी मंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरला विकासगंगा काँग्रेस सरकारने आणल्याचे सांगितले तर यावेळी डॉ. पतंगराव कदम यांनीही काँग्रेसच्या विचारधारेने गेल्यास विकास दूर नसल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, सत्यजित देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.फडणवीसांचे पानसरेंंबाबत मौन का?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात आले असताना ते ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या घरी का गेले नाहीत? की त्याबद्दल त्यांनी एकही ‘शब्द’ काढलेला नाही. त्यांनी या प्रकरणाची जात-पात-धर्म न पाहता नि:पक्षपातीपणे चौकशी करणे गरजेचे आहे, असेही राणे म्हणाले.तीर्थक्षेत्र विकासात ‘अंबाबाई’चे नाव का नाही?केंद्राने महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी देण्याची घोषणा केली; पण त्यामध्ये अंबाबाईचे का नाव नाही. अमरावती, विदर्भातील तीर्थक्षेत्रांची नावे कशी मुख्यमंत्र्यांनी घुसडली. त्यामळे अशा दुतोंडी मुख्यमंत्र्यांचे फक्त बोलघेवडे प्रेम कोल्हापूरवर असल्याचे राणे म्हणाले.