शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री हे थापाडे, बोलघेवडे

By admin | Updated: October 29, 2015 00:47 IST

नारायण राणे यांची सडकून टीका : भाजपकडून जनतेची घोर फसवणूक

कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थापाडे, बोलघेवडे, बालीश व बेजबाबदार वक्तव्य करणारे असून, त्यांनी वर्षभरात राज्याच्या विकासासाठी काहीही केलेले नाही. फक्त जाहिरातबाजी, पत्रकबाजी करून जनतेला फसविले आहे, अशी प्रखर टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी येथे केली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे कोल्हापुरात आले होते. शिवाजी विद्यापीठ मार्गावर माऊली पुतळ्यानजीक आयोजित सभेत ते बोलत होते. त्यांनी केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेताना गेले वर्षभर तरी ‘अच्छे दिन’ दिसले नसल्याचे कोल्हापूरकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारण्याची आवश्यकता होती, असे मत त्यांनी व्यक्त केले.राणे म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात यशवंतराव चव्हाणांपासून पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी कधीही बेजबाबदारपणाची वक्तव्ये केली नव्हती; पण फडणवीस यांनी काल (मंगळवारी) झालेल्या प्रचारात वैचारिक पातळीच शिल्लक ठेवली नाही, संयुक्त महाराष्ट्राच्या ५० वर्षांच्या सत्तेत आलेल्या राज्यकर्त्यांना फडणवीस यांनी बेईमान म्हणणे हे मुख्यमंत्र्यांना शोभा देणारे नाही. त्यांची सत्ता येऊन वर्ष झाले तरीही जनतेला काही ‘अच्छे दिन’ दिसले नाहीत. केंद्रातून राज्याच्या विकासासाठी निधी आणतो म्हणून जनतेला हे फडणवीस फसवत आहेत. त्यांनी कोल्हापूरच्या पदरी नेहमीच निराशा टाकली आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपने तयार केलेल्या जाहीरनाम्यात शाहू, शिवाजी महाराजांचा त्यांना विसर पडला आहे. जाहीरनाम्यात ‘सब कुछ मोदी’ असे फोटोवरून दिसते. हा फसविण्याचा धंदा लोकसभा-विधानसभेसाठी पचला पण महापालिका निवडणुकीत शाहूंच्या नगरीत आता पचणार नाही, अशीही टीकाही त्यांनी केली. कोल्हापूरला ‘स्मार्ट सिटी’ देऊ, असे सांगणारे मुख्यमंत्री त्यासाठी पैसे कसे व कुठून देणार याबाबत मात्र मौन पाळत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेवरही तसेच कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवरही टीकेची झोड उठविले. माजी मंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरला विकासगंगा काँग्रेस सरकारने आणल्याचे सांगितले तर यावेळी डॉ. पतंगराव कदम यांनीही काँग्रेसच्या विचारधारेने गेल्यास विकास दूर नसल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, सत्यजित देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.फडणवीसांचे पानसरेंंबाबत मौन का?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात आले असताना ते ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या घरी का गेले नाहीत? की त्याबद्दल त्यांनी एकही ‘शब्द’ काढलेला नाही. त्यांनी या प्रकरणाची जात-पात-धर्म न पाहता नि:पक्षपातीपणे चौकशी करणे गरजेचे आहे, असेही राणे म्हणाले.तीर्थक्षेत्र विकासात ‘अंबाबाई’चे नाव का नाही?केंद्राने महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी देण्याची घोषणा केली; पण त्यामध्ये अंबाबाईचे का नाव नाही. अमरावती, विदर्भातील तीर्थक्षेत्रांची नावे कशी मुख्यमंत्र्यांनी घुसडली. त्यामळे अशा दुतोंडी मुख्यमंत्र्यांचे फक्त बोलघेवडे प्रेम कोल्हापूरवर असल्याचे राणे म्हणाले.