शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
5
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
7
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
8
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
9
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
10
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
11
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
12
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
13
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
14
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
15
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
16
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
17
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
18
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
19
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
20
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा

मुख्यमंत्री हे थापाडे, बोलघेवडे

By admin | Updated: October 29, 2015 00:47 IST

नारायण राणे यांची सडकून टीका : भाजपकडून जनतेची घोर फसवणूक

कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थापाडे, बोलघेवडे, बालीश व बेजबाबदार वक्तव्य करणारे असून, त्यांनी वर्षभरात राज्याच्या विकासासाठी काहीही केलेले नाही. फक्त जाहिरातबाजी, पत्रकबाजी करून जनतेला फसविले आहे, अशी प्रखर टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी येथे केली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे कोल्हापुरात आले होते. शिवाजी विद्यापीठ मार्गावर माऊली पुतळ्यानजीक आयोजित सभेत ते बोलत होते. त्यांनी केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेताना गेले वर्षभर तरी ‘अच्छे दिन’ दिसले नसल्याचे कोल्हापूरकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारण्याची आवश्यकता होती, असे मत त्यांनी व्यक्त केले.राणे म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात यशवंतराव चव्हाणांपासून पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी कधीही बेजबाबदारपणाची वक्तव्ये केली नव्हती; पण फडणवीस यांनी काल (मंगळवारी) झालेल्या प्रचारात वैचारिक पातळीच शिल्लक ठेवली नाही, संयुक्त महाराष्ट्राच्या ५० वर्षांच्या सत्तेत आलेल्या राज्यकर्त्यांना फडणवीस यांनी बेईमान म्हणणे हे मुख्यमंत्र्यांना शोभा देणारे नाही. त्यांची सत्ता येऊन वर्ष झाले तरीही जनतेला काही ‘अच्छे दिन’ दिसले नाहीत. केंद्रातून राज्याच्या विकासासाठी निधी आणतो म्हणून जनतेला हे फडणवीस फसवत आहेत. त्यांनी कोल्हापूरच्या पदरी नेहमीच निराशा टाकली आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपने तयार केलेल्या जाहीरनाम्यात शाहू, शिवाजी महाराजांचा त्यांना विसर पडला आहे. जाहीरनाम्यात ‘सब कुछ मोदी’ असे फोटोवरून दिसते. हा फसविण्याचा धंदा लोकसभा-विधानसभेसाठी पचला पण महापालिका निवडणुकीत शाहूंच्या नगरीत आता पचणार नाही, अशीही टीकाही त्यांनी केली. कोल्हापूरला ‘स्मार्ट सिटी’ देऊ, असे सांगणारे मुख्यमंत्री त्यासाठी पैसे कसे व कुठून देणार याबाबत मात्र मौन पाळत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेवरही तसेच कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवरही टीकेची झोड उठविले. माजी मंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरला विकासगंगा काँग्रेस सरकारने आणल्याचे सांगितले तर यावेळी डॉ. पतंगराव कदम यांनीही काँग्रेसच्या विचारधारेने गेल्यास विकास दूर नसल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, सत्यजित देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.फडणवीसांचे पानसरेंंबाबत मौन का?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात आले असताना ते ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या घरी का गेले नाहीत? की त्याबद्दल त्यांनी एकही ‘शब्द’ काढलेला नाही. त्यांनी या प्रकरणाची जात-पात-धर्म न पाहता नि:पक्षपातीपणे चौकशी करणे गरजेचे आहे, असेही राणे म्हणाले.तीर्थक्षेत्र विकासात ‘अंबाबाई’चे नाव का नाही?केंद्राने महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी देण्याची घोषणा केली; पण त्यामध्ये अंबाबाईचे का नाव नाही. अमरावती, विदर्भातील तीर्थक्षेत्रांची नावे कशी मुख्यमंत्र्यांनी घुसडली. त्यामळे अशा दुतोंडी मुख्यमंत्र्यांचे फक्त बोलघेवडे प्रेम कोल्हापूरवर असल्याचे राणे म्हणाले.