शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर लोकसभेच्या रिंगणातून चेतन नरके यांची माघार, कोणाला पाठिंबा देणार.?

By राजाराम लोंढे | Updated: April 17, 2024 15:15 IST

‘कोल्हापूरचे व्हिजन घेऊन काम करणार

कोल्हापूर : देशातील प्रगत जिल्ह्यात माझं कोल्हापूर खूप मागे राहिल्याची खंत मनात होती. अडीच-तीन वर्षे कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचे एक स्वप्न घेऊन कार्यरत राहिलो. निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांसह जनतेचा खूप आग्रह होता, पण लोकसभेची निवडणूक आहे, येथे राजकीय पक्षाची ताकद निर्णायक ठरत असते, त्यामुळे निवडणूकीत थांबण्याचा निर्णय घेतल्याची माहीती ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. नरके म्हणाले, गेली अडीच वर्षे बाराशेहून अधिक गावे पिंजून काढत जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही वाड्यावस्त्या विकासापासून खूप लांब आहेत. हे जरी खरे असले तरी नियोजनबध्द विकास केला तर कोल्हापूरचा चेहरामोहरा बदलू शकतो, या आत्मविश्वासाने काम करत गेलो. महाविकास आघाडीकडून उमेदवारी बऱ्यापैकी निश्चित झाल्याने वेगाने प्रचाराला लागलो होतो. पण, राजकारणात  काहीही होऊ शकते. उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते अस्वस्थत झाले. थांबायचे नाही, लढायचे असा आग्रह त्यांचा होता. त्याचबरोबर माझं कोल्हापूर माझं व्हिजन’ या संकल्पनेला जनतेतून खूप चांगला प्रतिसाद मिळाला.  निवडणूक लढवण्याबाबत जनतेचाही आग्रह होता. मात्र, सहा विधानसभा मतदारसंघाचा हा मतदारसंघ आहे. अटीतटीच्या लढतीत पक्षीय ताकद महत्वाची असते यासह इतर बाबींचा विचार करुन थांबण्याचा निर्णय घेतला आहे. हे सांगताना खूप वेदना होतात, आयुष्यातील तीन वर्षे कोल्हापूरच्या विकासाचे व्हीजन घेऊन खर्ची घातले आणि त्यानंतर थांबावे लागते. पण, आयुष्यात चार पावलांची झेप घेत असताना कधी कधी दोन पाऊले मागे यावे लागते. ७ मे ला मतदान झाल्यानंतर ८ मे पासून ‘चेतन युवा सेतू ’संस्थेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना स्वताच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. यावेळी, सत्यशील संदीप नरके उपस्थित होते.

माघारीचा निर्णय सांगताना झाले भावूकगेली अडीच वर्षे कोल्हापूरचे व्हीजन घेऊन लोकसभेच्या रिंगणात उतरलो होतो, कोल्हापूरच्या जनतेचे पाठबळ मिळत असताना माघार घ्यावी लागते, हे सांगताता डॉ. चेतन नरके हे भावूक झाले.

पाठींब्याबाबत लवकरच निर्णयनिवडणूकीतून माघार घेतली आहे, अद्याप पाठींब्याबाबत निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेऊ असे डॉ. नरके यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण