शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

कोल्हापूर लोकसभेच्या रिंगणातून चेतन नरके यांची माघार, कोणाला पाठिंबा देणार.?

By राजाराम लोंढे | Updated: April 17, 2024 15:15 IST

‘कोल्हापूरचे व्हिजन घेऊन काम करणार

कोल्हापूर : देशातील प्रगत जिल्ह्यात माझं कोल्हापूर खूप मागे राहिल्याची खंत मनात होती. अडीच-तीन वर्षे कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचे एक स्वप्न घेऊन कार्यरत राहिलो. निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांसह जनतेचा खूप आग्रह होता, पण लोकसभेची निवडणूक आहे, येथे राजकीय पक्षाची ताकद निर्णायक ठरत असते, त्यामुळे निवडणूकीत थांबण्याचा निर्णय घेतल्याची माहीती ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. नरके म्हणाले, गेली अडीच वर्षे बाराशेहून अधिक गावे पिंजून काढत जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही वाड्यावस्त्या विकासापासून खूप लांब आहेत. हे जरी खरे असले तरी नियोजनबध्द विकास केला तर कोल्हापूरचा चेहरामोहरा बदलू शकतो, या आत्मविश्वासाने काम करत गेलो. महाविकास आघाडीकडून उमेदवारी बऱ्यापैकी निश्चित झाल्याने वेगाने प्रचाराला लागलो होतो. पण, राजकारणात  काहीही होऊ शकते. उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते अस्वस्थत झाले. थांबायचे नाही, लढायचे असा आग्रह त्यांचा होता. त्याचबरोबर माझं कोल्हापूर माझं व्हिजन’ या संकल्पनेला जनतेतून खूप चांगला प्रतिसाद मिळाला.  निवडणूक लढवण्याबाबत जनतेचाही आग्रह होता. मात्र, सहा विधानसभा मतदारसंघाचा हा मतदारसंघ आहे. अटीतटीच्या लढतीत पक्षीय ताकद महत्वाची असते यासह इतर बाबींचा विचार करुन थांबण्याचा निर्णय घेतला आहे. हे सांगताना खूप वेदना होतात, आयुष्यातील तीन वर्षे कोल्हापूरच्या विकासाचे व्हीजन घेऊन खर्ची घातले आणि त्यानंतर थांबावे लागते. पण, आयुष्यात चार पावलांची झेप घेत असताना कधी कधी दोन पाऊले मागे यावे लागते. ७ मे ला मतदान झाल्यानंतर ८ मे पासून ‘चेतन युवा सेतू ’संस्थेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना स्वताच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. यावेळी, सत्यशील संदीप नरके उपस्थित होते.

माघारीचा निर्णय सांगताना झाले भावूकगेली अडीच वर्षे कोल्हापूरचे व्हीजन घेऊन लोकसभेच्या रिंगणात उतरलो होतो, कोल्हापूरच्या जनतेचे पाठबळ मिळत असताना माघार घ्यावी लागते, हे सांगताता डॉ. चेतन नरके हे भावूक झाले.

पाठींब्याबाबत लवकरच निर्णयनिवडणूकीतून माघार घेतली आहे, अद्याप पाठींब्याबाबत निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेऊ असे डॉ. नरके यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण