शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

कोल्हापूर लोकसभेच्या रिंगणातून चेतन नरके यांची माघार, कोणाला पाठिंबा देणार.?

By राजाराम लोंढे | Updated: April 17, 2024 15:15 IST

‘कोल्हापूरचे व्हिजन घेऊन काम करणार

कोल्हापूर : देशातील प्रगत जिल्ह्यात माझं कोल्हापूर खूप मागे राहिल्याची खंत मनात होती. अडीच-तीन वर्षे कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचे एक स्वप्न घेऊन कार्यरत राहिलो. निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांसह जनतेचा खूप आग्रह होता, पण लोकसभेची निवडणूक आहे, येथे राजकीय पक्षाची ताकद निर्णायक ठरत असते, त्यामुळे निवडणूकीत थांबण्याचा निर्णय घेतल्याची माहीती ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. नरके म्हणाले, गेली अडीच वर्षे बाराशेहून अधिक गावे पिंजून काढत जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही वाड्यावस्त्या विकासापासून खूप लांब आहेत. हे जरी खरे असले तरी नियोजनबध्द विकास केला तर कोल्हापूरचा चेहरामोहरा बदलू शकतो, या आत्मविश्वासाने काम करत गेलो. महाविकास आघाडीकडून उमेदवारी बऱ्यापैकी निश्चित झाल्याने वेगाने प्रचाराला लागलो होतो. पण, राजकारणात  काहीही होऊ शकते. उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते अस्वस्थत झाले. थांबायचे नाही, लढायचे असा आग्रह त्यांचा होता. त्याचबरोबर माझं कोल्हापूर माझं व्हिजन’ या संकल्पनेला जनतेतून खूप चांगला प्रतिसाद मिळाला.  निवडणूक लढवण्याबाबत जनतेचाही आग्रह होता. मात्र, सहा विधानसभा मतदारसंघाचा हा मतदारसंघ आहे. अटीतटीच्या लढतीत पक्षीय ताकद महत्वाची असते यासह इतर बाबींचा विचार करुन थांबण्याचा निर्णय घेतला आहे. हे सांगताना खूप वेदना होतात, आयुष्यातील तीन वर्षे कोल्हापूरच्या विकासाचे व्हीजन घेऊन खर्ची घातले आणि त्यानंतर थांबावे लागते. पण, आयुष्यात चार पावलांची झेप घेत असताना कधी कधी दोन पाऊले मागे यावे लागते. ७ मे ला मतदान झाल्यानंतर ८ मे पासून ‘चेतन युवा सेतू ’संस्थेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना स्वताच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. यावेळी, सत्यशील संदीप नरके उपस्थित होते.

माघारीचा निर्णय सांगताना झाले भावूकगेली अडीच वर्षे कोल्हापूरचे व्हीजन घेऊन लोकसभेच्या रिंगणात उतरलो होतो, कोल्हापूरच्या जनतेचे पाठबळ मिळत असताना माघार घ्यावी लागते, हे सांगताता डॉ. चेतन नरके हे भावूक झाले.

पाठींब्याबाबत लवकरच निर्णयनिवडणूकीतून माघार घेतली आहे, अद्याप पाठींब्याबाबत निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेऊ असे डॉ. नरके यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण